शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

विकासाच्या नावे हजारो हेक्टरवर भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:46 IST

खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल : १२०० हेक्टर पाणथळी, खाजण जमिनी धोक्यात; स्थलांतरित पक्ष्यांचा आवास नष्ट

मधुकर ठाकूर उरण : राज्यातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र असलेल्या उरणमधील १२०० हेक्टर जमिनीवर सिडको, जेएनपीटी आणि इतर प्रकल्पांनी विकासाच्या नावे भराव केला आहे. यामुळे पाणथळ क्षेत्रात येणारे स्थलांतरित आणि दुर्मीळ, विविध प्रजातीचे पक्षी कायमचे दृष्टिआड होऊ लागले आहेत. पाणथळ क्षेत्रातील लाखो खारफुटीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास झाला असून, पक्ष्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाबरोबरच पारंपरिक मासेमारीही धोक्यात आली आहे.

भरावामुळे नैसर्गिक नालेही बुजविले गेल्याने पाऊस आणि भरतीचे पाणी थेट गावागावांत शिरू लागले आहे. उरण परिसरात विकास व पायाभूत सुविधांच्या नावाने होणारे अतिक्रमणही वाढले आहे. जेएनपीटी, वन, महसूल, सिडको आणि प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे परिसरातील जैवविविधता, तिवरांचे जंगले आणि स्थलांतरित पक्ष्यांचा आवास नष्ट होत आहे.

उरण तालुका हा राज्यातील सर्वात मोठे पाणथळ क्षेत्र आहे. हे पाणथळ क्षेत्र ३२,६०० हेक्टरवर पसरले आहे. खाजण क्षेत्रात समुद्रकिनाऱ्यावर २६ गावांतील मच्छीमार पारंपरिक मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पाणथळ आणि खाजण क्षेत्रातील जलाशये, खाड्या आणि डोहात पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने विविध प्रजातीतील हजारो स्थलांतरित पक्षी उरण परिसरात वास्तव्यासाठी येतात. पक्ष्यांच्या विलोभनीय हालचाली टिपण्यासाठी या ठिकाणी पक्षिप्रेमींचीही मोठी गर्दी असते.

मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी सिडकोने १९७० मध्ये नवी मुंबईच्या निर्मितीसाठी उरण तालुक्यातील २६ गावांतील २७, १५० हेक्टर शेतजमीन आणि सरकारी खाजण जमिनी ताब्यात घेतल्या. त्यापैकी जेएनपीटी २२४० हेक्टर, एनएमएसईझेडकडे १,२५० हेक्टर आणि सिडकोकडे ५,१२७ हेक्टर पाणथळ व खाजण जमीन आहे.

जेएनपीटी बंदर आणि जेएनपीटी अंतर्गत अन्य चार बंदरांच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. भरावात हजारो हेक्टरमधील तिवरांची वने, पाणथळ, खाजण जमीन नष्ट झाली आहे. या जमिनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अति संवेदनशील असल्याने सीआरझेड कायद्यांतर्गत या जमिनीला संरक्षणही देण्यात आले आहे. मात्र, तरीही अशा हजारो हेक्टर खाजण आणि पाणथळ जमिनी भराव टाकून नष्ट करण्यात येत आहेत. मासळी मिळणेही दुरापास्त झाल्याने उपासमारीचे संकट आल्याचे मच्छीमार कृती समिती संघटनेचे सचिव दिलीप कोळी यांनी सांगितले.

जेएनपीटी, सिडको आणि एनएमएसईझेड आदी प्रकल्पांनी ठिकठिकाणी माती भराव करताना गावागावांतून पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक नाले पूर्णत: बुजवले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी, भरतीचे पाणी थेट सोनारी, जसखार, पागोटे, कुंडेगाव, नवघर, भेंडखळ, फुंडे आदी गावांत शिरू लागले आहे.

उरण येथे द्रोणागिरी नोड परिसरात एनएमएसईझेड प्रकल्पाने १८ मे २०१९ रोजी चार एकर क्षेत्रावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील ४६०० तिवरांची कत्तल करण्यात आल्याची माहिती सागरशक्ती आणि वनशक्ती संघटनेचे एनजीओ नंदकुमार पवार यांनी दिली. तसेच जेएनपीटी दास्तान दरम्यान, जासई, पागोटे आणि भेंडखळ आदी ठिकाणच्या एकूण १३५० हेक्टर पाणथळ जागांवर असलेल्या तिवरांच्या झाडांवर अनधिकृतपणे भराव करण्यात आला. यासाठी आवश्यक परवानगी कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतली नसल्याचे आढळून आले आहे.

मासेमारी, स्थलांतरित पक्षी व तिवरांच्या वने, अशी उरणची पुसली जाणारी ओळख कायम राहवी यासाठी गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली असून, यावर अद्याप सुनावणी असल्याची माहिती नंदकुमार पवार यांनी दिली. पाणथळ आणि खाजण जमिनीवर करण्यात आलेल्या भरावाच्या घटना यापूर्वीच्या आहेत. सिडको अशा प्रकारांना पाठीशी घालत नसल्याचा दावा सिडकोचे पर्यावरण व वने विभागाचे नोडल अधिकारी प्रमोद पाटील यांनी केला आहे. नैसर्गिक नाले पुन्हा प्रवाहित करण्यासाठी खारफुटीची अडचण येत असून, न्यायालय यासाठी अनुकूल नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. जेएनपीटी बंदर उभारणीसाठी सिडकोकडून जागा घेतली आहे. त्या जागेमध्ये मिठागरे आणि शेतजमिनीचाच समावेश आहे. या जागेत पाणथळी आणि खाजण जागेचा समावेश नाही, त्यामुळे अशा जागांवर जेएनपीटीने कोणत्याही प्रकारचा भराव केला नसल्याचा दावा जेएनपीटीचे पीपी अ‍ॅण्ड डी विभागाचे मुख्य प्रबंधक एस. व्ही. मदभावी यांनी माहिती देताना केला आहे.