शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पनवेलमध्ये भीषण पाणीसमस्या, एप्रिलपूर्वी आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:46 IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही.

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही. विशेष म्हणजे, पनवेलला पाणीपुरवठा करणाºया आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिलपूर्वी संपुष्टात येणार असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात आप्पासाहेब वेदक धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येणार असल्याने पनवेलकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. सध्या स्थितीला महापालिका क्षेत्रात असलेल्या सिडको नोडपैकी खारघरमध्ये ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडीची आवश्यक असताना, ३८ एमएलडी मिळतो, कामोठेला आवश्यकता ३८ एमएलडीची असून, ३५ एमएलडी मिळतो, नवीन पनवेल शहराला ४२ एमएलडी आवश्यकता असताना मिळते ३४ एमएलडी पाणी, पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट ११ गावांना अद्याप बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.पावसाळ्यापूर्वीचे १०० दिवस हे महापालिकेसमोर आवाहन असणार आहे. याकरिता सिडको, एमजेपी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची मदत घ्यावी लागणार आहे.अमृत योजनेचा लाभ ३वर्षांनंतर४०० कोटींच्या अमृत योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ४० पाणीसाठा करणाºया टाक्या नव्याने बांधल्या जाणार आहेत. १६५ कि.मी.ची जलवाहिनी याकरिता नव्याने टाकली जाणार आहे. मे २०१८ला या कामाला सुरु वात होणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, तोपर्यंत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे.११ गावे बोरिंगवर-पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड ही ११ गावे आहेत.निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार-१४ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधाºयांनी हा निर्णय मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र, महापौरांच्या दालनात २८ फेब्रुवारीला एमजेपी अधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत एमजेपी अधिकाºयांनी महानगरपालिकेला जादा पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे सांगितल्याने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाच्या निर्णयाचा अवलंब करावाच लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीpanvelपनवेल