शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसह अग्निशमन विभाग सक्षम होणार; अग्निशमन जवानांचा ताण कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:27 IST

आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे.

नवी मुंबई : आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये या विभागामधील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार असून, जादा मनुष्यबळामुळे शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये आरोग्य विभागावर वारंवार टीका होत असते. मनुष्यबळ कमी असल्यामुळे ऐरोली, नेरुळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत. अग्निशमन दलामध्येही कर्मचारी कमी असल्यामुळे उपलब्ध जवानांवरील ताण वाढला होता. अनेक कर्मचाºयांना जादा वेळ काम करावे लागत होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर करून घेतला. आरोग्य विभागाकडून कॉलेज आॅफ फिजिशिअन अ‍ॅण्ड सर्जन पदवी व पदविका अभ्यासक्र म सुरू केला आहे. यामधून महानगरपालिकेस ४० हून अधिक डॉक्टर्स उपलब्ध झालेले असून, या नियोजित भरतीद्वारे इतर आवश्यक वैद्यकीय कर्मचारी महानगरपालिकेस उपलब्ध होऊन ही रु ग्णालये सक्षमपणे रु ग्णसेवा पुरविणार आहेत. अग्निशमन अधिकारी व कर्मचाºयांना जादा कामासाठीचा भत्ता वाढवून दिला आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही विभागांत तब्बल ४४८ पदे भरली जाणार आहेत. भरतीविषयी माहिती महापरीक्षा पोर्टल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १३ ते १६ आॅक्टोबरच्या दरम्यान परीक्षा होणार आहेत.कर्मचारी भरतीमुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार आहे. महापालिका कोपरखैरणेमध्ये नवीन केंद्र सुरू करणार आहे; परंतु कर्मचारी नसल्यामुळे ते सुरू करता आले नव्हते. शहराची लोकसंख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक महत्त्वाची कार्यालये मनपा क्षेत्रामध्ये आहेत. आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. संपूर्ण मनपा क्षेत्राचा भार फक्त १३९ अधिकारी व कर्मचाºयांवर अवलंबून आहे. महापालिका २६० पदांची भरती करणार असल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांची संख्या पूर्वीपेक्षा अडीचपट वाढणार आहे.भूलथापांना बळी पडू नकामहापालिकेच्या वतीने प्रथमच संपूर्ण भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. आॅनलाइन परीक्षा पद्धतीमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. पूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून, नोकरी लावण्याचे आमिष दाखविणाºयांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई