शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

लढण्यापूर्वीच सेनेने पत्करली हार

By admin | Updated: May 24, 2017 01:45 IST

गतवर्षी राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे सभापतीपद हिरावून घेणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच हार पत्करली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गतवर्षी राष्ट्रवादीकडून स्थायी समितीचे सभापतीपद हिरावून घेणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच हार पत्करली. सदस्य निवडीवरून झालेल्या गटबाजीमुळे सभापतीपदाची निवडणूक पक्षाने गांभीर्याने लढलीच नाही. ज्येष्ठ नगरसेवक असताना नवीन सदस्याला संधी देवून निवडणुकीपूर्वीच पराभव पत्करला. सेनेच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादीला झाला व संघर्ष न करता सभापतीपद मिळविण्यात ते यशस्वी ठरले. नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न पुन्हा एकदा अंतर्गत भांडणामुळे धुळीस मिळाले. दोन वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्याची एकही संधी त्यांनी दवडली नव्हती. दिघा येथील गवते कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या अनेकांना सेनेत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पुढील महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेण्यास सुरवात केली होती. त्याचाच भाग म्हणून गतवर्षी स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये काँगे्रसच्या पाठिंब्यावर विजय मिळवून सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. यावर्षीही पुन्हा सभापतीपद मिळविण्यासाठी विजय चौगुले, नामदेव भगत यांच्यासह अनुभवी सदस्यांना संधी दिली होती. परंतु सदस्य निवडीवरून पक्षात मतभेद झाले. विजय नाहटा व विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे मूळ यादीमध्ये बदल करून दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. परंतु यामुळे निर्माण झालेले मतभेद मिटले नसल्याने सभापतीपदासाठी काँगे्रसचे मत कोणी वळवायचे व फोडाफोडीचे राजकारण कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीकडे पूर्णपणे पाठ फिरविली. त्यांनी पनवेल व भिवंडी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. काँगे्रसनेही आघाडी धर्म पाळायचा निर्णय घेतला. गतवर्षी काँगे्रसचे मन वळविण्यामध्ये व राष्ट्रवादीच्या सदस्याचा मतदानाचा अधिकार नाकारण्याच्या रणनीतीमध्ये भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा महत्त्वाचा वाटा होता. यावेळी मंदा म्हात्रे व विजय नाहटा यांच्यामधील वादही विकोपाला गेला आहे. यामुळे शिवसेनेच्यावतीने म्हात्रे यांची मदत घेण्यात आली नाही. विजय नाहटा व विठ्ठल मोरे यांनी सभापतीपद मिळवून दाखवावे अशी भूमिका चौगुले गटाने घेतली. यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेनेने पराभव मान्य केला होता. अखेर ९ विरूद्ध ७ मतांनी राष्ट्रवादीने विजय मिळविला.