शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार; कोपरखैरणेतील घटना 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 10, 2023 17:34 IST

जुन्या भांडणातून एकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे.

नवी मुंबई : जुन्या भांडणातून एकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. यावेळी तरुणाने हातावर वार झेलल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यातील नेमका वाद समोर आलेला नाही. 

कोपर खैरणे सेक्टर ४ येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारा किरण वाशिवले (२८) हा रात्री ११ च्या सुमारास मित्रांसोबत उभा होता. यावेळी तिथे आलेल्या चौघांपैकी सचिन सपकाळ याने त्याच्याकडे जुन्या भांडणाचा विषय काढत त्या भांडणात तू होता का याबाबत चौकशी केली. यामध्ये त्यांच्यात वाद झाला असता सचिन त्याच्याकडील हेल्मेटने किरणला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर राकेश धारी याने सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरवात करताच किरणने तिथून पळ काढला असता ते चौघेही त्याच्या मागे धावू लागले. 

काही अंतरावर किरणचा भाऊ भेटला असता तो त्यांच्याकडे चौकशी करत असतानाच सचिनने किरनवर कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये बचावासाठी किरणने कोयता हाताने अडवला असता त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर चौघांनीही तिथून पळ काढला असता जखमी किरणला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी सोमवारी दुपारी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात सचिन सपकाळ, नरेश सपकाळ, विशाल चिकणे व राकेश धारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणेत मंडळाच्या आडून मुलांच्या टोळ्या तयार होत आहेत. त्यातूनच किरकोळ कारणातून एकमेकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी