शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘बाप्पा मोरया’ कोरोनापासून मुक्ती द्या! ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:41 IST

गौरी, गणपतींचे नवी मुंबई, रायगडमध्ये शांततेत विसर्जन; शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन

दासगाव : गुरुवारी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जय घोषात पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन दासगाव परिसरात शांततेत पार पडले. हे विसर्जन गाव खाडी आणि सावित्री खाडीमध्ये करण्यात आले. जवळपास १५० हून अधिक गणपतीचे विसर्जन या वेळी करण्यात आले. नागरिकांनी विसर्जनाच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जय घोष करताना करोनापासून मुक्ती द्या असा ही जयघोष केले. तर सोशल डिस्टनसिंग ठेवत नागरिकांनी विसर्जन केले.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दीड , पाच आणि दहा दिवस असे तीन वेळा गणपतीचे विसर्जन करण्यात येते. शनिवारी गणपतीचे आगमन झाले. रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले होते. तर गुरुवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दासगावमध्ये गाव खाडी आणि सावित्री खाडीमध्ये विसर्जन करण्यात आले असून जवळपास दीडशे हुन अधिक गणपती मूतीचे यावेळी विसर्जन करण्यात आले. विसर्जनाला दुपारी ४ वाजल्या पासून सुरवात झाली होती तर ६ वाजेपर्यंत विसर्जन होत होते. दर वर्षी या विसर्जनांच्या मोठ मोठ्या मिरावणुकी काढल्या जात असत मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्व भूमीवर हे विसर्जन सोशल डीस्टनसिंग ठेवत शांततेत करण्यात आले.बामणे कोंड, न्हावी कोंड,जाधव वाडी,पाटील आलीआणि परीट आळीच्या गणपतीचे विसर्जन गावखाडी (नदी) त करण्यात आले तर भोई वाडा, पेटकर आळी आणि नवीन वसाहत गणेश नगर येथील गणेशमूर्तींचे विसर्जन सावित्री खाडीमध्ये करण्यात आले.गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोपनवी मुंबई : शहरातील गौरी आणि गणपतींना गुरुवारी विविध तलावांवर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांवर भक्तांनी नियमांचे पालन करीत लाडक्या बाप्पांना निरोप दिला. नवी मुंबई शहरात कोरोनाच्या संकटामुळे भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करीत बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. दरवर्षी शहरातील २३ विसर्जन तलावांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भक्तांनी या तलावांवर दीड, अडीच आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे तसेच गौरींचे विसर्जन सुरळीतरीत्या केले. विसर्जन ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील विसर्जनस्थळी व विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. विसर्जन ठिकाणी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कोरोनाचे संकट लक्षात घेता भक्तांनीदेखील काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन केले. शहरातील प्रत्येक विभागात तलावांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी नव्हती.पनवेलमध्ये गाजावाजा न करता शांततेत गौरी, गणेशमूर्तींचे विसर्जनपनवेल परिसरातील गौरी-गणपतींना गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या सावटामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने विसर्जन पार पडले.

ग्रामीण भाग व पनवेल महापालिका क्षेत्रातील गौरी-गणपतींचे दुपारनंतर विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रात ४१ कृत्रिम विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. पनवेल, नवीन पनवेल, खांदाकॉलनी, खारघर, कळंबोली, तळोजे तसेच ग्रामीण भागात हे विसर्जन शांततेत पार पडले. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. या वर्षी ढोल-ताशांचा व फटाक्यांचा गजर क्वचितच ऐकायला मिळाला. भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा यापूर्वी घेतला होता. पालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव