शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

नैसर्गिक पावसाळी नाल्यात भराव

By admin | Updated: June 8, 2015 04:07 IST

धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे.

कळंबोली : धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे. यामुळे येथील नैसर्गिक नाल्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कॅम्पमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या भरावाबाबत प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.१९६१ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. शासनाने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजण गावालगत केले. प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणी स्थलांतर केले. पुनर्वसनाच्या यातना, हालअपेष्टा सोसत असताना आता काहीशी ही मंडळी स्थिरावली. मात्र त्यांच्यावर पुराचे संकट घोंघावत आहे. भवानी नगर म्हणून ओळखलेल्या धरणा कॅम्पलगत सोळा एकर जमीन आहे. त्या ठिकाणी मोठमोठी गोदामे बांधण्याचे काम संबंधित व्यावसायिकाने हाती घेतले आहे. त्याकरिता त्याने या जमिनीवर सात ते आठ फूट भराव केला. त्यामुळे या ठिकाणी उंचवटा झाला असून गाव खाली राहिले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भवानी नगरमध्ये घुसण्याची शक्यता गडद झाली आहे.पावसाळ्यात गावातील पावसाचे पाणी या नाल्यातून वाहून जात असे. त्यामुळे कुठेही पाणी साचत नव्हते. मात्र संबंधितांनी हा नाला मनमानी करून अडवला. गोदाम मालकाने दमदाटी करून गावकऱ्यांचा आवाज दडपत भराव केला. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी गावातच साचून दलदल, दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणारा किंवा पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोताला बाधा आणणे किंवा त्या नाल्यावर भराव करणे, त्याला अडवणे किंवा बुजवणे ही बाब आपत्ती व्यवस्थापनाला बाधा आणणारी असल्याने संबंधितावर कारवाई होऊ शकते. ग्रामविकास मंडळाने या संदर्भात गृह, पर्यावरण मंत्र्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पनवेलचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे तक्र ार केली आहे.(वार्ताहर)गावठण जागेत अतिक्रमणच्भवानी नगर(धरणा कॅम्प) जवळ मोठ्या प्रमाणात गोदाम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते अधिकृत आहेत की अनधिकृत याची चाचपणी शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत नाही. मात्र त्याचा त्रास येथील गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. च्अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक नाला गोदामवाल्यांनी बंद केला आहेच. त्याचबरोबर कोणताही सर्व्हे न करता गावठाणामधील जागेत अतिक्र मण त्यांनी केले आहे. परिसरात रबर, टायर व टाकाऊ वस्तू दररोज जाळत असल्याने विषारी धूर व दुर्गंधी पसरत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून भाताचे पीक सुध्दा निघत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.