शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 07:11 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणा.....

- सूर्यकांत वाघमारनवी मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणाºया नवी मुंबई पोलिसांची कामगिरी मागील वर्षभरात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रकटीकरण घटले असून, अशा गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीचेही प्रमाण कमी झाले आहे. शहरात सर्वाधिक गुन्हे वाहनचोरीचे आहेत. स्थानिक चोरट्यांसह शहराबाहेरील टोळ्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय आहेत. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्तीचे आव्हानच पोलिसांपुढे आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कसोटीने गुन्हेगारांना अटक केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित अशी मुद्देमालाची जप्ती होऊ शकलेली नाही. गतवर्षी आयुक्तालय क्षेत्रातून आॅक्टोबर अखेरपर्यंत ५६९ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी २४७ गुन्हे उघड झाले असून, सुमारे ३१ टक्के मुद्देमालाची जप्ती झाली आहे, तर चालू वर्षात आॅक्टोबर अखेरपर्यंत ४९२ पैकी अवघे १४७ गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटून अवघे २४ टक्के झाले आहे.सोनसाखळी चोरांनी संपूर्ण राज्यात डोके वर काढले असले, तरीही नवी मुंबईत मात्र हे गुन्हे काही प्रमाणात नियंत्रित झाले आहेत. सराईत टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला आहे. त्याशिवाय शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्हीमुळे पकडले जात असल्यानेही अनेकांनी गुन्ह्याचा मार्ग बदलला असावा. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात २१ ने घट झाली आहे. मंगळसूत्र हा महिलांचा भावनिकतेशी संबंधित असलेला दागिना असतो. त्यामुळे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळावे, अशी संबंधित महिलेला अपेक्षा असते. मात्र, जरी गुन्हे नियंत्रित केले असले, तरीही मुद्देमाल जप्तीचे प्रमाण चालू वर्षात २१ टक्क्यांनी घसरले आहे.दरोड्याच्या गुन्ह्यात मात्र पोलिसांनी अपेक्षित अशी कामगिरी दाखवली आहे. गतवर्षी ८ तर चालू वर्षात ५ घरफोडीचे गुन्हे घडले होते. दोन्ही वर्षांत हे सर्व गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीत गतवर्षाच्या तुलनेत यंदा कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. चालू वर्षात आॅक्टोबरपर्यंत घरफोडीच्या ५ गुन्ह्यांत ७ कोटी ३१ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यात गतमहिन्यातील बडोदा बँक लुटीच्या घटनेचा समावेश केल्यास तो ऐवज चालू वर्षात सुमारे दहा कोटींचा ऐवज लंपास झाला आहे. त्यापैकी आॅक्टोबरपर्यंतच्या गुन्ह्यातील ४ कोटी १५ लाखांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी मुद्देमाल जप्तीचे प्रमाण ५७ टक्केपर्यंत नेले आहे; परंतु इतर गुन्ह्यांच्या मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.आयुक्तांची नाराजीपोलिसांना गुन्हे उघड करण्यात व मुद्देमाल जप्तीमध्ये येत असलेल्या अपयशाचा अप्रत्यक्ष ठपका आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर उमटत आहे. त्यामुळेच आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकत्याच वाशीत झालेल्या कार्यक्रमात याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकांनी याचे गांभीर्य घेऊन त्यात सुधार करण्याचाही सल्ला दिला आहे.वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना 

टॅग्स :Policeपोलिस