शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्मशानभूमी मोजतेय अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 23:58 IST

देखभाल दुरुस्तीसाठी पाली ग्रामपंचायतीकडे निधीच नाही

विनोद भोईर

पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीतील एका बाजूच्या जमिनीला भेगा गेल्याने तो भाग कधीही कोसळू शकतो. स्मशानातील व शेडच्या फारशाही तुटल्या आहेत. सभोवताली गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. कोणतीच देखभाल-दुरुस्ती व साफसफाई नाही, अस्वच्छ व सोईसुविधांचा अभाव, जुगारी आणि दारुड्यांचा धुडगूस यामुळे ही स्मशानभूमी मरणासन्न अवस्थेत आली आहे. विशेष बाब म्हणजे या स्मशानभूमीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे निधीच उपलब्ध नाही.

पाली शहराची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. आणि निम्म्याहून अधिक लोक दहनविधीसाठी यावरच अवलंबून आहेत. बऱ्याचदा दहनविधी झाल्यानंतर संबंधित लोक किंवा ग्रामपंचायतमार्फत साफसफाईदेखील केली जात नाही. रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था नाही. विजेचे दिवे लावल्यावर लगेच चोरून नेले जातात. सभोवतालचे संरक्षक कठडे व बसण्यासाठी असलेले बाकडे मोडले आहेत. फारशाही तुटल्या आहेत. सभोवतालच्या जमिनीला भेगा पडून जमीन खचली आहे. ती केव्हाही नदीत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. गवत वाढले आहे. लोकांना बसण्यासाठी केलेल्या शेडचे सर्व कडप्पे फोडले आहेत. या ठिकाणी नियमित दारुडे दारू पिण्यासाठी येतात. दारूच्या बाटल्या प्लॅस्टिकची वेष्टणे व ग्लास तिथेच टाकतात. जुगारी तर सर्रास असतात. अनेक वर्षांपासून येथे देखभाल-दुरुस्ती न झाल्याने सर्वकाही मोडकळीस आले आहे. तसेच या ठिकाणी पूर्णवेळ कर्मचारीदेखील नसल्याने अंत्यविधिसाठी आलेल्यांची गैरसोय होत आहे. लाकडांची अनुपलब्धता, अस्वच्छता, दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव त्यात दारुड्यांचा उपद्रव यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. स्मशानभूमीची ग्रामपंचायतीने लागलीच दुरुस्ती करावी. तसेच येथे कायमस्वरूपी माणसाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

सरणासाठी लाकडे मिळविताना होरपळपालीतील एकमेव लाकडांची वखार बंद झाल्याने सरणासाठी लागणारी लाकडे नागोठणे येथून आणावी लागतात. गाडीभाडे पकडून तब्बल ३ ते ४ हजार रुपये खर्च होतात. त्यासाठी वेळ व श्रमदेखील वाया जातात. तिथेही लाकडांची कमतरता भासते. पालीतील सांडपाणी अंबा नदीत सोडले जाते. आणि त्याच ठिकाणी स्मशानभूमी आहे. परिणामी केस कापल्यानंतर अंघोळीसाठी व इतर कामासाठी हे दूषित सांडपाणीच वावरावे लागते.

कोविड आणि कर वसुली होत नसल्याने ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नाही. परिणामी स्मशानभूमीची देखभाल-दुरुस्ती करणे शक्य नाही. मात्र निधी उपलब्ध झाल्यास दुरुस्ती केली जाईल.-ए. एस. जमधाडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, पाली

स्मशानभूमी दुसरीकडे हलवून सर्वांना उपयुक्त ठरेल अशी विद्युत किंवा डिझेलदाहिनी असलेली सोईसुविधांनीयुक्त स्मशानभूमी बनविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या परीने निधी व सहकार्य दिल्यास हे शक्य होईल व लोकांची परवड थांबेल.-विजय मराठे, उपसरपंच, पाली

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई