शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दुष्काळग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात

By admin | Updated: September 20, 2015 00:00 IST

गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन लोकमतने केल्यानंतर नवी मुंबई, पनवेलमधून मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नेरूळ मधील लोकमान्य टिळक

नवी मुंबई : गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन लोकमतने केल्यानंतर नवी मुंबई, पनवेलमधून मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नेरूळ मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीने ५१ हजार रूपयांची मदत केली असून शहरातील काही व्यवसायीकांनी १ कोटी रूपये देण्याचे निश्चीत केले आहे. राज्यात भिषण दुष्काळाची स्थिती आहे. पाऊस वेळेत न पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असल्यामुळे यावर्षी गणेश उत्सवामध्ये जास्त खर्च न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सामाजीक कार्यकर्त्यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनीही यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नवी मुंबईमधील मंडळांनाही याविषयी आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पनवेलमधील विघ्नहर्ता गणेश मंडळाने नाना पाटेकर यांच्याकडे २५ हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे. त्यांनी केलेल्या सुरवातीनंतर अनेक गणेश मंडळांनी खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारही गणेश उत्सव साध्यापद्धतीने साजरा करून नाम फाऊंडेशनकडे मदत सुपुर्द करणार आहेत. नेरूळ सेक्टर १० मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती प्रत्येक वर्षी उत्सवातून जनजागृतीचे काम करत आहे. सामाजीक संदेश देणारा देखावा करण्यात येतो. यावेळी गणेश मंडळ दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रूपये देणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी दिली आहे. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांनाही दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईमधील बांधकाम व इतर क्षेत्रातील व्यवसायीकांनी दुष्काळग्रस्तांना मोठी मदत करण्याचे निश्चीत केले आहे. १ कोटी रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे. मदत निधी जमा झाला असून मान्यवरांची वेळ घेवून तत्काळ तो त्यांच्याकडे सुपुर्द केला जाणार असल्याची माहिती या कामामध्ये पुढाकार घेणाऱ्या व्यवसायीकांनी दिली. राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना मदत करणे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यवसायीकांनी आपल्या पद्धतीने मदत करावी असे आवाहन या माध्यमातून केले जाणार आहे.