शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
2
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
3
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
4
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
5
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
6
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
7
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
8
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
9
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
10
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
11
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
12
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
13
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
14
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
15
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
16
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
17
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
18
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
19
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
20
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल

परदेशात जाणारी जव्हारची मिरची नवी मुंबई मार्केट मध्ये दाखल; दर्जेदार क्वालिटी बाजारात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:24 IST

तात्पुरत्या परदेशी निर्यात सुरू ; पहिला 5 टन तोड निर्यातीसाठी तयार

हुसेन मेमन

जव्हार -जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा व तेथील 12 गाव पाड्यातील एक्सपोर्ट क्वालिटीची दर्जेदार शेकडो टन मिरची नुकतीच वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी दिली. 

तालुक्यात काही एनजीओ मार्फत फळबाग भाजीपाला लागवड करून येथील आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पालघर जिल्ह्यात रूरल कॉम्युनिस या संस्थेने पिंपळशेत खरोंडा व परिसरातील 12 शेतकऱ्यांना विविध प्रकारची दर्जेदार एक्स्पोर्ट क्वालिटी मिरची लागवड करून त्यांना खत, कीटकनाशके, बी- बियाणे पुरवठा करून याची तांत्रिक देखभाल ही संस्था करत असून तयार झालेली शेकडो टन मिरची संस्थेच्या माध्यमातून परदेशात पाठविण्यात आली आहे. 

तसेच कृषी विभागाची यात महत्वाची भूमिका असून कृषी विभागाने या शेतकऱ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट नोंदणी करून दिली असून त्यांची प्राधिकरण हे कृषिविभागाला आहेत, तसेच यात वापरले जाणारे लेबल क्लेम औषधें शेतकरी वापरतो की नाही याची देखभाल कृषी विभाग करते, त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठ्याप्रमाणात उपयोग होते आहे.

लॉकडाऊन मुळे अडकलेला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल वाशी बाजारात

तालुक्यातील हा दर्जेदार माल 24 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे पडून खराब होत होता, यावेळी शेतकरी चिंतेत सापडला होता ही बाब तालुका कृषी अधिकारी गावित यांनी स्थानिक प्रशासन अधिकारी तहसीलदार संतोष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या समंतीने नियमाचे काटेकोर पालन करून बोर्ड लावून हा माल वाशी बाजारात नेण्यास परवानगी मिळाली, त्यावेळी शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आणि अखेर हा 15 टन माल मोठ्या खटपटी नंतर वाशी बाजारात पोहचला. 

तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू मिरचीचा दुसरा तोडा जाणार परदेशात 

शासनाने नुकतीच तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू केली आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मिरची मालाचा दुसरा तोडा थेट परदेशात निर्यात करण्याबाबत कृषी विभागाकडून हालचाली सुरू असून पहिला 5 टन माल लॅब मार्फत विश्लेषण करून तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा माल परदेशात निर्यात केला जाणार असून दुसऱ्या दोन तोडीचे माल शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असून हाही माल परदेशात निर्यातीसाठी तयार असल्याची माहिती मिळाली. मिरची मालाच्या निर्यातीअभावी उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत होते. याबाबत तालुका कृषी विभागाने उत्पादक, व्यापारी आणि प्रशासन यामध्ये समस्वय वाढल्याने हा प्रश्न अखेर मिटला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMarketबाजार