शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

वाहन परवान्यासाठी रांगेत चार तासांची ‘शिक्षा’

By admin | Updated: March 20, 2017 02:17 IST

वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ

नवी मुंबई : वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. पैसे भरणे व छायाचित्र काढण्यासाठी तब्बल चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. कार्यालयातील संगणक प्रणाली वारंवार बंद होत असून प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई आरटीओ कार्यालयाविषयी नागरिकांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एपीएमसीमधील भाडेतत्त्वाने घेतलेल्या गाळ्यामध्ये कार्यालय सुरू असून येथे येणाऱ्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. आरटीओ कर्मचारी नागरिकांना गुलामाप्रमाणे वागवत आहेत. शनिवारी वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अक्षरश: चार तास उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी पैसे भरून घेण्यासाठी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. पैसे भरून घेणारे कर्मचारी अत्यंत धीम्या गतीने काम करत होते. शिवाय नागरिक रांगेत उभे असताना अनेक एजंट व राजकीय वशिलेबाजी घेवून आलेल्या नागरिकांचे पैसे थेट आतमधून भरून घेतले जात होते. अनेक एजंट थेट आतमध्ये जावून पैसे भरून घेत होते. पैसे भरून झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी पुन्हा रांग लावावी लागली. वास्तविक पैसे भरल्यानंतर टोकन नंबर दिलेला असताना पुन्हा रांग लावण्याची गरजच नाही, पण टोकन नंबर फक्त नावालाच आहेत. कार्यालयाच्या मधल्या पॅसेजमध्ये रांग लावावी लागते. तेथे उभे राहण्यासाठीही जागा नाही. कार्यालयातील कागदांच्या गोणी त्याच परिसरामध्ये अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. नागरिकांना बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. तीव्र उकाड्यामुळे अनेकांना भोवळ येत असून नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी पावणेबारा वाजता रांग लावलेल्या नागरिकांना पैसे भरण्यासाठी व फोटो काढून घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजले. यामुळे वाहन चालकाच्या परवान्यासाठीची परीक्षा न देताच परत फिरावे लागले. एवढा उशीर का होत आहे याविषयी विचारणा केली असता कर्मचारी सर्व्हर खराब आहे. संगणक बरोबर नाही अशी उत्तरे देत होते. अनेक वेळा नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. आरटीओ कार्यालयात नागरिकांना वाहन चालकाचा परवाना कसा मिळवायचा, कशी अपॉर्इंटमेंट घ्यायची याविषयी माहिती देण्याची काहीही यंत्रणा शिल्लक नाही. एजंटची मदत घेतल्याशिवाय येथील एकही काम होवू शकत नाही अशी स्थिती असून तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)