शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गवळीदेव धबधबा बनला मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: July 17, 2017 01:31 IST

पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु जागोजागी मद्यपींच्या मैफली पाहून अनेकांनी तेथून परत जाणे पसंत केले. येथील विहिरीमध्येही अनेक जण उतरत असून सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेला निसर्गाचे वरदान लाभले आहे. २२ किलोमीटरचा खाडी किनारा व दिघा ते बेलापूरपर्यंतच्या डोंगररांगा आहेत. परंतु खाडी व डोंगर रांगांमध्ये पर्यटनस्थळ विकसित करण्यात महापालिका व वनविभागाला अपयश आले आहे. खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील हजारो पर्यटक घणसोलीमधील गवळीदेव धबधब्यावर पावसाळी सहलीसाठी जात आहेत. शनिवार व रविवारी दोनही दिवस रोज ३ ते ४ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती. पर्यटकांची गर्दी होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी येथे काहीही उपाययोजना नाही. धबधबा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. तरूणाई घोळका करून मद्यपान करत असल्याचे चित्र होते. मद्यपींना कोणाचीच भीती उरलेली नव्हती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्र घेत असतानाही त्यांना बिनधास्तपणे फोटो काढून दिले जात होते. मद्यपींमुळे गवळीदेवला कुटुंबीयांसह गेलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. या प्रकाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निसर्गाचा व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथे आलो, परंतु मद्यपींमुळे आनंदावर विरजण पडले. भांडणे होण्याच्या भीतीमुळे येथून परत जाणे पसंत केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. गवळीदेव धबधब्यावर जाताना जंगलामध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये अनेक तरूण उड्या मारत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. पूर्वी या विहिरीवर लोखंडी जाळी होती. परंतु चोरट्यांनी जाळी गायब केली आहे. त्यामुळे विहिरीत बुडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वी गवळीदेवकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. पर्यटकांचे साहित्य तपासून दारू जप्त केली जात होती. परंतु सद्यस्थितीमध्ये धबधबा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थाच नाही. महापालिका प्रशासनाने गवळीदेवकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याशिवाय वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.