शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

गवळीदेव धबधबा बनला मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: July 17, 2017 01:31 IST

पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु जागोजागी मद्यपींच्या मैफली पाहून अनेकांनी तेथून परत जाणे पसंत केले. येथील विहिरीमध्येही अनेक जण उतरत असून सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेला निसर्गाचे वरदान लाभले आहे. २२ किलोमीटरचा खाडी किनारा व दिघा ते बेलापूरपर्यंतच्या डोंगररांगा आहेत. परंतु खाडी व डोंगर रांगांमध्ये पर्यटनस्थळ विकसित करण्यात महापालिका व वनविभागाला अपयश आले आहे. खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील हजारो पर्यटक घणसोलीमधील गवळीदेव धबधब्यावर पावसाळी सहलीसाठी जात आहेत. शनिवार व रविवारी दोनही दिवस रोज ३ ते ४ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती. पर्यटकांची गर्दी होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी येथे काहीही उपाययोजना नाही. धबधबा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. तरूणाई घोळका करून मद्यपान करत असल्याचे चित्र होते. मद्यपींना कोणाचीच भीती उरलेली नव्हती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्र घेत असतानाही त्यांना बिनधास्तपणे फोटो काढून दिले जात होते. मद्यपींमुळे गवळीदेवला कुटुंबीयांसह गेलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. या प्रकाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निसर्गाचा व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथे आलो, परंतु मद्यपींमुळे आनंदावर विरजण पडले. भांडणे होण्याच्या भीतीमुळे येथून परत जाणे पसंत केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. गवळीदेव धबधब्यावर जाताना जंगलामध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये अनेक तरूण उड्या मारत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. पूर्वी या विहिरीवर लोखंडी जाळी होती. परंतु चोरट्यांनी जाळी गायब केली आहे. त्यामुळे विहिरीत बुडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वी गवळीदेवकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. पर्यटकांचे साहित्य तपासून दारू जप्त केली जात होती. परंतु सद्यस्थितीमध्ये धबधबा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थाच नाही. महापालिका प्रशासनाने गवळीदेवकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याशिवाय वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.