शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

पाच वर्षे सलग २५० रविवारी केली दुर्गभ्रमंती, पाच राज्यांमधील किल्ल्यांचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:49 IST

forts : दुर्गसंवर्धन चळवळीत सह्याद्री प्रतिष्ठानचे योगदानही महत्त्वाचे आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध गड, किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. गणेश रघुवीर संवर्धन विभागाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या गड, किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था १५ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेच्या गडसंवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी पाच वर्षांत सलग २५० रविवारी दुर्गभ्रमंती करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला असून, संवर्धन मोहिमेचे चळवळीत रूपांतर केले आहे.दुर्गसंवर्धन चळवळीत सह्याद्री प्रतिष्ठानचे योगदानही महत्त्वाचे आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध गड, किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. गणेश रघुवीर संवर्धन विभागाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. महाविद्यालयीन जीवनात दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली व सह्याद्री प्रतिष्ठानशी संपर्क आल्यानंतर, या आवडीचे ध्येयामध्ये रूपांतर निर्माण झाले. २०१६ मध्ये प्रत्येक रविवारी दुर्गभ्रमंती करण्यास सुरुवात केली. काही वेळेला रविवारला लागून इतर दिवशीही भ्रमंती सुरू झाली. पाच वर्षांमध्ये सलग २५० रविवारी भटकंती सुरू आहे. गणेश यांनी सन २००९ पासून आतापर्यंत १,११२ किल्ले पाहिले आहेत. यामधील ८०० पेक्षा जास्त किल्ले पाच वर्षांमध्ये पाहिले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूमधील गडकिल्ल्यांचाही अभ्यास केला आहे.गड, किल्ल्यांचा सखोल अभ्यास हा या भटकंतीमागील मुख्य उद्देश. पुरातन बांधकामांचा अभ्यास करणे, गडाची सद्यस्थिती पाहून तेथे संवर्धन मोहीम सुरू करणे, गडावरील तोफांची लांबी, रुंदी व इतर तपशीलाच्या नोंदी ठेवणे, गडावरील पुरातन अवशेष, शिलालेख व इतर गोष्टींचा अभ्यास करण्यास प्राधान्य दिले आहे. भटकंतीमधून आलेल्या अनुभवातून दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभागी झालेल्या शिलेदारांना मार्गदर्शन केले जात आहे. गड कसा पाहावा, नोंदी कशा ठेवाव्या, पाठपुरावा कशा प्रकारे केला जावा, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. भ्रमंती करत असतानाच संवर्धन मोहिमांवर लक्ष केंद्रित केले असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक हजारापेक्षा जास्त संवर्धन मोहिमा राबविण्यास यश आले आहे. १० जानेवारी, २०१६ला तालुक्यातील ढाक बहिरी गडावरून भ्रमंती अभियानास सुरुवात केली होती. २० ऑक्टोबर, २०२०ला पाच वर्षांनंतर २५०व्या रविवारी पुन्हा ढाक बहिरी गडावरच भ्रमंतीचे आयोजन केले होते. हा समारोप नाही. भविष्यात ही दुर्गभ्रमंती व संवर्धन अभियान अखंड सुरू राहणार असल्याचा विश्वास गणेश रघुवीर यांनी व्यक्त केला आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गसंवर्धनाचे काम सुरू आहे. गड, किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक रविवारी भ्रमंती सुरू केली, पाच वर्षांत २५० रविवार पूर्ण झाले. या कालावधीत पाच राज्यांमधील गड, किल्ल्यांचा अभ्यास करता आल्याचा आनंद असून, या अनुभवाचा भविष्यात गड संवर्धनासाठी वापर केला जाईल.    - गणेश रघुवीर, अध्यक्ष     सह्याद्री प्रतिष्ठान, गड संवर्धन विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFortगड