शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव

By admin | Updated: March 4, 2015 02:28 IST

न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला.

मुंबई : न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जेएनपीटीकरिता ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना तातडीने भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात भूखंडवाटपाची पत्रे देण्यात आली. मात्र भूखंडाचा ताबा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले.जेएनपीटी बंदराकरिता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. मोबदल्यात शेतकऱ्यांना साडेबारा टक्क्यांतून भूखंड देण्याची अट होती. मात्र २५ वर्षांत त्याबाबत सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. मोदी प्रचाराकरिता आले असताना त्यांनी हा अन्याय दूर करण्याचा शब्द दिला होता. १५ आॅगस्ट रोजी एका कार्यक्रमात जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी भूखंडवाटपाची पत्रे दिली. त्या पत्रावर जेएनपीटी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भूखंड मिळावा याकरिता प्रकल्पग्रस्तांनी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा हे भूखंडवाटप चुकीचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले.पंतप्रधान मोदी यांनी खोटी पत्रे देऊन आमची फसवणूक केली, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. आमच्या भूखंडापैकी साडेबारा टक्के भूखंड मिळावा याकरिता पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. (विशेष प्रतिनिधी)