शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

परदेशात जाणारी जव्हारची मिरची नवी मुंबई मार्केट मध्ये दाखल; दर्जेदार क्वालिटी बाजारात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:24 IST

तात्पुरत्या परदेशी निर्यात सुरू ; पहिला 5 टन तोड निर्यातीसाठी तयार

हुसेन मेमन

जव्हार -जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा व तेथील 12 गाव पाड्यातील एक्सपोर्ट क्वालिटीची दर्जेदार शेकडो टन मिरची नुकतीच वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी दिली. 

तालुक्यात काही एनजीओ मार्फत फळबाग भाजीपाला लागवड करून येथील आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पालघर जिल्ह्यात रूरल कॉम्युनिस या संस्थेने पिंपळशेत खरोंडा व परिसरातील 12 शेतकऱ्यांना विविध प्रकारची दर्जेदार एक्स्पोर्ट क्वालिटी मिरची लागवड करून त्यांना खत, कीटकनाशके, बी- बियाणे पुरवठा करून याची तांत्रिक देखभाल ही संस्था करत असून तयार झालेली शेकडो टन मिरची संस्थेच्या माध्यमातून परदेशात पाठविण्यात आली आहे. 

तसेच कृषी विभागाची यात महत्वाची भूमिका असून कृषी विभागाने या शेतकऱ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट नोंदणी करून दिली असून त्यांची प्राधिकरण हे कृषिविभागाला आहेत, तसेच यात वापरले जाणारे लेबल क्लेम औषधें शेतकरी वापरतो की नाही याची देखभाल कृषी विभाग करते, त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठ्याप्रमाणात उपयोग होते आहे.

लॉकडाऊन मुळे अडकलेला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल वाशी बाजारात

तालुक्यातील हा दर्जेदार माल 24 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे पडून खराब होत होता, यावेळी शेतकरी चिंतेत सापडला होता ही बाब तालुका कृषी अधिकारी गावित यांनी स्थानिक प्रशासन अधिकारी तहसीलदार संतोष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या समंतीने नियमाचे काटेकोर पालन करून बोर्ड लावून हा माल वाशी बाजारात नेण्यास परवानगी मिळाली, त्यावेळी शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आणि अखेर हा 15 टन माल मोठ्या खटपटी नंतर वाशी बाजारात पोहचला. 

तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू मिरचीचा दुसरा तोडा जाणार परदेशात 

शासनाने नुकतीच तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू केली आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मिरची मालाचा दुसरा तोडा थेट परदेशात निर्यात करण्याबाबत कृषी विभागाकडून हालचाली सुरू असून पहिला 5 टन माल लॅब मार्फत विश्लेषण करून तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा माल परदेशात निर्यात केला जाणार असून दुसऱ्या दोन तोडीचे माल शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असून हाही माल परदेशात निर्यातीसाठी तयार असल्याची माहिती मिळाली. मिरची मालाच्या निर्यातीअभावी उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत होते. याबाबत तालुका कृषी विभागाने उत्पादक, व्यापारी आणि प्रशासन यामध्ये समस्वय वाढल्याने हा प्रश्न अखेर मिटला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMarketबाजार