शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘बाप्पा मोरया’ कोरोनापासून मुक्ती द्या! ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:41 IST

गौरी, गणपतींचे नवी मुंबई, रायगडमध्ये शांततेत विसर्जन; शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन

दासगाव : गुरुवारी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जय घोषात पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन दासगाव परिसरात शांततेत पार पडले. हे विसर्जन गाव खाडी आणि सावित्री खाडीमध्ये करण्यात आले. जवळपास १५० हून अधिक गणपतीचे विसर्जन या वेळी करण्यात आले. नागरिकांनी विसर्जनाच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जय घोष करताना करोनापासून मुक्ती द्या असा ही जयघोष केले. तर सोशल डिस्टनसिंग ठेवत नागरिकांनी विसर्जन केले.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दीड , पाच आणि दहा दिवस असे तीन वेळा गणपतीचे विसर्जन करण्यात येते. शनिवारी गणपतीचे आगमन झाले. रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले होते. तर गुरुवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दासगावमध्ये गाव खाडी आणि सावित्री खाडीमध्ये विसर्जन करण्यात आले असून जवळपास दीडशे हुन अधिक गणपती मूतीचे यावेळी विसर्जन करण्यात आले. विसर्जनाला दुपारी ४ वाजल्या पासून सुरवात झाली होती तर ६ वाजेपर्यंत विसर्जन होत होते. दर वर्षी या विसर्जनांच्या मोठ मोठ्या मिरावणुकी काढल्या जात असत मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्व भूमीवर हे विसर्जन सोशल डीस्टनसिंग ठेवत शांततेत करण्यात आले.बामणे कोंड, न्हावी कोंड,जाधव वाडी,पाटील आलीआणि परीट आळीच्या गणपतीचे विसर्जन गावखाडी (नदी) त करण्यात आले तर भोई वाडा, पेटकर आळी आणि नवीन वसाहत गणेश नगर येथील गणेशमूर्तींचे विसर्जन सावित्री खाडीमध्ये करण्यात आले.गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोपनवी मुंबई : शहरातील गौरी आणि गणपतींना गुरुवारी विविध तलावांवर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांवर भक्तांनी नियमांचे पालन करीत लाडक्या बाप्पांना निरोप दिला. नवी मुंबई शहरात कोरोनाच्या संकटामुळे भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करीत बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. दरवर्षी शहरातील २३ विसर्जन तलावांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भक्तांनी या तलावांवर दीड, अडीच आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे तसेच गौरींचे विसर्जन सुरळीतरीत्या केले. विसर्जन ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील विसर्जनस्थळी व विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. विसर्जन ठिकाणी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कोरोनाचे संकट लक्षात घेता भक्तांनीदेखील काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन केले. शहरातील प्रत्येक विभागात तलावांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी नव्हती.पनवेलमध्ये गाजावाजा न करता शांततेत गौरी, गणेशमूर्तींचे विसर्जनपनवेल परिसरातील गौरी-गणपतींना गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या सावटामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने विसर्जन पार पडले.

ग्रामीण भाग व पनवेल महापालिका क्षेत्रातील गौरी-गणपतींचे दुपारनंतर विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रात ४१ कृत्रिम विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. पनवेल, नवीन पनवेल, खांदाकॉलनी, खारघर, कळंबोली, तळोजे तसेच ग्रामीण भागात हे विसर्जन शांततेत पार पडले. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. या वर्षी ढोल-ताशांचा व फटाक्यांचा गजर क्वचितच ऐकायला मिळाला. भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा यापूर्वी घेतला होता. पालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव