शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

परदेशात जाणारी जव्हारची मिरची नवी मुंबई मार्केट मध्ये दाखल; दर्जेदार क्वालिटी बाजारात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:24 IST

तात्पुरत्या परदेशी निर्यात सुरू ; पहिला 5 टन तोड निर्यातीसाठी तयार

हुसेन मेमन

जव्हार -जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा व तेथील 12 गाव पाड्यातील एक्सपोर्ट क्वालिटीची दर्जेदार शेकडो टन मिरची नुकतीच वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी दिली. 

तालुक्यात काही एनजीओ मार्फत फळबाग भाजीपाला लागवड करून येथील आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पालघर जिल्ह्यात रूरल कॉम्युनिस या संस्थेने पिंपळशेत खरोंडा व परिसरातील 12 शेतकऱ्यांना विविध प्रकारची दर्जेदार एक्स्पोर्ट क्वालिटी मिरची लागवड करून त्यांना खत, कीटकनाशके, बी- बियाणे पुरवठा करून याची तांत्रिक देखभाल ही संस्था करत असून तयार झालेली शेकडो टन मिरची संस्थेच्या माध्यमातून परदेशात पाठविण्यात आली आहे. 

तसेच कृषी विभागाची यात महत्वाची भूमिका असून कृषी विभागाने या शेतकऱ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट नोंदणी करून दिली असून त्यांची प्राधिकरण हे कृषिविभागाला आहेत, तसेच यात वापरले जाणारे लेबल क्लेम औषधें शेतकरी वापरतो की नाही याची देखभाल कृषी विभाग करते, त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठ्याप्रमाणात उपयोग होते आहे.

लॉकडाऊन मुळे अडकलेला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल वाशी बाजारात

तालुक्यातील हा दर्जेदार माल 24 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे पडून खराब होत होता, यावेळी शेतकरी चिंतेत सापडला होता ही बाब तालुका कृषी अधिकारी गावित यांनी स्थानिक प्रशासन अधिकारी तहसीलदार संतोष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या समंतीने नियमाचे काटेकोर पालन करून बोर्ड लावून हा माल वाशी बाजारात नेण्यास परवानगी मिळाली, त्यावेळी शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आणि अखेर हा 15 टन माल मोठ्या खटपटी नंतर वाशी बाजारात पोहचला. 

तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू मिरचीचा दुसरा तोडा जाणार परदेशात 

शासनाने नुकतीच तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू केली आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मिरची मालाचा दुसरा तोडा थेट परदेशात निर्यात करण्याबाबत कृषी विभागाकडून हालचाली सुरू असून पहिला 5 टन माल लॅब मार्फत विश्लेषण करून तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा माल परदेशात निर्यात केला जाणार असून दुसऱ्या दोन तोडीचे माल शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असून हाही माल परदेशात निर्यातीसाठी तयार असल्याची माहिती मिळाली. मिरची मालाच्या निर्यातीअभावी उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत होते. याबाबत तालुका कृषी विभागाने उत्पादक, व्यापारी आणि प्रशासन यामध्ये समस्वय वाढल्याने हा प्रश्न अखेर मिटला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMarketबाजार