शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिडको विरोधात विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:32 IST

कारवाईचा निषेध केला असून, सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित ४४ सुरक्षारक्षकांना सिडकोने घरे रिकामे न केल्याचे कारण पुढे करीत, कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोत सेवेत असताना संस्थेच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाई नंतर दहा गावांतील प्रकल्पग्रस्त आक्र मक झाले आहेत. कारवाईचा निषेध केला असून, सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सुरक्षारक्षकांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ओवळे येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीमध्ये सर्वांनीच सिडकोच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. सिडकोने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. पुनर्वसनाच्या पॅकजेसची पूर्तता विनाविलंब करावी. २२ टक्के विकसित भूखंड तत्काळ द्यावेत. घरे रिकामे करण्यासाठी ठरवलेला भत्ता द्यावा व ४४ सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावर घ्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. सिडकोने केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.सुरक्षारक्षकांवर कारवाई करणे, हे हुकूमशाही वृत्तीचे लक्षण आहे. आम्हाला विरोध केल्यास आम्ही तो मोडीत काढू, हेच या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पग्रस्त सिडकोच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले.सुरक्षारक्षकांवर कारवाई करणारे दक्षता अधिकारी विनय कोरगावकर आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पुनर्वसनाचे दिलेले आश्वासन पाळावे, या तीन मागण्यांसाठी येथील दहा गावांतील प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. येथील प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यात भूखंड अद्याप देण्यात आलेले नाहीत. घरांच्या बदल्यात मिळणारी रक्कम, ज्या क्षेत्रात भूखंड देणार आहेत, त्या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा वानवा आहे, अशा वेळी सिडकोने स्वत:ची पुनर्वसनाची जबाबदारी पूर्ण न करता, दडपशाहीने घरे खाली करण्यास भाग पाडले असता, त्याला विरोध करणाºया सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकणे, ही सिडकोची दडपशाही असल्याचे या वेळी बैठकीत सांगण्यात आले. दहा गाव विमानतळग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी २१ दिवसांचे अल्टिमेटम सिडकोला दिले आहे. तीन मागण्या सिडकोपुढे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांची पूर्तता न केल्यास विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या बैठकीला आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, लॉरीमालक-चालक संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रायगड जिल्हा परिषद सदस्य रवि पाटील, अविनाश सुतार, निशांत भगत, डी. के. कोळी, ओवले ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता पाटील, माजी सरपंच महिंद्र पाटील, नरेश घरत, प्रमोद ठाकूर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.सुरक्षारक्षक मंडळाचे सिडकोला पत्रसिडकोने दि. २४ रोजी ४४ सुरक्षारक्षकांना सुरक्षा मंडळात परत पाठविण्याचे जो तडकाफडकी निर्णय घेतला आहे, तो नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या विरोधात आहे. यामुळे ४४ सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.सुरक्षारक्षकांना आस्थापनातून कमी करण्याकरिता कमीत कमी एक महिन्याची नोटीस देणे बंधनकारक असावे, असे पत्र ब्रहन्मुंबई व ठाणे सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी दि. २४ रोजी सिडकोला पत्राद्वारे कळविले आहे.सिडकोने दिलेली पुनर्वसनाची आश्वासने पाळावीत. जोपर्यंत सिडको दिलेली आश्वासने पाळत नाही, तोपर्यंत मी माझे घर रिकामे करणार नाही.- अनिल पाटीलसिडकोने तत्काळ सुरक्षारक्षकांना सेवेत घ्यावे. पुनर्वसनाची दिलेली आश्वासने पाळावीत, तसेच दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, याकरिता आम्ही २१ दिवसांची मुदत देत आहोत. ही आश्वासने न पाळल्यास संपूर्ण आगरी कोळी समाज रस्त्यावर उतरून विमानतळाचे काम बंद पाडेल.- नीलेश पाटील, अध्यक्ष, आगरी कोळी युथ फाउंडेशनसिडकोला जर या ठिकाणाहून विमान उडवायचे असल्यास प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा आम्हाला या ठिकाणचे काम बंद पाडावे लागेल. आमच्या मागण्या मान्य न केल्यास सिडको विरोधात पुन्हा मोठा लढा उभारावा लागेल.- नंदराज मुंगाजी,अध्यक्ष लॉरीचालक-मालक संघटना

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका