शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कोकण भवनवर धडक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:43 IST

शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे.

पनवेल - शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे.रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था २३ मार्चपासून धरणे आंदोलन करत आहे. १९६० साली भूसंपादित केलेल्या व प्रकल्पांसाठी न वापरल्या गेलेल्या जमिनी विक्र ी करण्याच्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पुढील नियोजनाबद्दल माहिती देण्यासाठी पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार विवेक पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेचे सहसचिव समीर खाने, सल्लागार मोहन देशमुख, सदस्य लक्ष्मण केदारी यांनी पत्रकारांसमोर भूमिका स्पष्ट केली.शेतकºयांची परिस्थिती मांडताना समीर खाने म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने भूसंपादन कायदा १८९४(भाग-१)प्रमाणे बेसिक केमिकल अ‍ॅण्ड इंटरमेडिएट या केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी व कामगार वसाहतीसाठी पनवेल तालुक्यातील पोसरी, तुराडे, सावळे, देवळोली व दापिवली आणि खालापूर तालुक्यातील पराडे, आंबिवली व वासंबे या गावांची १६०० एकर जमीन संपादित केली. त्यापैकी ३०० एकरवर एच.ओ.सी. कारखाना, २१० एकरवर एच.ओ.सी. कामगार वसाहत उभारण्यात आली. १९७५ साली ५४० एकर जमीन इतर प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने परस्पर दिली. उर्वरित अंदाजे ५५० एकर जागेवर दुबारपिकी, शेती, ग्रामस्थांची घरे, वाडे, वाढीव वसाहती, आदिवासीवाड्या आहेत. कंपनीने न वापरलेली, शेतकºयांच्या ताब्यातील व शेतकºयांच्या उपजीविकेशी निगडित गोष्टी, घरे, वाडे व इतर वसाहती असलेल्या जमिनीचे अवार्ड रद्द करून, ती शेतकºयांना परत मिळावी म्हणून गेली १२ वर्षे शासनस्तरावर चर्चा, बैठका, आंदोलने चालू आहेत. तीन वेळा विधानसभेत रसायनीकरांच्या शेतजमिनी परत कराव्यात, यासाठी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्या