शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

अखेर जीवाची बाजी लावणाऱ्या हिराेंना न्याय; २६ अग्निशमन जवानांचा केला सत्कार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 16, 2024 07:15 IST

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर करण्यात आला सत्कार

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: डोंबिवली येथे झालेल्या आगीच्या भीषण दुर्घटनांमध्ये खरी जीवाची बाजी लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अखेर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर सत्कार करण्यात आला. त्यांनी लावलेल्या जीवाच्या बाजी अव्हेरून वरिष्ठांनी त्याचे श्रेय अवघ्या तीन अधिकाऱ्यांना देऊन त्यांचा १ ऑगस्टला सत्कार केला होता. याबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उद्योग मंत्र्यांकडे खंत व्यक्त करताच प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी असलेल्या २६ जणांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डोंबिवली येथे मे महिन्यात भीषण आगीची दुर्घटना घडली होती. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, तर ६६ जण जखमी झाले होते. या बचावकार्यात अंबरनाथ अग्निशमन दलासोबत रबाळे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीदेखील जीवाची बाजी लावली होती. मात्र, १ ऑगस्टला एमआयडीसी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात वरिष्ठांच्या मर्जीतल्या तीन अधिकाऱ्यांना संपूर्ण बचावकार्याचे श्रेय दिले होते. या तीन अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याबाबत अग्निशमन दलाच्या कर्मचारी संघटनेने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, तर कर्मचाऱ्यांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात येताच उद्योग मंत्र्यांनी बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्वच अग्निशमन जवानांचा सत्कार करण्याचे सूचित केले होते.  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्या २६ अग्निवीरांचा सन्मान केला. 

उदय सामंत यांचे मानले आभार

सन्मानसोबत त्यांना प्रोत्साहनपर रकमेचा धनादेशदेखील दिला. त्यामध्ये रबाळे एमआयडीसीच्या १२, अंबरनाथच्या ९, तर तळोजातील ५ अधिकारी व जवानांचा समावेश आहे. हा केवळ सत्कार नसून, भविष्यातल्या दुर्घटनांमध्ये परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिलेले बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तर कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार व्यक्त केले.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल