शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 23:43 IST

रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.

मधुकर ठाकूरउरण : जागतिक वारसास्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर पाच महिन्यांपासून पर्यटकांना बंदी घातली आहे. यामुळे येथील तीन गावांमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून, २३० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये घारापुरी बेटांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख पर्यटक येथील लेण्या पाहण्यासाठी येतात. येथील लेण्यांना युनिस्कोने १९८७ मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. घारापुरी बेटावर शेतबंदर, राजबंदर व मोराबंदर ही तीन मूळ गावे असून, त्यांची लोकसंख्या जवळपास १,२०० आहे. या गावांमध्ये २३० कुटुंब असून, बहुतांश कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावरच होत आहे. मुंबईमधील गेट वे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी जवळपास १०० प्रवासी बोटी असून, त्यांच्यावर १,५०० नागरिक काम करत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे सुरक्षेसाठी १८ मार्चपासून बेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून ही बंदी कायम असल्यामुळे बेटावरील नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्नाचा एकमेव प्रमुख मार्गच बंद झाला आहे. पहिल्यांदाच घारापुरी बेट एवढ्या प्रदीर्घ काळ बंद राहिले आहे. रहिवाशांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. ग्रामपंचायतीने व शासनाच्या वतीने आलेले धान्य यापूर्वी रहिवाशांना देण्यात आले आहे, परंतु ही मदत अपुरी पडत आहे.घारापुरी बेटावरील लेणी नवव्या ते तेराव्या शतकामधील आहेत. मुख्य गुहा जवळपास २७ मीटर आकाराची असून, त्यामध्ये जगप्रसिद्ध त्रिमूर्तीचे शिल्प आहे. याशिवाय अर्धनारी नटेश्वर शिवाची पाच मीटर उंचीची मूर्ती, रावणानुग्रहमूर्ती, अंधकासुर वधमूर्ती, चार मीटर उंचीचे नटराज शिव शिल्प, शंकराने गंगा पृथ्वीवर आणली, यावर आधारित शिल्पाकृती व इतर अनेक प्रसंग दाखविणारे शिल्प येथील खडकांमध्ये कोरले आहेत. बेटाच्या माथ्यावर दोन भव्य तोफा असून, देशात आढळणाऱ्या मोठ्या तोफांपैकी या दोन तोफाही आहेत. समुद्राच्या मध्यभागी असणारे हे बेट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असून, पाच महिने बंद असलेले बेट कधी खुले होणार, याकडे बेटावरील रहिवाशांसह पर्यटकांचेही लक्ष लागले आहे.>लॉकडाऊनमुळे बेटावरील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप केले होते. मदतीसाठी अनेक प्रकल्प चालकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु संंंबंधितांकडून अद्याप मदत मिळालेली नाही.- बळीराम ठाकूर, सरपंच