शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सूर्या नदीवर बांधणार पाच कोकण पद्धतीचे बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:41 IST

घोळ येथील बंधाऱ्याचे झाले उद्घाटन; एकूण ५० कोटींचा होणार खर्च

कासा : सूर्या नदीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे काेकण पद्धतीचे पाच बंधारे बांधले जाणार आाहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत कवडास उन्नयी बंधाऱ्याच्या अधोभागात सूर्या नदी पात्रात डहाणू तालुक्यात घोळ आंबिवली, उर्से व पालघर तालुक्यातील चिंचारे व गारगाव अशा पाच ठिकाणी हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.घोळसाठी सहा कोटी ७५ लाख, आंबिवली सात कोटी २३ लाख, उर्से दहा कोटी ७० लाख, चिंचारे १३ कोटी ९९ लाख, गारगाव सात कोटी ३७ लाख मंजूर झाला आहे. आंबिवलीच्या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता ०.५४४ द.ल.घ.मी., उर्से ०.७४८ दलघमी, गारगाव ०.६४४ दलघमी, घोळ ०.१६२ दलघमी, चिंचारे ०.१९२ दलघमी एवढी आहे. तर एकूण २.२९ दलघमी एवढी आहे. सूर्या नदीवरील घोळ येथील बंधाऱ्याचे उद्घाटन नुकतेच पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले. यावेळी गावित यांनी या बंधाऱ्याचा नजीकच्या गावातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पं.स.सदस्य अरुण कदम, कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव व नागरिक उपस्थित होते.पाण्याची पातळी वाढणारबंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या पाण्यातून उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होणार असून, या भागातील पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे. तसेच येथील नागरिकांना नदी पार करण्यासाठी बंधाऱ्यावर रस्ता साडेतीन ते चार मीटर ठेवला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.