शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भिवंडीत एसएमएस सेवा

By admin | Updated: August 16, 2014 00:31 IST

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोबाइल एसएमएस प्रक्रिया सुरू केली असून, राज्यात प्रथमच ही सुविधा पालिकेने सुरू केली

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोबाइल एसएमएस प्रक्रिया सुरू केली असून, राज्यात प्रथमच ही सुविधा पालिकेने सुरू केली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा महानगरपालिकेनंतर एम-गव्हर्नर ही प्रक्रिया १५ आॅगस्ट २०१४ रोजी आपल्या शहरात सुरू होत असल्याची माहिती पालिका आयुक्त जीवन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत असताना मनपाच्या कार्यप्रणालीमुळे त्यांच्या समस्या सोडवण्यास वेळखाऊपणाबरोबरच विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या तक्रारी नोंदवण्यासाठी एसएमएस सर्व्हिस सुरू केली असून या उपक्रमांतर्गत नागरिक त्यांच्या तक्रारी ९९७०००१३१२ या क्रमांकावर पाठवू शकतात. तक्रारींची विभागणी १० खात्यांतर्गत केली असून त्यांना कोड क्रमांक दिले आहेत. त्या खात्यांतील कामांतर्गत कामाचे स्वरूप नमूद करण्याकरिता इंग्रजी अद्याक्षरे दिली आहेत. या प्रकारे नमूद तक्रारी पालिकेकडे आल्यास तक्रारदारांस तक्रार क्रमांक दिला जाऊन काम झाल्यानंतर त्याने दिलेल्या क्रमांकावर त्यास एसएमएसने कळवले जाणार आहे. ही सिस्टीम पुण्यातील क्लाऊड सिस्टीमला जोडली आहे. (प्रतिनिधी)