शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

नैसर्गिक पावसाळी नाल्यात भराव

By admin | Updated: June 8, 2015 04:07 IST

धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे.

कळंबोली : धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे. यामुळे येथील नैसर्गिक नाल्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कॅम्पमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या भरावाबाबत प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.१९६१ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. शासनाने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजण गावालगत केले. प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणी स्थलांतर केले. पुनर्वसनाच्या यातना, हालअपेष्टा सोसत असताना आता काहीशी ही मंडळी स्थिरावली. मात्र त्यांच्यावर पुराचे संकट घोंघावत आहे. भवानी नगर म्हणून ओळखलेल्या धरणा कॅम्पलगत सोळा एकर जमीन आहे. त्या ठिकाणी मोठमोठी गोदामे बांधण्याचे काम संबंधित व्यावसायिकाने हाती घेतले आहे. त्याकरिता त्याने या जमिनीवर सात ते आठ फूट भराव केला. त्यामुळे या ठिकाणी उंचवटा झाला असून गाव खाली राहिले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भवानी नगरमध्ये घुसण्याची शक्यता गडद झाली आहे.पावसाळ्यात गावातील पावसाचे पाणी या नाल्यातून वाहून जात असे. त्यामुळे कुठेही पाणी साचत नव्हते. मात्र संबंधितांनी हा नाला मनमानी करून अडवला. गोदाम मालकाने दमदाटी करून गावकऱ्यांचा आवाज दडपत भराव केला. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी गावातच साचून दलदल, दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणारा किंवा पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोताला बाधा आणणे किंवा त्या नाल्यावर भराव करणे, त्याला अडवणे किंवा बुजवणे ही बाब आपत्ती व्यवस्थापनाला बाधा आणणारी असल्याने संबंधितावर कारवाई होऊ शकते. ग्रामविकास मंडळाने या संदर्भात गृह, पर्यावरण मंत्र्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पनवेलचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे तक्र ार केली आहे.(वार्ताहर)गावठण जागेत अतिक्रमणच्भवानी नगर(धरणा कॅम्प) जवळ मोठ्या प्रमाणात गोदाम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते अधिकृत आहेत की अनधिकृत याची चाचपणी शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत नाही. मात्र त्याचा त्रास येथील गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. च्अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक नाला गोदामवाल्यांनी बंद केला आहेच. त्याचबरोबर कोणताही सर्व्हे न करता गावठाणामधील जागेत अतिक्र मण त्यांनी केले आहे. परिसरात रबर, टायर व टाकाऊ वस्तू दररोज जाळत असल्याने विषारी धूर व दुर्गंधी पसरत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून भाताचे पीक सुध्दा निघत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.