नांदगाव : कोकणात सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पर्यटनयुक्त तालुके झाल्यामुळे प्रत्येक श्रीमंत व धनदांडगे लोक वाटेल तेवढा भाव देवून जमिनी खरेदी करतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाद्वारे कोणतीही मोठी जमीन खरेदी करताना विकत घेणारा हा मूळचा शेतकरी असणे आवश्यक आहे. मात्र मूळच्या राजस्थानच्या दाम्पत्याने खोट्या कागदपत्रांच्या जोरावर माणगाव येथे जमीन खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय उधळण्यात आला.नितीनकुमार दिनदयाळ दिडवानिया आणि सुषमादेवी दिनदयाळ दिडवानिया यांनी राजस्थान येथील बाली, ता. पाली येथील शेतकरी असल्याचा खोटा दाखला सादर करून माणगावच्या निळज येथील शेतजमीन खरेदी केली होती. याबाबत विलासराव देशमुख यांच्या तक्रार अर्जावरून कोकण आयुक्तांनी माणगाव तहसीलदार महेश सागर यांना चौकशीचे आदेश दिले होते. माणगाव तहसीलदारांनी राजस्थान येथे चौकशी केली असता हे कुटुंब शेतकरी नसून पुराव्यामध्ये खाडाखोड करून पुरावे सादर केल्याचे कळविले. शेतकरी असल्याचा पुरावा सादर करावा यासाठी दिडवानिया कुटुंबाला तहसीलदार सागर यांनी भरपूर अवधी दिला, परंतु ते तसा पुरावा सादर करू न शकल्याने जमीन शासनजमा करण्याचा निर्णय यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)१तहसीलदार महेश सागर यांनी ९ मे २०१४ माणगावमधील कैझाद श्रॉफ प्रकरणात जमीन सरकारजमा केली होती. त्यांनी हा दुसरा ऐतिहासिक निर्णय देवून आपल्या कार्यकुशलतेची चमक दाखविली आहे. २००९ साली हे प्रकरण माझ्याकडे आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. २राजस्थान येथील बाली तहसीलदार यांच्याकडून लेखी उत्तर आले की, दिडवानिया कुटुंबाने २००९ चा जो पुरावा सादर केला त्यात खाडाखोड आहे. त्यानंतर त्यांची चौकशी लावली असता पुरेसा अवधी देवूनही ते शेतकरी असल्याचा पुरावा सादर करू न शकल्याने जमीन शासनजमा करण्याचा निर्णय दिला.
शेतजमिनीसाठी राजस्थानच्या दाम्पत्याची खोटी कागदपत्रे
By admin | Updated: January 8, 2015 22:32 IST