शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 07:11 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणा.....

- सूर्यकांत वाघमारनवी मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणाºया नवी मुंबई पोलिसांची कामगिरी मागील वर्षभरात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रकटीकरण घटले असून, अशा गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीचेही प्रमाण कमी झाले आहे. शहरात सर्वाधिक गुन्हे वाहनचोरीचे आहेत. स्थानिक चोरट्यांसह शहराबाहेरील टोळ्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय आहेत. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्तीचे आव्हानच पोलिसांपुढे आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कसोटीने गुन्हेगारांना अटक केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित अशी मुद्देमालाची जप्ती होऊ शकलेली नाही. गतवर्षी आयुक्तालय क्षेत्रातून आॅक्टोबर अखेरपर्यंत ५६९ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी २४७ गुन्हे उघड झाले असून, सुमारे ३१ टक्के मुद्देमालाची जप्ती झाली आहे, तर चालू वर्षात आॅक्टोबर अखेरपर्यंत ४९२ पैकी अवघे १४७ गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटून अवघे २४ टक्के झाले आहे.सोनसाखळी चोरांनी संपूर्ण राज्यात डोके वर काढले असले, तरीही नवी मुंबईत मात्र हे गुन्हे काही प्रमाणात नियंत्रित झाले आहेत. सराईत टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला आहे. त्याशिवाय शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्हीमुळे पकडले जात असल्यानेही अनेकांनी गुन्ह्याचा मार्ग बदलला असावा. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात २१ ने घट झाली आहे. मंगळसूत्र हा महिलांचा भावनिकतेशी संबंधित असलेला दागिना असतो. त्यामुळे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळावे, अशी संबंधित महिलेला अपेक्षा असते. मात्र, जरी गुन्हे नियंत्रित केले असले, तरीही मुद्देमाल जप्तीचे प्रमाण चालू वर्षात २१ टक्क्यांनी घसरले आहे.दरोड्याच्या गुन्ह्यात मात्र पोलिसांनी अपेक्षित अशी कामगिरी दाखवली आहे. गतवर्षी ८ तर चालू वर्षात ५ घरफोडीचे गुन्हे घडले होते. दोन्ही वर्षांत हे सर्व गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीत गतवर्षाच्या तुलनेत यंदा कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. चालू वर्षात आॅक्टोबरपर्यंत घरफोडीच्या ५ गुन्ह्यांत ७ कोटी ३१ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यात गतमहिन्यातील बडोदा बँक लुटीच्या घटनेचा समावेश केल्यास तो ऐवज चालू वर्षात सुमारे दहा कोटींचा ऐवज लंपास झाला आहे. त्यापैकी आॅक्टोबरपर्यंतच्या गुन्ह्यातील ४ कोटी १५ लाखांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी मुद्देमाल जप्तीचे प्रमाण ५७ टक्केपर्यंत नेले आहे; परंतु इतर गुन्ह्यांच्या मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.आयुक्तांची नाराजीपोलिसांना गुन्हे उघड करण्यात व मुद्देमाल जप्तीमध्ये येत असलेल्या अपयशाचा अप्रत्यक्ष ठपका आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर उमटत आहे. त्यामुळेच आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकत्याच वाशीत झालेल्या कार्यक्रमात याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकांनी याचे गांभीर्य घेऊन त्यात सुधार करण्याचाही सल्ला दिला आहे.वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना 

टॅग्स :Policeपोलिस