शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

घणसोली परिसरात कामे करताना रस्ता व पदपथामध्ये चार फुटांचे अंतर; डांबरीकरणात हलगर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:14 IST

ठेकेदारांच्या कामचुकारपणामुळे धोका

नवी मुंबई : रस्त्यांच्या डांबरीकरणात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. पदपथापर्यंत डांबरीकरण न करता, तीन ते चार फुटांचे अंतर रिकामे सोडण्यात येत आहे. यामुळे असमानता निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

शहरात सध्या महापालिकेमार्फत विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यात रस्ते व पदपथ दुरुस्तीच्या कामांचाही समावेश आहे, परंतु रस्त्यांच्या डांबरीकरणात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते आहे.  अनेक ठिकाणी सुस्थितीतील रस्त्यांचेही डांबरीकारण सुरू असल्याने ठेकेदारांना पोसण्यासाठी कामे दिली जात आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे, तर कामात हलगर्जी होत असतानाही अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असताना  पदपथालगतचा सुमारे तीन ते चार फुटांचा रस्ता रिकामा सोडल्याचा प्रकार घणसोलीसह अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणतेही ठोस कारण नसताना रस्त्यालगतच्या भागात डांबरीकरण अर्धवट सोडले आहे. यामुळे रस्ता आणि पदपथ यामध्ये तीन ते चार फुटांचे अंतर पडले आहे. परिणामी, मागून येणाऱ्या जड अवजड वाहनाला मार्ग देण्यासाठी एखादी दुचाकी रस्त्याच्या कडेला गेल्यास अपघात होऊ शकतो. डांबरीकरणामुळे दोन ते तीन इंचाने रस्त्याची उंची वाढली आहे. पदपथ लगतचा भाग रिकामा सोडल्याने फट निर्माण झाली आहे. शिवाय त्या ठिकाणी सांडपाणीही साचू शकते. यामुळे ठेकेदारांच्या हलगर्जीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.