शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना तीव्र विरोध

By admin | Updated: October 30, 2014 01:52 IST

ठाणो महापालिकेने अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर, बॅनर यासंदर्भातील तक्रारींसाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.

ठाणो : ठाणो महापालिकेने अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, पोस्टर, बॅनर यासंदर्भातील तक्रारींसाठी सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडला आहे. स्टेशन परिसरात ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सवार्धिक तक्रारी आल्या आहेत. 
सवार्धिक तक्रारी फेरीवाल्यांविषयीच्या आहेत. त्यापाठोपाठ पोस्टर, बॅनरच्याही तक्रारी आल्या आहेत. परंतु, त्यावर केवळ तात्पुरती कारवाई होत आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात व सॅटीसवर या फेरीवाल्यांची गर्दी वाढत आहे. 
ठाणो महापालिकेने फेरीवाला धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आता शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु, वारंवार मुदतवाढ देऊनही फेरीवाल्यांकडून या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रस्ते आणि फुटपाथ खराब करणा:या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांविरोधात किंवा रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकणा:यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले होते. परंतु तरीही फेरीवाले वाढतच आहेत. तक्रारी आल्यास थातूरमातूर कारवाई केली जाते. परंतु, फेरीवाले पुन्हा येतात. पोस्टर, बॅनर व होर्डिग्जसंदर्भातील  तक्रारींवरसुद्धा कारवाई झाली  की नाही, याचे उत्तर मात्र पालिकेकडे नाही. महापालिकेने वर्षभरापूर्वी अनधिकृत बांधकामांसंदर्भात टोल फ्री क्रमांक सुरू केला होता. यावर मागील वर्षात 193 तक्रारी आल्या. यातील काही बांधकामांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, यंदा आतार्पयत या क्रमांकावर 46 तक्रारी आल्या आहेत. सर्वाधिक 14 तक्रारी या मुंब्य्रातील आहेत. त्याखालोखाल वर्तकनगरमधून 1क्, वागळे  इस्टेटमधून तीन, रायलादेवी परिसरातून दोन, माजिवडा- मानपाडा येथून दोन, कळव्यातून दोन आणि कोपरीतून एका तक्रार आली आहे. नौपाडा आणि उथळसर प्रभाग समित्यांमधून एकही तक्रार आलेली नाही. असे असताना एकाही बांधकामावर कारवाई झालेली नाही. 
8क् टक्के कर्मचारी निवडणुकीत व्यग्र  होता. त्यामुळे कारवाई करता आली नाही, अशी माहिती पालिकेने दिली. परंतु, येत्या काही दिवसांत या तक्रारींवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. 
 
एखादा फेरीवाला कचरा करून तो उचलत नसेल आणि ते एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास आले तर त्याने मनपाच्या 18क्क्2221क्8 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहनही महापालिकेने केले होते. 2 सप्टेंबर 2क्14 रोजी हा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला होता.