शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

जिते येथील मोकळ्या जागेत फेसाळ पाणी

By admin | Updated: July 6, 2017 06:28 IST

महाड औद्योगिक वसाहत परिसरालगत असलेल्या जिते गावच्या कब्रस्तानालगतच्या मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात फेसाळ पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड औद्योगिक वसाहत परिसरालगत असलेल्या जिते गावच्या कब्रस्तानालगतच्या मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात फेसाळ पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात तीन ते चार कारखाने असून या प्रदूषणाची जबाबदारी नक्की कोणाची हा प्रश्न आहे. टेमघर नाला आणि एम्बायो कारखान्यादरम्यान असलेले हे फेसाळ पाणी दलदल आणि गवतामधून वाहत असल्याने हे पाणी नक्की कोणाचे हे शोधण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.सावित्री नदीच्या प्रदूषणामध्ये टेमघर नाला हा फार महत्त्वाचा आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणारा टेमघर नाला शासनाच्या यादीवर नोंदणीकृत नसल्याने नाल्याला लगत अनेक कारखाने उभारण्यात आले आहेत, यामुळे प्रदूषणकारी कारखान्यांना प्रदूषण करणे सोपे झाले होते. उन्हाळ्याच्या दिवसात नाला आटल्यानंतर प्रदूषणाचे हे प्रमाण कमी असले तरी पावसाळ्यात छुप्या मार्गाने घातक रसायनयुक्त सांडपाणी नाल्यात सोडण्याचे उपद्व्याप अनेक कारखानदार करीत असतात. अशाच प्रकारे मंगळवारी संध्याकाळी जिते गावच्या कब्रस्तानालगत खासगी जागेत मोठ्या प्रमाणात फेसाळ पाणी ग्रामस्थांना आढळून आले. हे पाणी एम्बायो आणि फ्लुबोर कारखान्याच्या लगतच्या परिसरातून पुढे मोकळ्या जागी वाहत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एम्बायो कारखान्यालगत असलेल्या बौद्धवाडीतून एक नाला डोंगरावर पडलेल्या पावसाचे पाणी या परिसरात वाहत आणत असल्याचे एम्बायो कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. डोंगरातील आणि परिसरातील पावसाचे पाणी हा विषय लक्षात घेतला तरी पाण्याला निर्माण होणारा मोठ्या प्रमाणात फेस आणि रासायनिक दुर्गंधी परिसरातील कोणता तरी कारखाना पावसाचा गैरफायदा घेत पाणी प्रदूषित करत असल्याचे सिद्ध करून देत आहे. आमच्याकडून कोणत्याही तऱ्हेचे सांडपाणी बाहेर सोडले जात नाही.- आर. के. गीते, वरिष्ठ व्यवस्थापक पर्यावरण, एम्बायो कारखानाघटनास्थळाला भेट दिली, पाहणी केली असता परिसरात दुर्गंधी आणि फे साळ पाणी निदर्शनास आले. पाणी आणि फेसाचे नमुने गोळा करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषी कारखान्यावर कारवाई करण्यात येईल. - दिनेश वसावा, क्षेत्र अधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळनदीमधील जैवविविधतेची हानी कारखान्यातून निघणारे हे रासायनिक सांडपाणी परिसरातील स्थानिक नाल्यातून टेमघर नाल्यात व पुढे काळ आणि सावित्रीच्या संगमातून खाडीत येवून मिसळते. कारखानदारांच्या या प्रदूषणकारी वृत्तीमुळे कारखान्यांचा आर्थिक फायदा होत असला तरी पर्यावरणाची आणि परिसरातील नदी-नाल्यांमधील जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जिते गावच्या कब्रस्तानालगत असलेल्या या फेसाळ पाण्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड कार्यालयाला मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जावून पाणी आणि फेसाचे नमुने घेतले. संपूर्ण परिसर दलदल झाडी आणि गवतात असल्याने या शोधकामात त्यांना अडचणी येत आहेत.