शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

यंदा दिवाळीतच चाखा हापूस आंब्याची चव; पहिली पेटी बाजार समितीत दाखल; जुलै महिन्यातच मोहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 09:30 IST

रत्नागिरीच्या करबुडे गावाला मान

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आंबा हंगामामध्ये मुहूर्ताच्या पेटीला विशेष महत्त्व असते.  प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाल्याने यंदा दिवाळीतच जगप्रसिद्ध हापूसची चव चाखता येणार आहे. 

जुलै महिन्यातच मोहर

फळांच्या राजाचा हंगाम फेब्रुवारी ते जुलैपर्यंत सुरू असताे. परंतु, काही झाडांना लवकर मोहर येतो व तो आंबा डिसेंबरच्या दरम्यान मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतो. रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे येथील शेतकरी रूपेश शितप यांच्या बागेतील एक झाडाला जुलै महिन्यातच मोहर आला होता. या मोहराची काळजी घेऊन योग्य औषधांची फवारणी करून जतन केले होते. ऑक्टोबरच्या अखेरीस चार डझन आंबे काढून ते विक्रीसाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठविले आहेत.

पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये आवक

मुंबई बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच नोव्हेंबरच्या सुरुवातीला आंब्याची आवक झाली आहे. आंब्याचा दर्जा फारसा चांगला नसल्यामुळे त्याला नक्की किती भाव मिळतो याविषयी उत्सुकता आहे. ही आंबा हंगामाची सुरुवात नसली तरी मुहूर्त झाला ही सकारात्मक घटना समजली जात आहे.

टॅग्स :MangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई