शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पार्किंगसाठी नवी मुंबईत मारामाऱ्या आणि खून...; वाहन उभे करण्यावरून सतत भांडणे, पार्किंग करायची कुठे?

By नामदेव मोरे | Updated: January 5, 2024 12:05 IST

रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत.

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबईमध्ये पुरेशा वाहनतळांची निर्मिती करण्यास सिडकोसह महापालिकेला विसर पडला आहे. शहरातील नोंदीत वाहनांची संख्या पाच लाख ६२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. रेल्वे स्थानके वगळता कुठेच वाहनतळाची सोय नसल्यामुळे ही वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगच्या प्रश्नावरून भांडणे वाढली असून ती मारामारीपासून खून करण्यापर्यंत विकोपाला गेली आहेत.

नवी मुंबईमधील तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये ८ ऑगस्टला पार्किंगवरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये नेरूळमध्ये पार्किंगच्या वादातून एकास मारहाण झाली होती. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहने उभी करण्यावरून अशा प्रकारची भांडणे रोज होत आहेत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाचे नियोजनच केले जात नाही. यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात असून पार्किंगचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.

शहरात साडेपाच लाखांहून अधिक वाहने- दहा वर्षांपूर्वी शहरातील वाहनांची संख्या तीन लाख एक हजार ७३१ एवढी होती. दहा वर्षांत ही संख्या तब्बल पाच लाख ६२ हजार ८९१ झाली आहे.- शहरातील निवासी बांधकामांची संख्या दाेन लाख ६३ हजार आहे. याचाच अर्थ प्रत्येक कुटुंबामागे सरासरी दोनपेक्षा जास्त वाहने शहरात आहेत. - ही वाहने उभी करण्यासाठी सिडकोने व महानगरपालिकेने पुरेशा वाहनतळांची निर्मिती केलेलीच नाही.- रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी वाहनतळच नाहीत. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी पदपथांवरही वाहने उभी करावी लागत आहेत. - एपीएमसी परिसरात रोडवर दोन रांगेत वाहने उभी केली जात असून वाहतुकीसाठी एकच लेन मिळत आहे. - सानपाडा, इंदिरानगर, एपीएमसीमधील जोड रस्त्यांचा वापरही पार्किंगप्रमाणे करावा लागत असून वाहनतळाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान पोलिस, सिडको व महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे.

महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विभागात वाहनतळ विकसित करण्यासाठीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सीबीडीमध्ये वाहनतळाचे काम पूर्ण झाले असून शहराची पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू आहे.-राजेश नार्वेकर, आयुक्त, महानगरपालिका

महानगरपालिकेच्या सोबत पार्किंगचे नियोजन करण्यासाठीच्या बैठका सुरू आहेत. वाहनतळांचे नियोजन केले जात असून अवजड वाहनांसाठी पुरेशा वाहनतळांची गरज आहे.- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त वाहतूक

वर्षनिहाय वाढलेल्या वाहनांची संख्यावर्ष     नोंदीत वाहने२०१४    २९,९२७२०१५    ३८,५९४२०१६     ४५,७११२०१७     ४१,६८७२०१८     ४१,९०१२०१९     ४३,०४५२०२०     ३६,४६०२०२१     २४,३५१२०२२     ६१,७८६२०२३     ३७,६८९

नवी मुंबईमधील वाहनांची संख्यावाहन प्रकार     २०१३-१४         २०२२-२३दुचाकी         १,४०,०७२        २,९३,८८८कार             ८९,३६०         १,३९,६३३जीप             ४,०७३        ४,०७०स्टेशन वॅगन    ५७०         ५६९ मीटर टॅक्सी     ८५            ७३५ टुरिस्ट टॅक्सी     ७,६६५        १६,७३४रिक्षा         १२,०९१        ३५,४७०स्टेज कॅरिजेस    ६९            ३४१ कॉन्टॅक्ट कॅरिजेस - ३,१४७        ३,७४१स्कूल बस             ६५६     १,०१५प्रा. स. व्हे.     २८५         ३६२ रुग्णवाहिका    २६६         ३५६ ट्रक             १२,६२३        १७,२७९टँकर         ४,४८३         ५,४६६डिलिव्हरी व्हॅन     १८,६८७         ३२,८८७ट्रॅक्टर         ३३             ५९ ट्रेलर्स         ३,४०२         ३,१०७इतर         ४,१६४         ४,२५८एकूण         ३,०१,७३१        ५,६२,८९१ 

टॅग्स :Parkingपार्किंगNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका