शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 23:43 IST

रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.

मधुकर ठाकूरउरण : जागतिक वारसास्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर पाच महिन्यांपासून पर्यटकांना बंदी घातली आहे. यामुळे येथील तीन गावांमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून, २३० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये घारापुरी बेटांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख पर्यटक येथील लेण्या पाहण्यासाठी येतात. येथील लेण्यांना युनिस्कोने १९८७ मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. घारापुरी बेटावर शेतबंदर, राजबंदर व मोराबंदर ही तीन मूळ गावे असून, त्यांची लोकसंख्या जवळपास १,२०० आहे. या गावांमध्ये २३० कुटुंब असून, बहुतांश कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावरच होत आहे. मुंबईमधील गेट वे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी जवळपास १०० प्रवासी बोटी असून, त्यांच्यावर १,५०० नागरिक काम करत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे सुरक्षेसाठी १८ मार्चपासून बेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून ही बंदी कायम असल्यामुळे बेटावरील नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्नाचा एकमेव प्रमुख मार्गच बंद झाला आहे. पहिल्यांदाच घारापुरी बेट एवढ्या प्रदीर्घ काळ बंद राहिले आहे. रहिवाशांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. ग्रामपंचायतीने व शासनाच्या वतीने आलेले धान्य यापूर्वी रहिवाशांना देण्यात आले आहे, परंतु ही मदत अपुरी पडत आहे.घारापुरी बेटावरील लेणी नवव्या ते तेराव्या शतकामधील आहेत. मुख्य गुहा जवळपास २७ मीटर आकाराची असून, त्यामध्ये जगप्रसिद्ध त्रिमूर्तीचे शिल्प आहे. याशिवाय अर्धनारी नटेश्वर शिवाची पाच मीटर उंचीची मूर्ती, रावणानुग्रहमूर्ती, अंधकासुर वधमूर्ती, चार मीटर उंचीचे नटराज शिव शिल्प, शंकराने गंगा पृथ्वीवर आणली, यावर आधारित शिल्पाकृती व इतर अनेक प्रसंग दाखविणारे शिल्प येथील खडकांमध्ये कोरले आहेत. बेटाच्या माथ्यावर दोन भव्य तोफा असून, देशात आढळणाऱ्या मोठ्या तोफांपैकी या दोन तोफाही आहेत. समुद्राच्या मध्यभागी असणारे हे बेट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असून, पाच महिने बंद असलेले बेट कधी खुले होणार, याकडे बेटावरील रहिवाशांसह पर्यटकांचेही लक्ष लागले आहे.>लॉकडाऊनमुळे बेटावरील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप केले होते. मदतीसाठी अनेक प्रकल्प चालकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु संंंबंधितांकडून अद्याप मदत मिळालेली नाही.- बळीराम ठाकूर, सरपंच