शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कोकण भवनवर धडक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:43 IST

शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे.

पनवेल - शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे.रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था २३ मार्चपासून धरणे आंदोलन करत आहे. १९६० साली भूसंपादित केलेल्या व प्रकल्पांसाठी न वापरल्या गेलेल्या जमिनी विक्र ी करण्याच्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पुढील नियोजनाबद्दल माहिती देण्यासाठी पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार विवेक पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेचे सहसचिव समीर खाने, सल्लागार मोहन देशमुख, सदस्य लक्ष्मण केदारी यांनी पत्रकारांसमोर भूमिका स्पष्ट केली.शेतकºयांची परिस्थिती मांडताना समीर खाने म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने भूसंपादन कायदा १८९४(भाग-१)प्रमाणे बेसिक केमिकल अ‍ॅण्ड इंटरमेडिएट या केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी व कामगार वसाहतीसाठी पनवेल तालुक्यातील पोसरी, तुराडे, सावळे, देवळोली व दापिवली आणि खालापूर तालुक्यातील पराडे, आंबिवली व वासंबे या गावांची १६०० एकर जमीन संपादित केली. त्यापैकी ३०० एकरवर एच.ओ.सी. कारखाना, २१० एकरवर एच.ओ.सी. कामगार वसाहत उभारण्यात आली. १९७५ साली ५४० एकर जमीन इतर प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने परस्पर दिली. उर्वरित अंदाजे ५५० एकर जागेवर दुबारपिकी, शेती, ग्रामस्थांची घरे, वाडे, वाढीव वसाहती, आदिवासीवाड्या आहेत. कंपनीने न वापरलेली, शेतकºयांच्या ताब्यातील व शेतकºयांच्या उपजीविकेशी निगडित गोष्टी, घरे, वाडे व इतर वसाहती असलेल्या जमिनीचे अवार्ड रद्द करून, ती शेतकºयांना परत मिळावी म्हणून गेली १२ वर्षे शासनस्तरावर चर्चा, बैठका, आंदोलने चालू आहेत. तीन वेळा विधानसभेत रसायनीकरांच्या शेतजमिनी परत कराव्यात, यासाठी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्या