शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 23:43 IST

रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.

मधुकर ठाकूरउरण : जागतिक वारसास्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर पाच महिन्यांपासून पर्यटकांना बंदी घातली आहे. यामुळे येथील तीन गावांमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून, २३० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये घारापुरी बेटांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख पर्यटक येथील लेण्या पाहण्यासाठी येतात. येथील लेण्यांना युनिस्कोने १९८७ मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. घारापुरी बेटावर शेतबंदर, राजबंदर व मोराबंदर ही तीन मूळ गावे असून, त्यांची लोकसंख्या जवळपास १,२०० आहे. या गावांमध्ये २३० कुटुंब असून, बहुतांश कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावरच होत आहे. मुंबईमधील गेट वे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी जवळपास १०० प्रवासी बोटी असून, त्यांच्यावर १,५०० नागरिक काम करत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे सुरक्षेसाठी १८ मार्चपासून बेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून ही बंदी कायम असल्यामुळे बेटावरील नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्नाचा एकमेव प्रमुख मार्गच बंद झाला आहे. पहिल्यांदाच घारापुरी बेट एवढ्या प्रदीर्घ काळ बंद राहिले आहे. रहिवाशांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. ग्रामपंचायतीने व शासनाच्या वतीने आलेले धान्य यापूर्वी रहिवाशांना देण्यात आले आहे, परंतु ही मदत अपुरी पडत आहे.घारापुरी बेटावरील लेणी नवव्या ते तेराव्या शतकामधील आहेत. मुख्य गुहा जवळपास २७ मीटर आकाराची असून, त्यामध्ये जगप्रसिद्ध त्रिमूर्तीचे शिल्प आहे. याशिवाय अर्धनारी नटेश्वर शिवाची पाच मीटर उंचीची मूर्ती, रावणानुग्रहमूर्ती, अंधकासुर वधमूर्ती, चार मीटर उंचीचे नटराज शिव शिल्प, शंकराने गंगा पृथ्वीवर आणली, यावर आधारित शिल्पाकृती व इतर अनेक प्रसंग दाखविणारे शिल्प येथील खडकांमध्ये कोरले आहेत. बेटाच्या माथ्यावर दोन भव्य तोफा असून, देशात आढळणाऱ्या मोठ्या तोफांपैकी या दोन तोफाही आहेत. समुद्राच्या मध्यभागी असणारे हे बेट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असून, पाच महिने बंद असलेले बेट कधी खुले होणार, याकडे बेटावरील रहिवाशांसह पर्यटकांचेही लक्ष लागले आहे.>लॉकडाऊनमुळे बेटावरील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप केले होते. मदतीसाठी अनेक प्रकल्प चालकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु संंंबंधितांकडून अद्याप मदत मिळालेली नाही.- बळीराम ठाकूर, सरपंच