शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास शासनानेच करावा, गणेश नाईक यांची मागणी

By कमलाकर कांबळे | Updated: July 22, 2024 15:21 IST

गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला.

नवी मुंबई:  झोपडपट्ट्यांमधून  राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हक्काचे आणि पक्के घर  मिळायला हवे. नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांना त्यांच्या घरांची आणि त्याखालील जमिनीची मालकी द्यावी. तसेच शासनाने  म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्ट्यांचा विकास करावा, अशी मागणी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक  केली आहे.

गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदने दिली. यापैकी अनेक निवेदनांवर  तात्काळ कार्यवाही करण्यात आली.  गाव, गावठाण, शहर, झोपडपट्टी परिसर, औद्योगिक परिसर, एलआयजी, एमआयजी, सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. याप्रसंगी पाणीपुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी समस्यांच्या निवेदनांचा  निपटारा करण्यात आला. त्यानंतर आ. नाईक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी  आणि स्थानिकांनी कवडीमोल भावात  त्यांच्या जमिनी सिडकोला दिल्या. नियमानुसार गावठाण विस्तार योजना  सिडकोने राबवली नाही. साडेबारा टक्क्यांची योजना पूर्ण केली नाही.  काळाच्या ओघात  कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्वाहासाठी  वाणिज्य बांधकामे केली. आज पर्यंतची  अशा प्रकारची सर्व बांधकामे नियमित करावीत. प्रकल्पग्रस्तांना घरांचा आणि त्या खालील जमिनीचा मालकी हक्क द्यावा. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धरतीवर शासनाने विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक