शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

न घेतलेल्या कर्जाच्या बोजाप्रकरणी शेतकऱ्याचे पुन्हा पनवेलमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 05:36 IST

पनवेल तालुक्यातील सवणे गावातील शेतक-याने पुन्हा सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न करत तहसीलदार डॉ. अमित सानप यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

कळंबोली : न घेतलेल्या आठ लाखांचा कर्जाचा बोजा बँक आॅफ इंडियाने चढविण्याची तक्रार करत पनवेल तालुक्यातील सवणे गावातील शेतक-याने पुन्हा सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न करत तहसीलदार डॉ. अमित सानप यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मातोश्रीवर जाऊन रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. ती होऊ शकली नसली, तरी हे शेतकरी कुटुंब चर्चेत आले होते.त्यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत त्यांच्याकडील कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी केली. या चर्चेत देशमुख यांनी कर्ज घेतल्याचे स्पष्ट करत बँकेच्या व्यवस्थापकांनी त्याबाबतचे स्टेटमेंटही सादर केले. याबाबतचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सवणे येथील महेंद्र देशमुख यांचे बँक आॅफ इंडियाच्या आपटे शाखेत खाते आहे. त्यात त्यांची काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये होती. २००६ मध्ये यांनी वीटभट्टीसाठी दोन लाखाचे कर्ज घेतले होते. याची मुदत वाढवून २००८ पर्यंत त्यांनी आठ लाखांचे कर्ज आपटे शाखेतून घेतल्याचे बँकेचे म्हणणे आहे. जर मी कर्ज घेतले असते, तर बँक आठ वर्षे थांबली असती का असा प्रश्न देशमुख यांनी विचारला. बँकेने देशमुख यांच्या सावणे येथील १३०२ चौरस फुटाच्या घरावर आठ लाखांच्या कर्जाचा बोजा चढवला.२००८ ला कर्ज घेतले असेल तर २००९ ला बोजा चढवायचे कारण काय असाही प्रश्न देशमुख यांनी केला. देशमुख व त्यांची पत्नी सरिता यांच्या नावे असलेले दोन लाख ८०,००० रुपये बँकेने न विचारताच वळते करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोटाला चिमटे देऊन पै पै जमा केली आणि बँकेच्या अधिकाºयांनी ती परस्पर वळवली, हा अन्याय असल्याचे म्हणणे देशमुख यांनी तहसीलदार डॉ अमित सानप यांच्यासमोर मांडले. याबाबत देशमुख, तहसीलदार डॉ. अमित सानप, आपटा बँक शाखेचे अधिकारी कृषीमंत्री दादा भिसे यांना रात्री भेटले.>आठ दिवसांत अहवाल देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देशपनवेल तालुक्यातील आपटा शाखेतील बँक आॅफ इंडियात फसवणूक झाल्याचा आरोप करीत आंदोलन करणाºया महेंद्र देशमुख या शेतकºयाची कैफियत कृषी मंत्री दादा भुसे यांनी ऐकून घेतली. या प्रकरणाची त्रिस्तरीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाºयांना दिले. विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकºयाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची भावना कृषिमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.>महेंद्र देशमुख कर्ज न घेतल्याचे सांगत आहेत. त्याबाबत त्यांनी काही पत्रव्यवहार केले आहेत. त्यांच्या तक्रारीबाबत बँकेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. बँक व तक्रारदार यांच्या चर्चेअंती तक्रारदाराने कर्ज घेतल्याचे बँक व्यवस्थापकांनी स्पष्ट करीत स्टेटमेंटही सादर केले. पुढील कार्यवाहीसाठी शासनाला कळविण्यात आले आहे.- डॉ. अमित सानप, तहसीलदार