शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोफत वाय-फाय ठरले औटघटकेचे

By admin | Updated: July 13, 2015 02:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी सुरू केलेली मोफत वाय - फाय सेवा औटघटकेची ठरली आहे. गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या

कमलाकर कांबळे , नवी मुंबईविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी सुरू केलेली मोफत वाय - फाय सेवा औटघटकेची ठरली आहे. गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या या वाय-फाय सेवेने निवडणूक संपताच मान टाकली आहे. त्यामुळे सायबर सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या या शहरातील तरुणाईला जलद इंटरनेट सेवेसाठी मॉल्स किंवा बड्या रेस्टॉरेंटचा आधार घ्यावा लागत आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत आहे. शहरात आयटी उद्योगाचे जाळे विणले गेले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवा पुरविणारी कॉल सेंटर्सही आहेत. त्यामुळे इंटरनेट वापराचे प्रमाणही लक्षणीय आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने सायबर सिटीत महत्त्वाच्या ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने चार वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे खीळ बसली होती. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी सवंग प्रसिध्दीसाठी शहरवासीयांना मोफत वाय-फाय सेवा देण्याच्या वल्गना केल्या होत्या. काही ठिकाणी त्याचा शुभारंभही झाला. मात्र ही सेवा लवकरच बंद पडली.ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी शहरात सर्वप्रथम मोफत वाय-फाय सेवेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात वाशी आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकात ही सेवा उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर सर्व स्थानकांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात केली होती. प्रत्यक्ष मात्र सुरू करण्यात आलेली दोन स्थानकांतील वाय-फाय सेवा पंधरा दिवसांतच बंद झली होती. विधानसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच पालिकेच्या निवडणुका लागल्या. पुन्हा मोफत वाय-फाय सेवेची हवा सुरू झाली. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी नेरूळ गावात शुभारंभ केला. त्यापाठोपाठ कोपरखैरणे सेक्टर १२ परिसरात शिवसेनेचे विलास म्हात्रे यांनी ही सेवा सुरू करून मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक इच्छुकांकडून आपापल्या प्रभागातील नागरिकांना मोफत वाय-फाय सेवेचा ट्रेलर दाखविण्यात आला. मात्र निवडणुकीचा फड संपताच वाय-फाय सुविधेचा खेळही संपुष्टात आला.