शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

श्वान नियंत्रण केंद्र उभारण्यात अपयश

By admin | Updated: February 21, 2017 06:33 IST

स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरात रोज सरासरी ४० जणांना श्वानदंश होत आहे. यासाठीची लस खरेदी करण्यासाठी ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च जात आहे. याशिवाय निर्बीजीकरण व जुन्या केंद्राच्या देखभालीवर लाखो रुपये खर्च होत आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करत आहेत. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद असतानाही प्रशासन हा प्रश्न सोडवत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, गत वर्षीच्या अर्थसंकल्पातील महसूल संकलनाचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे; परंतु मागील आठ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्वच्छ भारत अभियान वगळता इतर कोणत्याही कामावर फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. शहरवासीयांची गरज असून व तिजोरीमध्ये करोडो रुपये शिल्लक असतानाही अत्यावश्यक कामे करण्यात आलेली नाहीत. दुर्लक्ष झालेल्या या प्रकल्पांमध्ये श्वान नियंत्रण केंद्राचाही समावेश आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारपेक्षा जास्त झाली आहे. रात्री जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. आॅक्टोेबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या वर्षभरामध्ये तब्बल १४,४५३ नागरिकांना कुत्रे चावल्याची घटना घडली आहे. प्रत्येक वर्षी या घटनांमध्ये जवळपास १० ते १५ टक्के वाढ होत आहे. पुढील वर्षभरामध्ये कुत्रे चावलेल्या नागरिकांची संख्या जवळपास १५,८०० होण्याची शक्यता असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तब्बल ६४ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. याशिवाय २०१४ मध्ये श्वान निर्बीजीकरण व नियंत्रण केंद्राच्या देखभालीसाठी जवळपास १७ लाख रुपये खर्च झाला होता. २०१६ - १६ या आर्थिक वर्षात हा खर्च तब्बल १ कोटी ४० लाखांवर गेला आहे. पुढील वर्षासाठी १ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी १०० टक्के निर्बीजीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे.महापालिका प्रत्येक वर्षी जवळपास १ कोटीपेक्षा जास्त खर्च करूनही भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयश आले आहे. प्रत्येक महिन्याला किमान १ हजार १५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे; परंतु डम्पिंग ग्राऊंडवरील केंद्रातील अपुऱ्या जागेमुळे जेमतेम ४०० ते ४५० शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये ५,१०७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून २०१६-१७मध्ये फेब्रुवारीपर्यंत ४,३०६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पालिकेचे पूर्वी पामबीच रोडवर कोपरी येथे केंद्र होते; परंतु ते धोकादायक झाल्याने डम्पिंग ग्राऊंडवर हलविण्यात आले आहे.