शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विकासाच्या नावे हजारो हेक्टरवर भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:46 IST

खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल : १२०० हेक्टर पाणथळी, खाजण जमिनी धोक्यात; स्थलांतरित पक्ष्यांचा आवास नष्ट

मधुकर ठाकूर उरण : राज्यातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र असलेल्या उरणमधील १२०० हेक्टर जमिनीवर सिडको, जेएनपीटी आणि इतर प्रकल्पांनी विकासाच्या नावे भराव केला आहे. यामुळे पाणथळ क्षेत्रात येणारे स्थलांतरित आणि दुर्मीळ, विविध प्रजातीचे पक्षी कायमचे दृष्टिआड होऊ लागले आहेत. पाणथळ क्षेत्रातील लाखो खारफुटीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास झाला असून, पक्ष्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाबरोबरच पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे.

भरावामुळे नैसर्गिक नालेही बुजविले गेल्याने पाऊस आणि भरतीचे पाणी थेट गावागावांत शिरू लागले आहे. उरण परिसरात विकास व पायाभूत सुविधांच्या नावाने होणारे अतिक्रमणही वाढले आहे. जेएनपीटी, वन, महसूल, सिडको आणि प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे परिसरातील जैवविविधता, तिवरांचे जंगले आणि स्थलांतरित पक्ष्यांचा आवास नष्ट होत आहे.

उरण तालुका हा राज्यातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र आहे. हे पाणथळ क्षेत्र ३२,६०० हेक्टरवर पसरले आहे. खाजण क्षेत्रात समुद्रकिनाऱ्यावर २६ गावांतील मच्छीमार पारंपरिक मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पाणथळ आणि खाजण क्षेत्रातील जलाशये, खाड्या आणि डोहात पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने विविध प्रजातीतील हजारो स्थलांतरित पक्षी उरण परिसरात वास्तव्यासाठी येतात. पक्ष्यांच्या विलोभनीय हालचाली टिपण्यासाठी या ठिकाणी पक्षिप्रेमींचीही मोठी गर्दी असते.

मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी सिडकोने १९७० मध्ये नवी मुंबईच्या निर्मितीसाठी उरण तालुक्यातील २६ गावांतील २७, १५० हेक्टर शेतजमीन आणि सरकारी खाजण जमिनी ताब्यात घेतल्या. त्यापैकी जेएनपीटी २२४० हेक्टर, एनएमएसईझेडकडे १,२५० हेक्टर आणि सिडकोकडे ५,१२७ हेक्टर पाणथळ व खाजण जमीन आहे.

जेएनपीटी बंदर आणि जेएनपीटी अंतर्गत अन्य चार बंदरांच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. भरावात हजारो हेक्टरमधील तिवरांची वने, पाणथळ, खाजण जमीन नष्ट झाली आहे. या जमिनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अति संवेदनशील असल्याने सीआरझेड कायद्यांतर्गत या जमिनीला संरक्षणही देण्यात आले आहे. मात्र, तरीही अशा हजारो हेक्टर खाजण आणि पाणथळ जमिनी भराव टाकून नष्ट करण्यात येत आहेत. मासळी मिळणेही दुरापास्त झाल्याने उपासमारीचे संकट आल्याचे मच्छीमार कृती समिती संघटनेचे सचिव दिलीप कोळी यांनी सांगितले.

जेएनपीटी, सिडको आणि एनएमएसईझेड आदी प्रकल्पांनी ठिकठिकाणी माती भराव करताना गावागावांतून पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक नाले पूर्णत: बुजवले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी, भरतीचे पाणी थेट सोनारी, जसखार, पागोटे, कुंडेगाव, नवघर, भेंडखळ, फुंडे आदी गावांत शिरू लागले आहे.

उरण येथे द्रोणागिरी नोड परिसरात एनएमएसईझेड प्रकल्पाने १८ मे २०१९ रोजी चार एकर क्षेत्रावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील ४६०० तिवरांची कत्तल करण्यात आल्याची माहिती सागरशक्ती आणि वनशक्ती संघटनेचे एनजीओ नंदकुमार पवार यांनी दिली. तसेच जेएनपीटी दास्तान दरम्यान, जासई, पागोटे आणि भेंडखळ आदी ठिकाणच्या एकूण १३५० हेक्टर पाणथळ जागांवर असलेल्या तिवरांच्या झाडांवर अनधिकृतपणे भराव करण्यात आला. यासाठी आवश्यक परवानगी कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतली नसल्याचे आढळून आले आहे.

मासेमारी, स्थलांतरित पक्षी व तिवरांच्या वने, अशी उरणची पुसली जाणारी ओळख कायम राहवी यासाठी गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली असून, यावर अद्याप सुनावणी असल्याची माहिती नंदकुमार पवार यांनी दिली. पाणथळ आणि खाजण जमिनीवर करण्यात आलेल्या भरावाच्या घटना यापूर्वीच्या आहेत. सिडको अशा प्रकारांना पाठीशी घालत नसल्याचा दावा सिडकोचे पर्यावरण व वने विभागाचे नोडल अधिकारी प्रमोद पाटील यांनी केला आहे. नैसर्गिक नाले पुन्हा प्रवाहित करण्यासाठी खारफुटीची अडचण येत असून, न्यायालय यासाठी अनुकूल नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. जेएनपीटी बंदर उभारणीसाठी सिडकोकडून जागा घेतली आहे. त्या जागेमध्ये मिठागरे आणि शेतजमिनीचाच समावेश आहे. या जागेत पाणथळी आणि खाजण जागेचा समावेश नाही, त्यामुळे अशा जागांवर जेएनपीटीने कोणत्याही प्रकारचा भराव केला नसल्याचा दावा जेएनपीटीचे पीपी अ‍ॅण्ड डी विभागाचे मुख्य प्रबंधक एस. व्ही. मदभावी यांनी माहिती देताना केला आहे.