शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

मयत सासऱ्याच्या घरावर जावयाचा डोळा; भावासाठी बहिणीने सोडले प्राण

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 2, 2022 21:00 IST

भावाकडून घरात हिस्सा मागण्यासाठी नवरा आणि सासूकडून छळ सुरू होता.

नवी मुंबई : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरात हिस्सा मागण्यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ सुरु होता. परंतु आई वडिलांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या भावाच्या विचाराने बहिणीकडून त्यासाठी नकार दिला जात होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. भावाच्या तक्रारी नंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेरुळ सेक्टर २० येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून, श्रुती माने (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेरुळ येथे राहणाऱ्या निलेश माने याच्यासोबत तिचा प्रेमविवाह झालेला आहे. तिच्या आईचे २०२० मध्ये निधन झाल्यानंतर वर्षभरात तिचे निलेश सोबत लग्न लावून देण्यात आले होते. लग्नानंतर तिने जुनी नोकरी सोडून आईच्या पाश्च्यात भाऊ व वडिलांकडेही लक्ष देण्यासाठी तिने मानखुर्द मध्येच अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली होती. परंतु पृवीच्या नोकरीत मिळणाऱ्या पगारात व सध्याच्या पगारात तफावत असल्याने त्यावरून पती निलेश हा तिच्यासोबत वाद घालत होता. तिच्याकडे अधिक रकमेची मागणी करत तिचा छळ सुरु असतानाच ऑगस्ट महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले.

यामुळे एकाकी पडलेल्या भावाची तिला चिंता लागली होती. अशातच वडिलांच्या निधनानंतर मानखुर्द येथील घराचा भावाकडे हिस्सा मागण्यासाठी तिच्यावर पती व सासूकडून दबाव टाकला जात होता. याच कारणातून २९ ऑगस्टला तिला घरातून हाकलून देण्यात आले होते. यावेळी तिने मानखुर्द येथील माहेरी जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल भावाकडे आक्रोश केला होता. त्यावेळी भावाने त्यावर तोडगा काढू असे सांगून तिला सासरी पाठवले होते. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी तिने गळफास लावून आत्महत्या केली. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ अजय जाधव याने पोलिसांकडे केली आहे. त्याद्वारे गुरुवारी नेरुळ पोलीस ठाण्यात पती निलेश माने व सासू नंदा माने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी कोपर खैरणेत देखील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे शहरात विवाहितेच्या हुंड्यासाठी छळाच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी