शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसह अग्निशमन विभाग सक्षम होणार; अग्निशमन जवानांचा ताण कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:27 IST

आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे.

नवी मुंबई : आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये या विभागामधील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार असून, जादा मनुष्यबळामुळे शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये आरोग्य विभागावर वारंवार टीका होत असते. मनुष्यबळ कमी असल्यामुळे ऐरोली, नेरुळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत. अग्निशमन दलामध्येही कर्मचारी कमी असल्यामुळे उपलब्ध जवानांवरील ताण वाढला होता. अनेक कर्मचाºयांना जादा वेळ काम करावे लागत होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर करून घेतला. आरोग्य विभागाकडून कॉलेज आॅफ फिजिशिअन अ‍ॅण्ड सर्जन पदवी व पदविका अभ्यासक्र म सुरू केला आहे. यामधून महानगरपालिकेस ४० हून अधिक डॉक्टर्स उपलब्ध झालेले असून, या नियोजित भरतीद्वारे इतर आवश्यक वैद्यकीय कर्मचारी महानगरपालिकेस उपलब्ध होऊन ही रु ग्णालये सक्षमपणे रु ग्णसेवा पुरविणार आहेत. अग्निशमन अधिकारी व कर्मचाºयांना जादा कामासाठीचा भत्ता वाढवून दिला आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही विभागांत तब्बल ४४८ पदे भरली जाणार आहेत. भरतीविषयी माहिती महापरीक्षा पोर्टल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १३ ते १६ आॅक्टोबरच्या दरम्यान परीक्षा होणार आहेत.कर्मचारी भरतीमुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार आहे. महापालिका कोपरखैरणेमध्ये नवीन केंद्र सुरू करणार आहे; परंतु कर्मचारी नसल्यामुळे ते सुरू करता आले नव्हते. शहराची लोकसंख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक महत्त्वाची कार्यालये मनपा क्षेत्रामध्ये आहेत. आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. संपूर्ण मनपा क्षेत्राचा भार फक्त १३९ अधिकारी व कर्मचाºयांवर अवलंबून आहे. महापालिका २६० पदांची भरती करणार असल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांची संख्या पूर्वीपेक्षा अडीचपट वाढणार आहे.भूलथापांना बळी पडू नकामहापालिकेच्या वतीने प्रथमच संपूर्ण भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. आॅनलाइन परीक्षा पद्धतीमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. पूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून, नोकरी लावण्याचे आमिष दाखविणाºयांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई