शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

रेवस-रेड्डी महामार्गात ऑलिव्ह रिडले कासवांची चार उत्पत्ती स्थाने होणार बाधित

By नारायण जाधव | Updated: August 7, 2023 17:30 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे.

नवी मुंबई : राज्य सरकारडून सध्या सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या एक दशकाहून अधिक काळ रखडलेले असतानाच आता रस्ते विकास महामंडळाने मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी प्रस्तावित केलेल्या रेवस ते रेड्डी या नव्या सागरी महामार्गाच्या पॅकेज दोनच्या कामात जगप्रसिद्ध ऑलिव्ह रिडले कासवांच्या चार उत्पत्ती स्थानांसह चार हेक्टर खारफुटी बाधित होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामाचा पॅकेज दोनमध्ये समावेश आहे.

कॅलिफोर्निया सागरी महामार्गाच्या धर्तीवर कोकणाच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत या सागरी महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्यावर्षी मार्च महिन्यात मान्यता दिली होती. ४९८ किमीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी १० हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित असून, चार पॅकेजमध्ये सात टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. यानुसार काही ठिकाणी तो चौपदरी तर काही ठिकाणी दुपदरी असणार आहे. यामुळे कोकण आणि गोवा एका नव्या मार्गाने जोडले जाणार आहे.

२२ अटींसह सीआरझेडची मंजुरी

या महामार्गाच्या पॅकेज दोनमधील बाणकोट ते जयगड या रत्नागिरी जिल्ह्यातील कामांचा प्रस्ताव सीआरझेड प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. त्यात या महामार्गांच्या कामात जगप्रसिद्ध ऑलिव्ह रिडले कासवांच्या चार उत्पत्ती स्थानांसह चार हेक्टर खारफुटी बाधित होणार आहे. मात्र, खारफुटीची एकूण किती झाडे बाधित होणार हे या प्रस्तावात नमूद केलेले नाही. तर ऑलिव्ह रिडलेच्या चारपैकी तीन उत्पत्ती स्थाने महामार्गापासून ५० मीटरहून अधिक अंतरावर असल्याने त्यांना धोका नसल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यामुळे या कामास २२ अटींंसह मंजुरी देताना पर्यावरणीय दृष्टीची संवेदनशीलता बघून सीआरझेडने हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी परिवेश समितीकडे पाठविला आहे.

ही आहेत ती ऑलिव्ह रिडलेची चार उत्पत्ती स्थाने

रेवस ते रेड्डी या नव्या सागरी महामार्गाच्या बाणकोट ते जयगड बंदरापर्यंतच्या ११५ किलोमीटरपर्यंतच्या कामात १० किमीच्या परिघात केळशी ५० मीटर, वेळास १३० मीटर, अंजर्ले २१० मीटर अंतरावर आहे. हे अंतरावर तसे लांब असल्याने कासवांच्या उत्पत्तीत धोका नसल्याचा दावा रस्ते विकास मंडळाने केला आहे. तर दाभोळचे उत्पत्ती स्थळ पूर्णत: बाधित होत आहे. यामुळे मँग्रोव्ह सेलने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे नसल्याचे निरीक्षण सीआरझेडने नोंदविले आहे.असे सीआरझेड क्षेत्र होतेय बाधितखारफुटीचे क्षेत्र - ४.०९ हेक्टर५० मीटर बफर झोन - १.१७ हेक्टरकासव उत्पत्ती स्थळ - ०.३७ हेक्टरभरती रेषेच्या आतील क्षेत्र - ६.४५ हेक्टर५०० मीटरच्या आतील क्षेत्र -३३.२५ हेक्टरनाविकास क्षेत्र - ५२.६४ हेक्टरसीआरझेड ४ ब क्षेत्र - ७.०२ हेक्टर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई