शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव

By admin | Updated: March 4, 2015 02:28 IST

न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला.

मुंबई : न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जेएनपीटीकरिता ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना तातडीने भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात भूखंडवाटपाची पत्रे देण्यात आली. मात्र भूखंडाचा ताबा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिल्याने ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले.जेएनपीटी बंदराकरिता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. मोबदल्यात शेतकऱ्यांना साडेबारा टक्क्यांतून भूखंड देण्याची अट होती. मात्र २५ वर्षांत त्याबाबत सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. मोदी प्रचाराकरिता आले असताना त्यांनी हा अन्याय दूर करण्याचा शब्द दिला होता. १५ आॅगस्ट रोजी एका कार्यक्रमात जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी भूखंडवाटपाची पत्रे दिली. त्या पत्रावर जेएनपीटी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भूखंड मिळावा याकरिता प्रकल्पग्रस्तांनी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा हे भूखंडवाटप चुकीचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले.पंतप्रधान मोदी यांनी खोटी पत्रे देऊन आमची फसवणूक केली, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. आमच्या भूखंडापैकी साडेबारा टक्के भूखंड मिळावा याकरिता पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. (विशेष प्रतिनिधी)