शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:18 IST

नवी मुंबई मेट्रो धावलीच नाही; पामबीच रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कामही अपूर्ण; होल्डिंग पाँडची समस्या जैसे थे

- नामदेव मोरे नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईमध्ये मागील वर्षभरामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात महापालिकेसह सिडकोलाही अपयश आले आहे. मेट्रो रेल्वे या वर्षीही धावली नाही. घणसोलीमधील पामबीच रोडचे कामही अपूर्णच असून, शहरातील सर्व होल्डिंग पाँडमधील गाळही काढता आलेला नाही.विकासकामांच्या बाबतीत शहरवासीयांसाठी २०१९ हे वर्ष निराशाजनक ठरले आहे. सिडकोने ८९०४ कोटी रुपये खर्च करून चार टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरूकेले आहे. १ मे, २०११ मध्ये बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. ३,०६३ कोटी रुपये या कामासाठी खर्च केले जात आहेत. आठ वर्षांपासून हे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर मेट्रो धावेल, असा अंदाज नागरिकांना वाटू लागला होता, परंतु प्रत्यक्षात मेट्रोची चाचणी पाहण्यावरच समाधान मानावे लागले आहे. मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. मेट्रोप्रमाणेच पामबीच रोडचे घणसोलीमध्ये रखडलेले कामही वर्षभरामध्ये मार्गी लागू शकले नाही. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे हे काम थांबले आहे. हा रोड पूर्ण झाला असता, तर पामबीचवरून एका मार्गिकेवरून ऐरोली व दुसऱ्या मार्गिकेवरून थेट मुंबईला जाणे शक्य झाले आहे, परंतु तो प्रकल्पही अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. नवी मुंबई महानगरपालिका ऐरोलीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनची उभारणी करत आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन लोकार्पणही झाले, परंतु दुसºया टप्प्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.खारफुटीमुळे शहरातील अनेक प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सीवूड रेल्वे स्थानक ते नवीन सेक्टर ५०ला जोडणाºया रोडचाही समावेश आहे. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे एक लेनचे काम अनेक वर्षांपासून थांबले आहे. महापालिकेने परवानगीसाठी कांदळवन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतु अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. स्थानक व महापालिकेकडून येताना दोन मार्गिका आहेत, परंतु पुलाजवळ एकच मार्गिका असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा प्रश्न लवकर सुटावा, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.वाशी विभाग कार्यालय व याच परिसरातील समाज मंदिराचे कामही दहा वर्षांपासून सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. समाज मंदिराचे बांधकाम एका बाजूला कलले असल्यामुळे ते तोडायचे की, पूर्ण करायचे, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. विभाग कार्यालयाचे बांधकाम झाले नसल्यामुळे मासळी मार्केटमध्ये कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी याविषयी वारंवार पाठपुरावा केला असूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.अकरा होल्डिंग पाँडची समस्या गंभीर२०० हेक्टर क्षेत्र या तलावांनी व्यापले आहेत. खारफुटीमुळे कित्येक वर्षामध्ये या तलावांमधील गाळ काढता आलेला नाही. ऐरोलीमधील नगरसेवक अशोक पाटील, वाशीमध्ये दिव्या गायकवाड यांच्यासह अनेकांनी तलावांमधील गाळ काढण्यासाठी सभागृहात वारवांर आवाज उठविला आहे, परंतु अद्याप गाळ काढण्यात आलेला नसल्यामुळे भविष्यात पुराचा फटका शहराला बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Metroमेट्रो