शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसानभरपाईची अपेक्षा, शरद पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 02:40 IST

शरद पवारांना साकडे : मत्स्य दुष्काळामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात

उरण : वातावरणात सातत्याने होणारे बदल, समुद्रात घोंघावणारे वादळांचे वाढते प्रमाण, डिझेल परतावे मिळण्यास दोन-दोन वर्षे होणारा विलंब, परराज्यातील मच्छिमारांचे आक्रमण, मत्स्य दुष्काळ आणि एलईडी मासेमारीचे वाढते प्रस्थ अशा सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमुळे राज्यातील लाखो मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे.

राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये आता दिवसेंदिवस विविध समस्यांची भर पडत चालली आहे. पावसाळी मासेमारी बंदीनंतर मासेमारीचा हंगाम सुरू होताच बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका मच्छीमारांना बसला आहे. यामध्ये लागोपाठ आलेल्या वादळे-चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी राज्यातील मच्छीमारांवर आली. मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमारांना खर्चही निघेनासा झाला आहे.नैसर्गिक आपत्तीनंतर मच्छीमारांना मानवनिर्मित अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी आर्थिक आधार ठरत असलेला डिझेल परताव्याच्या रकमेसाठी दोन- दोन वर्षे विलंब होत आहे. सागरी हद्दीत मिळणाºया मासळीच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि प्रगतशील मच्छीमारांमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहे. राज्याच्या सागरी जलाधीक्षेत्रात मासळी कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे परराज्यातील मच्छीमार बोटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राजरोसपणे मासेमारी करीत आहेत. आपल्याच राज्याच्या हद्दीतून लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांपेक्षा परराज्यातील मासळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.राज्यातीलच चीन बनावटीच्या अत्याधुनिक अनेक मासेमारी हायस्पीड मदर बोटी मोठमोठे विद्युत जनसेटवर व एलईडी लाईट लाऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. वर्षभरातील हंगामात मिळणारी मासळी एलईडीधारक एक महिन्यातच करून पलायन करीत आहेत.याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने आणि प्रगतशिल मच्छीमारी करणाºया मच्छीमारांवर होत आहे. विविध समस्यांमुळे राज्यातील मच्छीमारांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी, राज्यातील मच्छिमारांना शेतकºयांप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी,या मागणीचे निवेदन करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन दिले.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्षनरेश कोळी, गोरक्ष नाखवा, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई