शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

न घेतलेल्या कर्जाच्या बोजाप्रकरणी शेतकऱ्याचे पुन्हा पनवेलमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 05:36 IST

पनवेल तालुक्यातील सवणे गावातील शेतक-याने पुन्हा सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न करत तहसीलदार डॉ. अमित सानप यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

कळंबोली : न घेतलेल्या आठ लाखांचा कर्जाचा बोजा बँक आॅफ इंडियाने चढविण्याची तक्रार करत पनवेल तालुक्यातील सवणे गावातील शेतक-याने पुन्हा सोमवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न करत तहसीलदार डॉ. अमित सानप यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मातोश्रीवर जाऊन रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. ती होऊ शकली नसली, तरी हे शेतकरी कुटुंब चर्चेत आले होते.त्यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत त्यांच्याकडील कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी केली. या चर्चेत देशमुख यांनी कर्ज घेतल्याचे स्पष्ट करत बँकेच्या व्यवस्थापकांनी त्याबाबतचे स्टेटमेंटही सादर केले. याबाबतचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सवणे येथील महेंद्र देशमुख यांचे बँक आॅफ इंडियाच्या आपटे शाखेत खाते आहे. त्यात त्यांची काही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये होती. २००६ मध्ये यांनी वीटभट्टीसाठी दोन लाखाचे कर्ज घेतले होते. याची मुदत वाढवून २००८ पर्यंत त्यांनी आठ लाखांचे कर्ज आपटे शाखेतून घेतल्याचे बँकेचे म्हणणे आहे. जर मी कर्ज घेतले असते, तर बँक आठ वर्षे थांबली असती का असा प्रश्न देशमुख यांनी विचारला. बँकेने देशमुख यांच्या सावणे येथील १३०२ चौरस फुटाच्या घरावर आठ लाखांच्या कर्जाचा बोजा चढवला.२००८ ला कर्ज घेतले असेल तर २००९ ला बोजा चढवायचे कारण काय असाही प्रश्न देशमुख यांनी केला. देशमुख व त्यांची पत्नी सरिता यांच्या नावे असलेले दोन लाख ८०,००० रुपये बँकेने न विचारताच वळते करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोटाला चिमटे देऊन पै पै जमा केली आणि बँकेच्या अधिकाºयांनी ती परस्पर वळवली, हा अन्याय असल्याचे म्हणणे देशमुख यांनी तहसीलदार डॉ अमित सानप यांच्यासमोर मांडले. याबाबत देशमुख, तहसीलदार डॉ. अमित सानप, आपटा बँक शाखेचे अधिकारी कृषीमंत्री दादा भिसे यांना रात्री भेटले.>आठ दिवसांत अहवाल देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देशपनवेल तालुक्यातील आपटा शाखेतील बँक आॅफ इंडियात फसवणूक झाल्याचा आरोप करीत आंदोलन करणाºया महेंद्र देशमुख या शेतकºयाची कैफियत कृषी मंत्री दादा भुसे यांनी ऐकून घेतली. या प्रकरणाची त्रिस्तरीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाºयांना दिले. विभागाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकºयाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची भावना कृषिमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.>महेंद्र देशमुख कर्ज न घेतल्याचे सांगत आहेत. त्याबाबत त्यांनी काही पत्रव्यवहार केले आहेत. त्यांच्या तक्रारीबाबत बँकेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. बँक व तक्रारदार यांच्या चर्चेअंती तक्रारदाराने कर्ज घेतल्याचे बँक व्यवस्थापकांनी स्पष्ट करीत स्टेटमेंटही सादर केले. पुढील कार्यवाहीसाठी शासनाला कळविण्यात आले आहे.- डॉ. अमित सानप, तहसीलदार