शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

निर्यात भवनला कचराकुंडीचे स्वरूप

By admin | Updated: October 15, 2015 02:08 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील निर्यात भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे. पूर्ण इमारतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील निर्यात भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे. पूर्ण इमारतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कृषी मालाचे पॅकिंग करतानाही स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. मार्केटमध्ये सुरक्षा उपकरणे नसल्यामुळे कोणत्याही क्षणी आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया खंडामधील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. पूर्वी या मार्केटमधील कामकाजाची पाहणी करण्यासाठी देशातून व्यापारी व शासकीय संस्थेचे पदाधिकारी यायचे. कृषी विद्यापीठाचे व व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थीही मार्केटला भेट देत होते. परंतु अनागोंदी कारभारामुळे मार्केट बकाल झाले आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी फळ मार्केटमध्ये दोन मजली निर्यात भवन उभारण्यात आले आहे. परंतु या निर्यात भवनची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. येथील निर्यातदाराचे कार्यालय वातानुकूलित व स्वच्छ आहे. परंतु इतर ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीच्या बाहेरच कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळतात. इमारतीमध्येही जिन्याजवळ व प्रत्येक मजल्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. ये - जा करण्यासाठी असलेल्या पॅसेजमध्ये पॅकिंग करावयाचे पुठ्ठे ठेवण्यात आले आहेत. विद्युत मीटर बॉक्सला लागून कागदी पुठ्ठे व इतर कागदांचे गठ्ठे ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी या ठिकाणी आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीमध्ये सुरक्षेची कोणतीही उपकरणे बसविण्यात आलेली नाहीत. निर्यात करण्यात येणाऱ्या मालाचा दर्जा अत्यंत चांगला असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याची पॅकिंगही उत्तम दर्जाची असली पाहिजे. परंतु निर्यात भवनमध्ये परप्रांतीय कामगारांकडून पॅकिंग करून घेतली जाते. या कामगारांचे कपडे अत्यंत तोटके व अस्वच्छ असतात. त्यांच्या हातामध्ये मोजेही नसतात. पदपथावरील मंडईत पाठविण्यात येत असलेल्या मालाप्रमाणे चित्र याठिकाणी पहावयास मिळत आहे. चांगल्या दर्जाचा माल व पॅकिंगही आकर्षक असले तरी मालाची हाताळणीही व्यवस्थित झाली पाहिजे याकडे कोणीच लक्ष देत नाही. सर्वच प्रसाधनगृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.