शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक पावसाळी नाल्यात भराव

By admin | Updated: June 8, 2015 04:07 IST

धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे.

कळंबोली : धानसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसविण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भवानी नगर (धरणा कॅम्प) या गावालगत सोळा एकर जमिनीवर भराव करण्यात आला आहे. यामुळे येथील नैसर्गिक नाल्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कॅम्पमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या भरावाबाबत प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.१९६१ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करंजावडे गावातून कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे स्थानिक मंडळी बाधित झाली. शासनाने त्यातील काही कुटुंबांचे पुनर्वसन पनवेल तालुक्यातील रोहिंजण गावालगत केले. प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणी स्थलांतर केले. पुनर्वसनाच्या यातना, हालअपेष्टा सोसत असताना आता काहीशी ही मंडळी स्थिरावली. मात्र त्यांच्यावर पुराचे संकट घोंघावत आहे. भवानी नगर म्हणून ओळखलेल्या धरणा कॅम्पलगत सोळा एकर जमीन आहे. त्या ठिकाणी मोठमोठी गोदामे बांधण्याचे काम संबंधित व्यावसायिकाने हाती घेतले आहे. त्याकरिता त्याने या जमिनीवर सात ते आठ फूट भराव केला. त्यामुळे या ठिकाणी उंचवटा झाला असून गाव खाली राहिले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भवानी नगरमध्ये घुसण्याची शक्यता गडद झाली आहे.पावसाळ्यात गावातील पावसाचे पाणी या नाल्यातून वाहून जात असे. त्यामुळे कुठेही पाणी साचत नव्हते. मात्र संबंधितांनी हा नाला मनमानी करून अडवला. गोदाम मालकाने दमदाटी करून गावकऱ्यांचा आवाज दडपत भराव केला. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी गावातच साचून दलदल, दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणारा किंवा पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोताला बाधा आणणे किंवा त्या नाल्यावर भराव करणे, त्याला अडवणे किंवा बुजवणे ही बाब आपत्ती व्यवस्थापनाला बाधा आणणारी असल्याने संबंधितावर कारवाई होऊ शकते. ग्रामविकास मंडळाने या संदर्भात गृह, पर्यावरण मंत्र्यांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पनवेलचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे तक्र ार केली आहे.(वार्ताहर)गावठण जागेत अतिक्रमणच्भवानी नगर(धरणा कॅम्प) जवळ मोठ्या प्रमाणात गोदाम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते अधिकृत आहेत की अनधिकृत याची चाचपणी शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत नाही. मात्र त्याचा त्रास येथील गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. च्अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक नाला गोदामवाल्यांनी बंद केला आहेच. त्याचबरोबर कोणताही सर्व्हे न करता गावठाणामधील जागेत अतिक्र मण त्यांनी केले आहे. परिसरात रबर, टायर व टाकाऊ वस्तू दररोज जाळत असल्याने विषारी धूर व दुर्गंधी पसरत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून भाताचे पीक सुध्दा निघत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.