शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

उन्हामुळे मंदावला शेतकरी आठवडे बाजार; उन्हाळ्याला सुरुवात

By योगेश पिंगळे | Updated: February 15, 2024 16:29 IST

हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे शहरातील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला असून नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी आठवडे बाजार सुरू आहेत. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढला असून मुलांच्या परीक्षादेखील सुरू असल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना मिळावा यासाठी शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी योजना राज्यशासनाने मागील काही वर्षांपासून अंमलात आणली आहे. या आठवडे बाजारात ग्राहकांना किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला आणि फळे उपलब्ध होत असल्याने या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी भागात विविध दिवशी बाजार भरतो. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील सुरू आहेत. त्यामुळे आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यामुळे बाजारात दुकाने थाटून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री घटली असून उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा घेऊन जाणे परवडत नाही. यामुळे अनेकवेळा उरलेला शेतमाल फेकून नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी दत्ता शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलFarmerशेतकरीNavi Mumbaiनवी मुंबई