शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे मंदावला शेतकरी आठवडे बाजार; उन्हाळ्याला सुरुवात

By योगेश पिंगळे | Updated: February 15, 2024 16:29 IST

हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे शहरातील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला असून नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी आठवडे बाजार सुरू आहेत. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढला असून मुलांच्या परीक्षादेखील सुरू असल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना मिळावा यासाठी शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी योजना राज्यशासनाने मागील काही वर्षांपासून अंमलात आणली आहे. या आठवडे बाजारात ग्राहकांना किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला आणि फळे उपलब्ध होत असल्याने या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी भागात विविध दिवशी बाजार भरतो. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील सुरू आहेत. त्यामुळे आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यामुळे बाजारात दुकाने थाटून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री घटली असून उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा घेऊन जाणे परवडत नाही. यामुळे अनेकवेळा उरलेला शेतमाल फेकून नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी दत्ता शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलFarmerशेतकरीNavi Mumbaiनवी मुंबई