शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील सेंट्रलपार्कचा प्रशासनाला पडला विसर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:58 IST

घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही. यामुळे या सेंट्रल पार्कचा शासनाला विसर पडला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने घणसोली येथे सेंट्रल पार्क विकसित केले आहे. त्याकरिता सावली गावातील काही घरे हटविण्यात आली होती. यामुळे सुरुवातीपासूनच हे पार्क वादात सापडले होते. त्यानंतर, प्रत्यक्षात पार्कच्या कामाला सुरुवात झाल्यानंतरही अनेक कारणांनी अडथळे निर्माण झाले होते. अनेक अडथळ्यांनंतर दोन वर्षांपूर्वी पार्कचे काम पूर्ण होऊनदेखील त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. यामुळे पार्कमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. येथील तरणतलावाची नियमित देखभालही प्रशासनाला डोईजड झाली आहे. हा नोड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर, घणसोलीकरांच्या सेंट्रल पार्ककडे नजरा लागल्या होत्या.लहान मुलांच्या खेळण्यासह, ज्येष्ठांचा विरंगुळा, तरणतला, स्केटिंग आदी सुविधा त्यामध्ये पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरात लवकर हे उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. त्यानुसार, काही राजकीय व्यक्तींनी प्रशासनाने पार्क खुले न केल्यास, आपण ते खुले करू, अशा प्रकारच्या पोकळ घोषणा करून स्थानिकांच्या भावनांचा राजकीय वापर करण्याचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात वापरायोग्य स्थितीत असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे धाडस कोणीच केले नाही. परिणामी, प्रशासनालादेखील उद्घाटनाचा विसर पडला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.पार्कमध्ये तरणतलावासह, स्केटिंग, फुटबॉल टर्फ मैदान यासह लहान मुलांच्या विरंगुळ्याची साधने पुरविण्यात आली आहेत. त्यामुळे या पार्कच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे, परंतु प्रशासन व सत्ताधारी यांच्या उदासीनतेमुळे लहान मुलांसह नागरिकांना कुंपणाबाहेरूनच पार्कमधील सुविधांचे दर्शन घ्यावे लागत आहे. या संदर्भात महापौर जयवंत सुतार व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.सेंट्रल पार्क वापरासाठी खुले होत नसल्याने लहान मुलांची गैरसोय होते. तर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले उद्यान धूळखात आहे. प्रशासनाने हे पार्क खुले करावे.- प्रकाश पाटील,रहिवाशी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई