शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

अखेर जीवाची बाजी लावणाऱ्या हिराेंना न्याय; २६ अग्निशमन जवानांचा केला सत्कार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 16, 2024 07:15 IST

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर करण्यात आला सत्कार

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: डोंबिवली येथे झालेल्या आगीच्या भीषण दुर्घटनांमध्ये खरी जीवाची बाजी लावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अखेर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर सत्कार करण्यात आला. त्यांनी लावलेल्या जीवाच्या बाजी अव्हेरून वरिष्ठांनी त्याचे श्रेय अवघ्या तीन अधिकाऱ्यांना देऊन त्यांचा १ ऑगस्टला सत्कार केला होता. याबाबत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उद्योग मंत्र्यांकडे खंत व्यक्त करताच प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी असलेल्या २६ जणांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डोंबिवली येथे मे महिन्यात भीषण आगीची दुर्घटना घडली होती. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, तर ६६ जण जखमी झाले होते. या बचावकार्यात अंबरनाथ अग्निशमन दलासोबत रबाळे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीदेखील जीवाची बाजी लावली होती. मात्र, १ ऑगस्टला एमआयडीसी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात वरिष्ठांच्या मर्जीतल्या तीन अधिकाऱ्यांना संपूर्ण बचावकार्याचे श्रेय दिले होते. या तीन अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याबाबत अग्निशमन दलाच्या कर्मचारी संघटनेने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, तर कर्मचाऱ्यांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात येताच उद्योग मंत्र्यांनी बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्वच अग्निशमन जवानांचा सत्कार करण्याचे सूचित केले होते.  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्या २६ अग्निवीरांचा सन्मान केला. 

उदय सामंत यांचे मानले आभार

सन्मानसोबत त्यांना प्रोत्साहनपर रकमेचा धनादेशदेखील दिला. त्यामध्ये रबाळे एमआयडीसीच्या १२, अंबरनाथच्या ९, तर तळोजातील ५ अधिकारी व जवानांचा समावेश आहे. हा केवळ सत्कार नसून, भविष्यातल्या दुर्घटनांमध्ये परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिलेले बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तर कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही आभार व्यक्त केले.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल