शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 07:11 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणा.....

- सूर्यकांत वाघमारनवी मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणाºया नवी मुंबई पोलिसांची कामगिरी मागील वर्षभरात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रकटीकरण घटले असून, अशा गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीचेही प्रमाण कमी झाले आहे. शहरात सर्वाधिक गुन्हे वाहनचोरीचे आहेत. स्थानिक चोरट्यांसह शहराबाहेरील टोळ्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय आहेत. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्तीचे आव्हानच पोलिसांपुढे आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कसोटीने गुन्हेगारांना अटक केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित अशी मुद्देमालाची जप्ती होऊ शकलेली नाही. गतवर्षी आयुक्तालय क्षेत्रातून आॅक्टोबर अखेरपर्यंत ५६९ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी २४७ गुन्हे उघड झाले असून, सुमारे ३१ टक्के मुद्देमालाची जप्ती झाली आहे, तर चालू वर्षात आॅक्टोबर अखेरपर्यंत ४९२ पैकी अवघे १४७ गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटून अवघे २४ टक्के झाले आहे.सोनसाखळी चोरांनी संपूर्ण राज्यात डोके वर काढले असले, तरीही नवी मुंबईत मात्र हे गुन्हे काही प्रमाणात नियंत्रित झाले आहेत. सराईत टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला आहे. त्याशिवाय शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्हीमुळे पकडले जात असल्यानेही अनेकांनी गुन्ह्याचा मार्ग बदलला असावा. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात २१ ने घट झाली आहे. मंगळसूत्र हा महिलांचा भावनिकतेशी संबंधित असलेला दागिना असतो. त्यामुळे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळावे, अशी संबंधित महिलेला अपेक्षा असते. मात्र, जरी गुन्हे नियंत्रित केले असले, तरीही मुद्देमाल जप्तीचे प्रमाण चालू वर्षात २१ टक्क्यांनी घसरले आहे.दरोड्याच्या गुन्ह्यात मात्र पोलिसांनी अपेक्षित अशी कामगिरी दाखवली आहे. गतवर्षी ८ तर चालू वर्षात ५ घरफोडीचे गुन्हे घडले होते. दोन्ही वर्षांत हे सर्व गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीत गतवर्षाच्या तुलनेत यंदा कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. चालू वर्षात आॅक्टोबरपर्यंत घरफोडीच्या ५ गुन्ह्यांत ७ कोटी ३१ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यात गतमहिन्यातील बडोदा बँक लुटीच्या घटनेचा समावेश केल्यास तो ऐवज चालू वर्षात सुमारे दहा कोटींचा ऐवज लंपास झाला आहे. त्यापैकी आॅक्टोबरपर्यंतच्या गुन्ह्यातील ४ कोटी १५ लाखांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी मुद्देमाल जप्तीचे प्रमाण ५७ टक्केपर्यंत नेले आहे; परंतु इतर गुन्ह्यांच्या मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.आयुक्तांची नाराजीपोलिसांना गुन्हे उघड करण्यात व मुद्देमाल जप्तीमध्ये येत असलेल्या अपयशाचा अप्रत्यक्ष ठपका आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर उमटत आहे. त्यामुळेच आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकत्याच वाशीत झालेल्या कार्यक्रमात याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकांनी याचे गांभीर्य घेऊन त्यात सुधार करण्याचाही सल्ला दिला आहे.वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना 

टॅग्स :Policeपोलिस