शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लढण्यापूर्वीच सेनेने पत्करली हार

By admin | Updated: May 24, 2017 01:45 IST

गतवर्षी राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे सभापतीपद हिरावून घेणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच हार पत्करली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गतवर्षी राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे सभापतीपद हिरावून घेणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच हार पत्करली. सदस्य निवडीवरून झालेल्या गटबाजीमुळे सभापतीपदाची निवडणूक पक्षाने गांभीर्याने लढलीच नाही. ज्येष्ठ नगरसेवक असताना नवीन सदस्याला संधी देवून निवडणुकीपूर्वीच पराभव पत्करला. सेनेच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादीला झाला व संघर्ष न करता सभापतीपद मिळविण्यात ते यशस्वी ठरले. नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न पुन्हा एकदा अंतर्गत भांडणामुळे धुळीस मिळाले. दोन वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याची एकही संधी त्यांनी दवडली नव्हती. दिघा येथील गवते कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या अनेकांना सेनेत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पुढील महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेण्यास सुरवात केली होती. त्याचाच भाग म्हणून गतवर्षी स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये काँगे्रसच्या पाठिंब्यावर विजय मिळवून सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. यावर्षीही पुन्हा सभापतीपद मिळविण्यासाठी विजय चौगुले, नामदेव भगत यांच्यासह अनुभवी सदस्यांना संधी दिली होती. परंतु सदस्य निवडीवरून पक्षात मतभेद झाले. विजय नाहटा व विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे मूळ यादीमध्ये बदल करून दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. परंतु यामुळे निर्माण झालेले मतभेद मिटले नसल्याने सभापतीपदासाठी काँगे्रसचे मत कोणी वळवायचे व फोडाफोडीचे राजकारण कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीकडे पूर्णपणे पाठ फिरविली. त्यांनी पनवेल व भिवंडी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. काँगे्रसनेही आघाडी धर्म पाळायचा निर्णय घेतला. गतवर्षी काँगे्रसचे मन वळविण्यामध्ये व राष्ट्रवादीच्या सदस्याचा मतदानाचा अधिकार नाकारण्याच्या रणनीतीमध्ये भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी मंदा म्हात्रे व विजय नाहटा यांच्यामधील वादही विकोपाला गेला आहे. यामुळे शिवसेनेच्यावतीने म्हात्रे यांची मदत घेण्यात आली नाही. विजय नाहटा व विठ्ठल मोरे यांनी सभापतीपद मिळवून दाखवावे अशी भूमिका चौगुले गटाने घेतली. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेनेने पराभव मान्य केला होता. अखेर ९ विरूद्ध ७ मतांनी राष्ट्रवादीने विजय मिळविला.