शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

पनवेलमध्ये भीषण पाणीसमस्या, एप्रिलपूर्वी आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:46 IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही.

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही. विशेष म्हणजे, पनवेलला पाणीपुरवठा करणाºया आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिलपूर्वी संपुष्टात येणार असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात आप्पासाहेब वेदक धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येणार असल्याने पनवेलकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. सध्या स्थितीला महापालिका क्षेत्रात असलेल्या सिडको नोडपैकी खारघरमध्ये ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडीची आवश्यक असताना, ३८ एमएलडी मिळतो, कामोठेला आवश्यकता ३८ एमएलडीची असून, ३५ एमएलडी मिळतो, नवीन पनवेल शहराला ४२ एमएलडी आवश्यकता असताना मिळते ३४ एमएलडी पाणी, पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट ११ गावांना अद्याप बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.पावसाळ्यापूर्वीचे १०० दिवस हे महापालिकेसमोर आवाहन असणार आहे. याकरिता सिडको, एमजेपी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची मदत घ्यावी लागणार आहे.अमृत योजनेचा लाभ ३वर्षांनंतर४०० कोटींच्या अमृत योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ४० पाणीसाठा करणाºया टाक्या नव्याने बांधल्या जाणार आहेत. १६५ कि.मी.ची जलवाहिनी याकरिता नव्याने टाकली जाणार आहे. मे २०१८ला या कामाला सुरु वात होणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, तोपर्यंत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे.११ गावे बोरिंगवर-पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड ही ११ गावे आहेत.निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार-१४ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधाºयांनी हा निर्णय मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र, महापौरांच्या दालनात २८ फेब्रुवारीला एमजेपी अधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत एमजेपी अधिकाºयांनी महानगरपालिकेला जादा पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे सांगितल्याने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाच्या निर्णयाचा अवलंब करावाच लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीpanvelपनवेल