शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

चौदा हजार ५०० गावे झाली दुष्काळमुक्त, उरण शहराच्या ५६ कोटी खर्चाच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:52 IST

उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला.

उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीतून उरण शहरात करण्यात येणाºया ५६ कोटी खर्चाच्या विकासकामे योजनेचा शुभारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाला.उरण नगरपरिषदेच्या टाउन हॉल इमारतीचे अद्ययावत बांधकाम, शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, विमला तलाव आणि उद्यानाचे सुशोभीकरण आदी विकासकामांची योजना आखण्यात आली होती. यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागामार्फत मंजूर केला आहे. माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या प्रयत्नानंतर, या कामांसाठी लागणारा ५६ कोटींचा निधी उरण शहराच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपलब्ध करून दिला आहे. या विविध विकासकामांच्या योजनांचा शुभारंभ शुक्रवारी राज्याचे बंदरे, वैद्यकीय, माहिती, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून २७ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावांपैकी १४ हजार ५०० गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावाही त्यांनी केला.या वेळी एलिफंटा बेटावर वीज आणणार असून, त्याचे उद्घाटनही मुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्याचा मानस बालदी यांनी व्यक्त केला. करंजा बंदरासाठी १५० कोटी निधीपैकी जेएनपीटीच्या सागरमाला योजनेतून ७५ कोटी, तर शासनाकडून ७५ कोटी निधी मिळणार आहे. करंजा रो रो सेवा सुरू करायची असून, शहरातील अंडरग्राउंड केबल्ससाठी ४० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही बालदी म्हणाले.>सेनेची कार्यक्रमाकडे पाठउरण नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असली, तरी उनपमध्ये सेनेचे पाच नगरसेवक आहेत. सेनेच्या एकाही नगरसेवकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते. यामुळे नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याची माहिती सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी दिली. सर्वांना निमंत्रण देण्याचे काम प्रशासनाकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी ते केले की नाही, हे तपासून पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रवक्ते कौशिक शहा यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे आ. मनोहर भोईर कार्यक्रमाला आले नाहीत.