शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील सेंट्रलपार्कचा प्रशासनाला पडला विसर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:58 IST

घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही. यामुळे या सेंट्रल पार्कचा शासनाला विसर पडला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने घणसोली येथे सेंट्रल पार्क विकसित केले आहे. त्याकरिता सावली गावातील काही घरे हटविण्यात आली होती. यामुळे सुरुवातीपासूनच हे पार्क वादात सापडले होते. त्यानंतर, प्रत्यक्षात पार्कच्या कामाला सुरुवात झाल्यानंतरही अनेक कारणांनी अडथळे निर्माण झाले होते. अनेक अडथळ्यांनंतर दोन वर्षांपूर्वी पार्कचे काम पूर्ण होऊनदेखील त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. यामुळे पार्कमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. येथील तरणतलावाची नियमित देखभालही प्रशासनाला डोईजड झाली आहे. हा नोड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर, घणसोलीकरांच्या सेंट्रल पार्ककडे नजरा लागल्या होत्या.लहान मुलांच्या खेळण्यासह, ज्येष्ठांचा विरंगुळा, तरणतला, स्केटिंग आदी सुविधा त्यामध्ये पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरात लवकर हे उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यानुसार, काही राजकीय व्यक्तींनी प्रशासनाने पार्क खुले न केल्यास, आपण ते खुले करू, अशा प्रकारच्या पोकळ घोषणा करून स्थानिकांच्या भावनांचा राजकीय वापर करण्याचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात वापरायोग्य स्थितीत असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे धाडस कोणीच केले नाही. परिणामी, प्रशासनालादेखील उद्घाटनाचा विसर पडला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पार्कमध्ये तरणतलावासह, स्केटिंग, फुटबॉल टर्फ मैदान यासह लहान मुलांच्या विरंगुळ्याची साधने पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे या पार्कच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे, परंतु प्रशासन व सत्ताधारी यांच्या उदासीनतेमुळे लहान मुलांसह नागरिकांना कुंपणाबाहेरूनच पार्कमधील सुविधांचे दर्शन घ्यावे लागत आहे. या संदर्भात महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.सेंट्रल पार्क वापरासाठी खुले होत नसल्याने लहान मुलांची गैरसोय होते. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले उद्यान धूळखात आहे. प्रशासनाने हे पार्क खुले करावे.- प्रकाश पाटील,रहिवाशी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई