शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:37 IST

राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे.

नवी मुंबई : राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे. २५ सप्टेंबरला होणा-या मेळाव्यामध्येही प्रलंबित प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी २५ सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित असतात. यामुळे संघटनेच्यावतीने कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीचे निवेदन देण्यात येते. दोन दशकांमध्ये बहुतांश प्रश्न समान असून ते सोडविण्याकडे शासनाला अपयश येवू लागले आहे. वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यात यावा. बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमधील कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात यावे. माथाडी मंडळांवर कामगारांच्या प्रमाणामध्ये संघटनेच्या सदस्यांची नेमणूक करण्यात यावी. कळंबोली स्टील मार्केट, पुणे गुलटेकडी मार्केट, नाशिक बाजार समिती, मापाडी कामगार व इतर ठिकाणच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.माथाडी कामगार नेते प्रत्येक मेळाव्यामध्ये पोटतिडकीने समस्या मांडतात. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री प्रश्न सोडविण्याची आश्वासने देतात. कामगार टाळ्या वाजवून नेत्यांच्या आश्वासनांचे स्वागत करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र बहुतांश प्रश्न सुटतच नाहीत. पुन्हा दुसºया वर्षीच्या मेळाव्यात त्याच प्रश्नांचे निवेदन द्यावे लागत आहे. जवळपास २० वर्षे त्याच प्रश्नांचे निवेदन द्यावे लागत असल्याचे आता कामगारांच्याही सर्व मागण्या पाठ होवून गेल्या आहेत. कामगारांचे प्रश्न युद्धपातळीवर सोडविण्यात यावेत, अशी मागणी केली जात असून आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती होणार का याकडे कामगारांचे लक्ष आहे.पवार, फडणवीस एकत्रराष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून माथाडी कामगार पक्षाबरोबर आहेत. आमदार शशिकांत शिंदे चार वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असून नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर पाठविले आहे. परंतु एक वर्षापासून पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू आहे. माथाडी मेळाव्यामध्ये शरद पवार व देवेंद्र फडणवीस एकत्र येणार असून राजकीयदृष्ट्याही या मेळाव्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस