शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी रांगेत चार तासांची ‘शिक्षा’

By admin | Updated: March 20, 2017 02:17 IST

वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ

नवी मुंबई : वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. पैसे भरणे व छायाचित्र काढण्यासाठी तब्बल चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. कार्यालयातील संगणक प्रणाली वारंवार बंद होत असून प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई आरटीओ कार्यालयाविषयी नागरिकांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एपीएमसीमधील भाडेतत्त्वाने घेतलेल्या गाळ्यामध्ये कार्यालय सुरू असून येथे येणाऱ्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. आरटीओ कर्मचारी नागरिकांना गुलामाप्रमाणे वागवत आहेत. शनिवारी वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अक्षरश: चार तास उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी पैसे भरून घेण्यासाठी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. पैसे भरून घेणारे कर्मचारी अत्यंत धीम्या गतीने काम करत होते. शिवाय नागरिक रांगेत उभे असताना अनेक एजंट व राजकीय वशिलेबाजी घेवून आलेल्या नागरिकांचे पैसे थेट आतमधून भरून घेतले जात होते. अनेक एजंट थेट आतमध्ये जावून पैसे भरून घेत होते. पैसे भरून झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी पुन्हा रांग लावावी लागली. वास्तविक पैसे भरल्यानंतर टोकन नंबर दिलेला असताना पुन्हा रांग लावण्याची गरजच नाही, पण टोकन नंबर फक्त नावालाच आहेत. कार्यालयाच्या मधल्या पॅसेजमध्ये रांग लावावी लागते. तेथे उभे राहण्यासाठीही जागा नाही. कार्यालयातील कागदांच्या गोणी त्याच परिसरामध्ये अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. नागरिकांना बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. तीव्र उकाड्यामुळे अनेकांना भोवळ येत असून नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी पावणेबारा वाजता रांग लावलेल्या नागरिकांना पैसे भरण्यासाठी व फोटो काढून घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजले. यामुळे वाहन चालकाच्या परवान्यासाठीची परीक्षा न देताच परत फिरावे लागले. एवढा उशीर का होत आहे याविषयी विचारणा केली असता कर्मचारी सर्व्हर खराब आहे. संगणक बरोबर नाही अशी उत्तरे देत होते. अनेक वेळा नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. आरटीओ कार्यालयात नागरिकांना वाहन चालकाचा परवाना कसा मिळवायचा, कशी अपॉर्इंटमेंट घ्यायची याविषयी माहिती देण्याची काहीही यंत्रणा शिल्लक नाही. एजंटची मदत घेतल्याशिवाय येथील एकही काम होवू शकत नाही अशी स्थिती असून तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)