शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:25 IST

शहराच्या विकासामध्ये अल्प वाटा; स्वातंत्र्यानंतर केंद्राचा एकही मोठा प्रकल्प नाही

- नामदेव मोरेनवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईच्या विकासामध्ये लोकसभा सदस्यांचे योगदान मात्र अत्यंत अल्प आहे. खासदारांनी पाठपुरावा करून अद्याप एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलेला नाही. किरकोळ विकासकामे करून त्यांचे श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा मात्र नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळत आहे.ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महापालिकेच्या रुग्णालयासाठी दिलेला निधी पालिकेने वापरला नाही. कोपरखैरणेमध्ये कब्रस्तानला दिलेल्या निधीला स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध केला. वाशीमध्ये सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचे नक्की श्रेय कोणाचे यावरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरूनही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमकपणे भूमिका मांडू लागले असून यानिमित्ताने स्वातंत्र्यानंतर खासदारांनी नवी मुंबईच्या विकासामध्ये नक्की काय योगदान दिले याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेमध्ये रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे बेलापूर एमआयडीसीचा समावेश होतो. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती याच परिसरामध्ये आहे. देशातील सातव्या क्रमांकाचे व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून देशभर नावलौकिक आहे. परंतु या सर्व विकासामध्ये खासदारांचा वाटा मात्र अत्यंत अल्प राहिला आहे. ठाणे मतदार संघाचा भाग असलेल्या नवी मुंबईकडे खासदारांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीपुरतेच खासदार येथे जास्त लक्ष देत असल्याचा अनुभव शहरवासीयांना यापूर्वी आला आहे. केंद्र सरकारचा निधी शहरासाठी खेचून आणण्यासाठी फारसा प्रयत्न झालेला नाही. कोणताच महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरामध्ये घेऊन येण्यात यश आलेले नाही.ठाण्याचे आजी-माजी खासदारांनी रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तुर्भे, सानपाडा, बेलापूरमधील पुलाचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला, परंतु त्यासाठीचा निधी महापालिकेलाच खर्च करावा लागला आहे.शवदाहिनीचा उपयोग नाहीशिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे चार वेळा ठाण्याचे खासदार होते. त्यांच्या खासदार निधीमधून डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली, परंतु त्या शवदाहिनीचा फारसा उपयोग झालाच नाही. सुरवातीला बेवारस प्रेत जाळण्यासाठी त्याचा उपयोग होत होता, परंतु सद्यस्थितीमध्ये शवदाहिनी बंद अवस्थेमध्येच आहे.गेस्ट हाउसचा उपयोग नाहीराष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर २००९ मध्ये निवडून आलेल्या संजीव नाईक यांच्या निधीमधून वंडर्स पार्कमध्ये गेस्ट हाउसची उभारणी व जॉगिंग ट्रॅकसह उद्यानामध्ये म्युझिक सिस्टीम सुरू करण्यात आली. या गेस्ट हाउसचा सर्वसामान्य नागरिकांना काहीही उपयोग होत नाही. गेस्टहाउसवर केलेला खर्च जनतेच्या दृष्टिकोनातून व्यर्थ गेला आहे.सानपाड्यातील लिफ्ट बंदच : विद्यमान खा. राजन विचारे यांनी त्यांच्या निधीमधून नेरूळ, सानपाडा, सीबीडी, घणसोली, ऐरोलीमध्ये विविध विकासकामे केली. यामध्ये सानपाडा दत्तमंदिर परिसरातील पादचारी पुलाला लिफ्टही बसवली आहे.याचे लोकार्पण नुकतेच झाले. परंतु ही लिफ्ट बंदच आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई