शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

उन्हामुळे मंदावला शेतकरी आठवडे बाजार; उन्हाळ्याला सुरुवात

By योगेश पिंगळे | Updated: February 15, 2024 16:29 IST

हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे शहरातील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला असून नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी आठवडे बाजार सुरू आहेत. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढला असून मुलांच्या परीक्षादेखील सुरू असल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना मिळावा यासाठी शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी योजना राज्यशासनाने मागील काही वर्षांपासून अंमलात आणली आहे. या आठवडे बाजारात ग्राहकांना किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला आणि फळे उपलब्ध होत असल्याने या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी भागात विविध दिवशी बाजार भरतो. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील सुरू आहेत. त्यामुळे आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यामुळे बाजारात दुकाने थाटून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री घटली असून उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा घेऊन जाणे परवडत नाही. यामुळे अनेकवेळा उरलेला शेतमाल फेकून नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी दत्ता शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलFarmerशेतकरीNavi Mumbaiनवी मुंबई