शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

शेतकऱ्यांनो क्षणिक सुखासाठी जमिनी विकू नका; बी. जी. कोळसेपाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:26 IST

उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण परिसराचा वरवर होणारा विकास हा येथील जनतेला भकास करणारा आहे. जमीन ही काळी आई आहे. ती पुन्हा निर्माण होणार नाही. तीला क्षणिक सुखासाठी शेतकऱ्यांनी कवडीमोलाने  विकू नये असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील यांनी शनिवारी उरण येथील एका  जाहीर कार्यक्रमातुन केले.

उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि ५० वर्षातील विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल शनिवारी (७) सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जेएनपीए कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानव जात एक आहे. तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेदभाव का ? असा सवालही कोळसे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्तीचा अधिकार दिला. तर महात्मा फुले,सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करून पुन्हा समाजाला शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला गरीब , अशिक्षित , अज्ञानी ठेवून राज्यकर्ते राज्य करीत आहेत. प्रामाणिकपणा हा न भिणारे जीवन  आहे. शिक्षण हे स्वतंत्र विचार करायला शिकवते म्हणूनच माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजासाठी जगले पाहिजे, निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केले पाहिजे.भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे हक्कासाठी जनशक्ती व अहिंसेच्या मार्गाने  ढण्याचे आवाहनही कोळसे पाटील यांनी केले. 

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, सुरेश ठाकूर, भूषण पाटील,सुधाकर पाटील,गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, नरेश रहाळकर, ॲड .सुरेश ठाकूर, अनिल जाधव, शाम कुलकर्णी , जीवन गावंड, महेश म्हात्रे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.