शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

श्वान नियंत्रण केंद्र उभारण्यात अपयश

By admin | Updated: February 21, 2017 06:33 IST

स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरात रोज सरासरी ४० जणांना श्वानदंश होत आहे. यासाठीची लस खरेदी करण्यासाठी ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च जात आहे. याशिवाय निर्बीजीकरण व जुन्या केंद्राच्या देखभालीवर लाखो रुपये खर्च होत आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करत आहेत. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद असतानाही प्रशासन हा प्रश्न सोडवत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, गत वर्षीच्या अर्थसंकल्पातील महसूल संकलनाचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे; परंतु मागील आठ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्वच्छ भारत अभियान वगळता इतर कोणत्याही कामावर फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. शहरवासीयांची गरज असून व तिजोरीमध्ये करोडो रुपये शिल्लक असतानाही अत्यावश्यक कामे करण्यात आलेली नाहीत. दुर्लक्ष झालेल्या या प्रकल्पांमध्ये श्वान नियंत्रण केंद्राचाही समावेश आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारपेक्षा जास्त झाली आहे. रात्री जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. आॅक्टोेबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या वर्षभरामध्ये तब्बल १४,४५३ नागरिकांना कुत्रे चावल्याची घटना घडली आहे. प्रत्येक वर्षी या घटनांमध्ये जवळपास १० ते १५ टक्के वाढ होत आहे. पुढील वर्षभरामध्ये कुत्रे चावलेल्या नागरिकांची संख्या जवळपास १५,८०० होण्याची शक्यता असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तब्बल ६४ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. याशिवाय २०१४ मध्ये श्वान निर्बीजीकरण व नियंत्रण केंद्राच्या देखभालीसाठी जवळपास १७ लाख रुपये खर्च झाला होता. २०१६ - १६ या आर्थिक वर्षात हा खर्च तब्बल १ कोटी ४० लाखांवर गेला आहे. पुढील वर्षासाठी १ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी १०० टक्के निर्बीजीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे.महापालिका प्रत्येक वर्षी जवळपास १ कोटीपेक्षा जास्त खर्च करूनही भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयश आले आहे. प्रत्येक महिन्याला किमान १ हजार १५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे; परंतु डम्पिंग ग्राऊंडवरील केंद्रातील अपुऱ्या जागेमुळे जेमतेम ४०० ते ४५० शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये ५,१०७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून २०१६-१७मध्ये फेब्रुवारीपर्यंत ४,३०६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पालिकेचे पूर्वी पामबीच रोडवर कोपरी येथे केंद्र होते; परंतु ते धोकादायक झाल्याने डम्पिंग ग्राऊंडवर हलविण्यात आले आहे.