शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

आरोग्यसह अग्निशमन विभाग सक्षम होणार; अग्निशमन जवानांचा ताण कमी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:27 IST

आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे.

नवी मुंबई : आरोग्य व अग्निशमन विभाग सक्षम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या विभागामध्ये ४४८ पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये या विभागामधील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार असून, जादा मनुष्यबळामुळे शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये आरोग्य विभागावर वारंवार टीका होत असते. मनुष्यबळ कमी असल्यामुळे ऐरोली, नेरुळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत. अग्निशमन दलामध्येही कर्मचारी कमी असल्यामुळे उपलब्ध जवानांवरील ताण वाढला होता. अनेक कर्मचाºयांना जादा वेळ काम करावे लागत होते. आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पालिकेचा आकृतिबंध शासनाकडून मंजूर करून घेतला. आरोग्य विभागाकडून कॉलेज आॅफ फिजिशिअन अ‍ॅण्ड सर्जन पदवी व पदविका अभ्यासक्र म सुरू केला आहे. यामधून महानगरपालिकेस ४० हून अधिक डॉक्टर्स उपलब्ध झालेले असून, या नियोजित भरतीद्वारे इतर आवश्यक वैद्यकीय कर्मचारी महानगरपालिकेस उपलब्ध होऊन ही रु ग्णालये सक्षमपणे रु ग्णसेवा पुरविणार आहेत. अग्निशमन अधिकारी व कर्मचाºयांना जादा कामासाठीचा भत्ता वाढवून दिला आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही विभागांत तब्बल ४४८ पदे भरली जाणार आहेत. भरतीविषयी माहिती महापरीक्षा पोर्टल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १३ ते १६ आॅक्टोबरच्या दरम्यान परीक्षा होणार आहेत.कर्मचारी भरतीमुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार आहे. महापालिका कोपरखैरणेमध्ये नवीन केंद्र सुरू करणार आहे; परंतु कर्मचारी नसल्यामुळे ते सुरू करता आले नव्हते. शहराची लोकसंख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक महत्त्वाची कार्यालये मनपा क्षेत्रामध्ये आहेत. आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. संपूर्ण मनपा क्षेत्राचा भार फक्त १३९ अधिकारी व कर्मचाºयांवर अवलंबून आहे. महापालिका २६० पदांची भरती करणार असल्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांची संख्या पूर्वीपेक्षा अडीचपट वाढणार आहे.भूलथापांना बळी पडू नकामहापालिकेच्या वतीने प्रथमच संपूर्ण भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. आॅनलाइन परीक्षा पद्धतीमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. पूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून, नोकरी लावण्याचे आमिष दाखविणाºयांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई