शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

दुष्काळग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात

By admin | Updated: September 20, 2015 00:00 IST

गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन लोकमतने केल्यानंतर नवी मुंबई, पनवेलमधून मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नेरूळ मधील लोकमान्य टिळक

नवी मुंबई : गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन लोकमतने केल्यानंतर नवी मुंबई, पनवेलमधून मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नेरूळ मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीने ५१ हजार रूपयांची मदत केली असून शहरातील काही व्यवसायीकांनी १ कोटी रूपये देण्याचे निश्चीत केले आहे. राज्यात भिषण दुष्काळाची स्थिती आहे. पाऊस वेळेत न पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असल्यामुळे यावर्षी गणेश उत्सवामध्ये जास्त खर्च न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सामाजीक कार्यकर्त्यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनीही यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नवी मुंबईमधील मंडळांनाही याविषयी आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पनवेलमधील विघ्नहर्ता गणेश मंडळाने नाना पाटेकर यांच्याकडे २५ हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे. त्यांनी केलेल्या सुरवातीनंतर अनेक गणेश मंडळांनी खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारही गणेश उत्सव साध्यापद्धतीने साजरा करून नाम फाऊंडेशनकडे मदत सुपुर्द करणार आहेत. नेरूळ सेक्टर १० मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती प्रत्येक वर्षी उत्सवातून जनजागृतीचे काम करत आहे. सामाजीक संदेश देणारा देखावा करण्यात येतो. यावेळी गणेश मंडळ दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रूपये देणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी दिली आहे. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांनाही दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईमधील बांधकाम व इतर क्षेत्रातील व्यवसायीकांनी दुष्काळग्रस्तांना मोठी मदत करण्याचे निश्चीत केले आहे. १ कोटी रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे. मदत निधी जमा झाला असून मान्यवरांची वेळ घेवून तत्काळ तो त्यांच्याकडे सुपुर्द केला जाणार असल्याची माहिती या कामामध्ये पुढाकार घेणाऱ्या व्यवसायीकांनी दिली. राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना मदत करणे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यवसायीकांनी आपल्या पद्धतीने मदत करावी असे आवाहन या माध्यमातून केले जाणार आहे.