शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चौदा हजार ५०० गावे झाली दुष्काळमुक्त, उरण शहराच्या ५६ कोटी खर्चाच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:52 IST

उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला.

उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीतून उरण शहरात करण्यात येणाºया ५६ कोटी खर्चाच्या विकासकामे योजनेचा शुभारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाला.उरण नगरपरिषदेच्या टाउन हॉल इमारतीचे अद्ययावत बांधकाम, शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, विमला तलाव आणि उद्यानाचे सुशोभीकरण आदी विकासकामांची योजना आखण्यात आली होती. यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागामार्फत मंजूर केला आहे. माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या प्रयत्नानंतर, या कामांसाठी लागणारा ५६ कोटींचा निधी उरण शहराच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपलब्ध करून दिला आहे. या विविध विकासकामांच्या योजनांचा शुभारंभ शुक्रवारी राज्याचे बंदरे, वैद्यकीय, माहिती, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून २७ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावांपैकी १४ हजार ५०० गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावाही त्यांनी केला.या वेळी एलिफंटा बेटावर वीज आणणार असून, त्याचे उद्घाटनही मुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्याचा मानस बालदी यांनी व्यक्त केला. करंजा बंदरासाठी १५० कोटी निधीपैकी जेएनपीटीच्या सागरमाला योजनेतून ७५ कोटी, तर शासनाकडून ७५ कोटी निधी मिळणार आहे. करंजा रो रो सेवा सुरू करायची असून, शहरातील अंडरग्राउंड केबल्ससाठी ४० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही बालदी म्हणाले.>सेनेची कार्यक्रमाकडे पाठउरण नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असली, तरी उनपमध्ये सेनेचे पाच नगरसेवक आहेत. सेनेच्या एकाही नगरसेवकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते. यामुळे नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याची माहिती सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी दिली. सर्वांना निमंत्रण देण्याचे काम प्रशासनाकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी ते केले की नाही, हे तपासून पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रवक्ते कौशिक शहा यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे आ. मनोहर भोईर कार्यक्रमाला आले नाहीत.