शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:18 IST

नवी मुंबई मेट्रो धावलीच नाही; पामबीच रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कामही अपूर्ण; होल्डिंग पाँडची समस्या जैसे थे

- नामदेव मोरे नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईमध्ये मागील वर्षभरामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात महापालिकेसह सिडकोलाही अपयश आले आहे. मेट्रो रेल्वे या वर्षीही धावली नाही. घणसोलीमधील पामबीच रोडचे कामही अपूर्णच असून, शहरातील सर्व होल्डिंग पाँडमधील गाळही काढता आलेला नाही.विकासकामांच्या बाबतीत शहरवासीयांसाठी २०१९ हे वर्ष निराशाजनक ठरले आहे. सिडकोने ८९०४ कोटी रुपये खर्च करून चार टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरूकेले आहे. १ मे, २०११ मध्ये बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. ३,०६३ कोटी रुपये या कामासाठी खर्च केले जात आहेत. आठ वर्षांपासून हे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर मेट्रो धावेल, असा अंदाज नागरिकांना वाटू लागला होता, परंतु प्रत्यक्षात मेट्रोची चाचणी पाहण्यावरच समाधान मानावे लागले आहे. मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. मेट्रोप्रमाणेच पामबीच रोडचे घणसोलीमध्ये रखडलेले कामही वर्षभरामध्ये मार्गी लागू शकले नाही. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे हे काम थांबले आहे. हा रोड पूर्ण झाला असता, तर पामबीचवरून एका मार्गिकेवरून ऐरोली व दुसऱ्या मार्गिकेवरून थेट मुंबईला जाणे शक्य झाले आहे, परंतु तो प्रकल्पही अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. नवी मुंबई महानगरपालिका ऐरोलीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनची उभारणी करत आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन लोकार्पणही झाले, परंतु दुसºया टप्प्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.खारफुटीमुळे शहरातील अनेक प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सीवूड रेल्वे स्थानक ते नवीन सेक्टर ५०ला जोडणाºया रोडचाही समावेश आहे. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे एक लेनचे काम अनेक वर्षांपासून थांबले आहे. महापालिकेने परवानगीसाठी कांदळवन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतु अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. स्थानक व महापालिकेकडून येताना दोन मार्गिका आहेत, परंतु पुलाजवळ एकच मार्गिका असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा प्रश्न लवकर सुटावा, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.वाशी विभाग कार्यालय व याच परिसरातील समाज मंदिराचे कामही दहा वर्षांपासून सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. समाज मंदिराचे बांधकाम एका बाजूला कलले असल्यामुळे ते तोडायचे की, पूर्ण करायचे, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. विभाग कार्यालयाचे बांधकाम झाले नसल्यामुळे मासळी मार्केटमध्ये कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी याविषयी वारंवार पाठपुरावा केला असूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.अकरा होल्डिंग पाँडची समस्या गंभीर२०० हेक्टर क्षेत्र या तलावांनी व्यापले आहेत. खारफुटीमुळे कित्येक वर्षामध्ये या तलावांमधील गाळ काढता आलेला नाही. ऐरोलीमधील नगरसेवक अशोक पाटील, वाशीमध्ये दिव्या गायकवाड यांच्यासह अनेकांनी तलावांमधील गाळ काढण्यासाठी सभागृहात वारवांर आवाज उठविला आहे, परंतु अद्याप गाळ काढण्यात आलेला नसल्यामुळे भविष्यात पुराचा फटका शहराला बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Metroमेट्रो