शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:35 IST

नेरुळमधील दत्तगुरू सोसायटीमधील १३६ कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी वेळेत देत नाही

नवी मुंबई : नेरुळमधील दत्तगुरू सोसायटीमधील १३६ कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी वेळेत देत नाही. यामुळे रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे.नवी मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींमध्ये नेरुळ सेक्टर ६मधील दत्तगुरू सोसायटीचा समावेश आहे. इमारतीचे जिने, छताचे प्लास्टर वारंवार पडू लागले आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. इमारतीच्या पुनर्बांधणीला परवानगी मिळावी, यासाठी रहिवासी अनेक वर्षांपासून सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु अद्याप परवानगी दिली जात नाही. वाढीव चटईक्षेत्र देण्यासाठी या परिसरामध्ये पालिकेने बांधलेल्या मंडईचा अडसर येऊ लागला आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी या प्रश्नाचे पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. किती दिवस रहिवाशांना पालिकेच्या पायºया झिजविण्यास लावले जाणार आहे. आता सहनशीलतेचा अंत होत असून, ७ दिवसांमध्ये पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनीही पुनर्बांधणीचे प्रस्ताव रखडविले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांची स्थिती गंभीर आहे. कोणत्याही क्षणी इमारती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.