शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जुन्या नोटांच्या अध्यादेशाविरोधात जनहित याचिका दाखल

By admin | Updated: January 13, 2017 06:06 IST

ज्यांना डिसेंबर २०१६ नंतर १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बदलायचा असतील, त्यांना

अलिबाग : ज्यांना डिसेंबर २०१६ नंतर १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बदलायचा असतील, त्यांना रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे मार्च २०१७ पर्यंत त्या जमा करता येतील. त्या नोटा कुठून आल्या आणि बँकेत भरायला उशीर का झाला? याबाबतचे स्पष्टीकरण अशा लोकांना लेखी स्वरूपात द्यावे लागेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दूरदर्शन’ वरून केली. त्यानुसार नोटीफिकेशनसुद्धा काढले होते; परंतु त्यानंतर अचानक ३० डिसेंबर, २०१६ रोजी काढलेल्या अध्यादेशात असे म्हणण्यात आले की, जे लोक ८ नोव्हेंबर, २०१६ नंतरच्या कालावधीत परदेशात प्रवास करीत होते, त्यांनाच रद्द केलेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरता येतील. अशा प्रकारे दिशाभूल करणारा अध्यादेश काढणे म्हणजे सामान्य भारतीय जनतेची फसवणूक आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका काँग्र्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. केंद्रीय विधी व न्याय विभाग, अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँक यांना या जनहित याचिकेत प्रतिवादी केल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.पंतप्रधानांनी दूरदर्शनवरून जाहीर भाषणात एक गोष्ट जाहीर करणे, त्यानंतर नोटीफिकेशनद्वारे तसाच निर्णय जाहीर केल्यावर अचानक वेगळा अध्यादेश काढणे म्हणजे ‘जनतेचा विश्वासघात’ आहे, असे जनहित याचिकेत नमूद केले आहे. अशा अनपेक्षित अध्यादेशामुळे सामान्य लोकांना त्यांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागले आहे. नोटांशी संबंधित विषय थेट लोकांच्या क्रयशक्तीशी व पर्यायाने प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या हक्काशी संबंधित आहे. असेही याचिकेत नमूद केल्याचे अ‍ॅड. सरोदे म्हणाले. लवकरच ही जनहित याचिका सुनावणीसाठी येईल व हा अध्यादेश रद्द करण्यात येईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.