शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसानभरपाईची अपेक्षा, शरद पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 02:40 IST

शरद पवारांना साकडे : मत्स्य दुष्काळामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात

उरण : वातावरणात सातत्याने होणारे बदल, समुद्रात घोंघावणारे वादळांचे वाढते प्रमाण, डिझेल परतावे मिळण्यास दोन-दोन वर्षे होणारा विलंब, परराज्यातील मच्छिमारांचे आक्रमण, मत्स्य दुष्काळ आणि एलईडी मासेमारीचे वाढते प्रस्थ अशा सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमुळे राज्यातील लाखो मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे.

राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये आता दिवसेंदिवस विविध समस्यांची भर पडत चालली आहे. पावसाळी मासेमारी बंदीनंतर मासेमारीचा हंगाम सुरू होताच बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका मच्छीमारांना बसला आहे. यामध्ये लागोपाठ आलेल्या वादळे-चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी राज्यातील मच्छीमारांवर आली. मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमारांना खर्चही निघेनासा झाला आहे.नैसर्गिक आपत्तीनंतर मच्छीमारांना मानवनिर्मित अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी आर्थिक आधार ठरत असलेला डिझेल परताव्याच्या रकमेसाठी दोन- दोन वर्षे विलंब होत आहे. सागरी हद्दीत मिळणाºया मासळीच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि प्रगतशील मच्छीमारांमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहे. राज्याच्या सागरी जलाधीक्षेत्रात मासळी कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे परराज्यातील मच्छीमार बोटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राजरोसपणे मासेमारी करीत आहेत. आपल्याच राज्याच्या हद्दीतून लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांपेक्षा परराज्यातील मासळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.राज्यातीलच चीन बनावटीच्या अत्याधुनिक अनेक मासेमारी हायस्पीड मदर बोटी मोठमोठे विद्युत जनसेटवर व एलईडी लाईट लाऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. वर्षभरातील हंगामात मिळणारी मासळी एलईडीधारक एक महिन्यातच करून पलायन करीत आहेत.याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने आणि प्रगतशिल मच्छीमारी करणाºया मच्छीमारांवर होत आहे. विविध समस्यांमुळे राज्यातील मच्छीमारांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी, राज्यातील मच्छिमारांना शेतकºयांप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी,या मागणीचे निवेदन करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन दिले.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्षनरेश कोळी, गोरक्ष नाखवा, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई