शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गवळीदेव धबधबा बनला मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: July 17, 2017 01:31 IST

पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु जागोजागी मद्यपींच्या मैफली पाहून अनेकांनी तेथून परत जाणे पसंत केले. येथील विहिरीमध्येही अनेक जण उतरत असून सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेला निसर्गाचे वरदान लाभले आहे. २२ किलोमीटरचा खाडी किनारा व दिघा ते बेलापूरपर्यंतच्या डोंगररांगा आहेत. परंतु खाडी व डोंगर रांगांमध्ये पर्यटनस्थळ विकसित करण्यात महापालिका व वनविभागाला अपयश आले आहे. खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील हजारो पर्यटक घणसोलीमधील गवळीदेव धबधब्यावर पावसाळी सहलीसाठी जात आहेत. शनिवार व रविवारी दोनही दिवस रोज ३ ते ४ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती. पर्यटकांची गर्दी होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी येथे काहीही उपाययोजना नाही. धबधबा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. तरूणाई घोळका करून मद्यपान करत असल्याचे चित्र होते. मद्यपींना कोणाचीच भीती उरलेली नव्हती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्र घेत असतानाही त्यांना बिनधास्तपणे फोटो काढून दिले जात होते. मद्यपींमुळे गवळीदेवला कुटुंबीयांसह गेलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. या प्रकाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निसर्गाचा व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथे आलो, परंतु मद्यपींमुळे आनंदावर विरजण पडले. भांडणे होण्याच्या भीतीमुळे येथून परत जाणे पसंत केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. गवळीदेव धबधब्यावर जाताना जंगलामध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये अनेक तरूण उड्या मारत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. पूर्वी या विहिरीवर लोखंडी जाळी होती. परंतु चोरट्यांनी जाळी गायब केली आहे. त्यामुळे विहिरीत बुडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वी गवळीदेवकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. पर्यटकांचे साहित्य तपासून दारू जप्त केली जात होती. परंतु सद्यस्थितीमध्ये धबधबा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थाच नाही. महापालिका प्रशासनाने गवळीदेवकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याशिवाय वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.