शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बाप्पाकडे कोरोनामुक्तीचा आशीर्वाद! नवी मुंबईत अनंत चतुर्दशी दिनी ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना शांततेत निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 01:06 IST

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षी श्रीगणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.

नवी मुंबई : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नियमांच्या चौकटीत संपन्न झाला. अनंत चतुर्दशी दिनी शहरातील घरगुती आणि सार्वजनिक अशा ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये ५४ टक्के मूर्तींचे विसर्जन करीत नागरिकांनी पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले.कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षी श्रीगणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट असल्याने यंदा शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिड दिवसांचा उत्सव साजरा केला, तर अनेकांनी या वर्षी गणेशोत्सव साजरा केला नाही. संपूर्ण विश्वावरील हे कोरोनाचे संकट दूर करा, अशी मागणी करीत, आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये ‘पुढल्या वर्षी लवकर या’ अशी श्रीगणरायाकडे प्रार्थना केली आणि विसर्जनाच्या इतर ४ दिवसांप्रमाणे अनंत चतुर्दशी दिनीही भक्तिमय अंत:करणाने श्रीगणेशाला निरोप दिला.नवी मुंबई महापालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकूण ४,३०४ घरगुती व ३२ सार्वजनिक अशा एकूण ४,३३६ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये पारंपरिक २२ मुख्य विसर्जन स्थळांवर २,१४० घरगुती, तसेच १८ सार्वजनिक अशा २,१५८ श्रीमूर्तींचे, तसेच १३५ कृत्रिम विसर्जन तलावांवर २,१६४ घरगुती व १४ सार्वजनिक २,१७८ मूर्तींचे विसर्जन झाले.शहरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये श्रीमूर्ती संकलन करण्यासाठी फिरत्या वाहनांचे नियोजन केले होते. तर, अनेक नागरिकांनी घरीच विसर्जन केले. विसर्जन स्थळांवर आलेले बहुतांशी नागरिक श्रींची निरोपाची आरती घरीच करून आले होते. वाद्यांच्या गजबजाटाशिवाय अत्यंत शांततेने हा विसर्जन सोहळा पार पडला. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.पनवेलमध्ये बाप्पांना शांततापूर्वक निरोपपनवेल : दहा दिवसांच्या बाप्पांना मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शांततापूर्वक भावनिक निरोप देण्यात आला. बहुतांशी नागरिकांनी आपल्या घरातच कृत्रिमरीत्या तयार केलेल्या विसर्जन ठिकाणी बाप्पांचे विसर्जन केले. पालिकेने ४१ ठिकाणी कृत्रिम विसर्जन घाट तयार केले होते. या विसर्जन घाटांवर नेमलेल्या स्वयंसेवकामार्फत नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन केले. सिडको, पालिका प्रशासन आदींच्या वतीने विसर्जन घाटांवर व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी सूचना देण्यासाठी विसर्जन घाटांवर पोलीसही उपस्थित होते. निवडक लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असल्याने कुठेही गर्दी पाहावयास मिळाली नाही.विसर्जन स्थळी नियोजनबद्ध व्यवस्थामुख्य विसर्जन स्थळांवर विसर्जनाकरिता तराफ्यांची व फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने काठांवर बांबूचे बॅरिकेटिंग करण्यात आले होते, तसेच विद्युत व्यवस्थेसह अत्यावश्यक प्रसंगी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.सर्व विसर्जनस्थळांवर पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. १ हजाराहून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाइफ गाडर््स दक्षतेने तैनात होते.निर्माल्यावर होणार खतनिर्मिती प्रक्रियासर्व विसर्जन स्थळी ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते व हे निर्माल्य वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. अनंत चतुर्दशी दिनी ५ टन २५ किलो निर्माल्य जमा झाले असून, दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीच्या विसर्जनापर्यंत एकूण २५ टन ७८५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्प स्थळी स्वतंत्र खतनिर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवNavi Mumbaiनवी मुंबई