शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमधील हप्ते वसुली थांबविण्यात अपयश

By admin | Updated: May 26, 2017 00:25 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरील अवैध कांदा-बटाटा विक्री व भाजी मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरील अवैध कांदा-बटाटा विक्री व भाजी मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर दोन दिवस व्यवसाय बंद झाले होते. परंतु महापालिका, एपीएमसी व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे हितसंबंध दडले असल्याने दोन दिवसांत पुन्हा व्यवसाय सुरू झाले आहेत. शासनाने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. लोकप्रतिनिधींमुळे संस्थेचे नुकसान झाले. प्रशासकीय मंडळ कामकाजामध्ये सुधारणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु प्रशासक सतीश सोनी व सचिव शिवाजी पहिनकर या दोघांनाही कामकाजामध्ये सुधारणा करण्यामध्ये अपयश येवू लागले आहे. पूर्वीपेक्षाही येथील कारभार ढिसाळ झाला आहे. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केट व जुन्या मार्केटच्या मध्ये काही महिन्यांपासून अनधिकृतपणे कांदा - बटाट्याची विक्री सुरू आहे. रोज ५० लाखपेक्षा जास्त उलाढाल यामधून होत आहे. अनधिकृत व्यापारामुळे एपीएमसीच्या मूळ कांदा - बटाटा मार्केटमधील उलाढालीवर परिणाम होवू लागला आहे. येथील लिलावगृहामध्ये व्यवसाय करणाऱ्या बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. उरलेल्यांनी जादा भाडे देवून मुख्य मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर विकत घेतले आहेत. लोकमतने या अवैध व्यवसायावर आवाज उठविल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागासह, वाहतूक पोलीस व एपीएमसीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावरील विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. काही दिवस थांबा, वातावरण शांत झाले की पुन्हा पूर्ववत व्यवसाय सुरू करता येईल असे सांगण्यात आले. यामुळे दोन दिवस येथील अनेकांनी व्यवसाय बंद ठेवला. दोन दिवसानंतर पुन्हा अनधिकृत व्यवसाय सुरू झाला आहे. अवैध व्यवसायामध्ये अनेकांचे हात गुंतले आहेत. प्रवेशद्वारावर २६ जण व्यवसाय करत आहेत. प्रत्येक जण महिन्याला सहा हजार रुपये हप्ता देत असून महिन्याला जवळपास दीड लाख रुपये एकत्रित केले जात आहेत. कोणाला किती पैसे दिले जातात याचीही चर्चा एपीएमसी परिसरामध्ये सुरू आहे. अनेकांचे आर्थिक हितसंबंध दडले असल्याने कोणीही ठोस कारवाई करत नाही. बाजार समितीचे अधिकारी प्रवेशद्वाराच्या बाहेर कारवाई करण्याचा आमचा अधिकार नसल्याचे कारण देत आहेत. बाजार समितीचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारीही फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. प्रवेशद्वारावरील विक्रेत्यांमुळे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. परंतु वाहतूक पोलीसही या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. रोडवर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईची मुख्य जबाबदारी महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाची आहे. पण विभाग कार्यालयानेच अभय दिल्याने हे व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून याविषयी आता पोलीस आयुक्त, राज्य शासन व महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे.