शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल, निष्काळजीपणाचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 07:01 IST

सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दोन वर्षात ५० वेळा पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्याविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. परंतु अनेक वर्षांपासून अपघात होत असलेल्या ठिकाणी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. यामध्ये सानपाड्याजवळील जुई पुलाचा समावेश आहे. पुलाचा जुना व नवीन भाग जोडण्यासाठी ७० ते ८० मीटर लांबीचा लोखंडी रॉल बसविण्यात आला आहे. दोन्ही रॉडमध्ये ७ इंचाचा फरक आहे. याठिकाणी मोटारसायकल घसरून अपघात होत आहे. रोडवर पडलेला मोटारसायकलस्वार स्वत:ला सावरेपर्यंत मागून येणाºया वाहनांची धडक बसून त्याचा मृत्यू होत आहे. शनिवारी सायंकाळी अपघात होऊन मुदस्सर नागरबावडी यांचा मृत्यू झाला. २८ फेब्रुवारीलाही या ठिकाणी अपघात होऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. महिन्यातून चार ते पाच गंभीर अपघात याठिकाणी होऊ लागले आहेत.जुई पुलावर होणाºया अपघाताविषयी वाशी वाहतूक पोलिसांनी २०१६ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जवळपास ५० वेळा पत्रे व स्मरणपत्रे दिली आहेत. अनेक मिटिंगमध्ये या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनीही या विषयावर आवाज उठविला आहे. यापूर्वी नागरिकांनी याठिकाणी आंदोलनही केले होते, परंतु यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही.येथे होणाºया अपघाताला त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.महामार्गावर जुई पुलावरील समस्येविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, परंतु प्रशासनाने दुरुस्तीची कामे केली नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. दुरुस्तीची कामे तत्काळ केली नाहीत तर अपघातांचे सत्र सुरूच राहणार आहे.- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई