शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:18 IST

नवी मुंबई मेट्रो धावलीच नाही; पामबीच रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कामही अपूर्ण; होल्डिंग पाँडची समस्या जैसे थे

- नामदेव मोरे नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईमध्ये मागील वर्षभरामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात महापालिकेसह सिडकोलाही अपयश आले आहे. मेट्रो रेल्वे या वर्षीही धावली नाही. घणसोलीमधील पामबीच रोडचे कामही अपूर्णच असून, शहरातील सर्व होल्डिंग पाँडमधील गाळही काढता आलेला नाही.विकासकामांच्या बाबतीत शहरवासीयांसाठी २०१९ हे वर्ष निराशाजनक ठरले आहे. सिडकोने ८९०४ कोटी रुपये खर्च करून चार टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरूकेले आहे. १ मे, २०११ मध्ये बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. ३,०६३ कोटी रुपये या कामासाठी खर्च केले जात आहेत. आठ वर्षांपासून हे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर मेट्रो धावेल, असा अंदाज नागरिकांना वाटू लागला होता, परंतु प्रत्यक्षात मेट्रोची चाचणी पाहण्यावरच समाधान मानावे लागले आहे. मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. मेट्रोप्रमाणेच पामबीच रोडचे घणसोलीमध्ये रखडलेले कामही वर्षभरामध्ये मार्गी लागू शकले नाही. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे हे काम थांबले आहे. हा रोड पूर्ण झाला असता, तर पामबीचवरून एका मार्गिकेवरून ऐरोली व दुसऱ्या मार्गिकेवरून थेट मुंबईला जाणे शक्य झाले आहे, परंतु तो प्रकल्पही अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. नवी मुंबई महानगरपालिका ऐरोलीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनची उभारणी करत आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन लोकार्पणही झाले, परंतु दुसºया टप्प्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.खारफुटीमुळे शहरातील अनेक प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सीवूड रेल्वे स्थानक ते नवीन सेक्टर ५०ला जोडणाºया रोडचाही समावेश आहे. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे एक लेनचे काम अनेक वर्षांपासून थांबले आहे. महापालिकेने परवानगीसाठी कांदळवन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतु अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. स्थानक व महापालिकेकडून येताना दोन मार्गिका आहेत, परंतु पुलाजवळ एकच मार्गिका असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा प्रश्न लवकर सुटावा, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.वाशी विभाग कार्यालय व याच परिसरातील समाज मंदिराचे कामही दहा वर्षांपासून सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. समाज मंदिराचे बांधकाम एका बाजूला कलले असल्यामुळे ते तोडायचे की, पूर्ण करायचे, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. विभाग कार्यालयाचे बांधकाम झाले नसल्यामुळे मासळी मार्केटमध्ये कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी याविषयी वारंवार पाठपुरावा केला असूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.अकरा होल्डिंग पाँडची समस्या गंभीर२०० हेक्टर क्षेत्र या तलावांनी व्यापले आहेत. खारफुटीमुळे कित्येक वर्षामध्ये या तलावांमधील गाळ काढता आलेला नाही. ऐरोलीमधील नगरसेवक अशोक पाटील, वाशीमध्ये दिव्या गायकवाड यांच्यासह अनेकांनी तलावांमधील गाळ काढण्यासाठी सभागृहात वारवांर आवाज उठविला आहे, परंतु अद्याप गाळ काढण्यात आलेला नसल्यामुळे भविष्यात पुराचा फटका शहराला बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Metroमेट्रो