शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील कामगारांचे अस्तित्व धोक्यात; शासनाच्या धोरणांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:38 IST

बेरोजगारीच्या भीतीमुळे कामगारांमध्ये असंतोष; बाजार समिती टिकविण्यासाठी आंदोलन

नवी मुंबई : बाजार समितीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरतेच मर्यादित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे मुंबई बाजार समितीमधील माथाडी कामगारांसह आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाच्या धोरणाविरोधात कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे; परंतु गतवर्षात शासनाच्या बदत्या धोरणामुळे मार्केटच्या अस्तित्वालाच सुरुंग लागू लागला आहे. जानेवारी २०१० मध्ये साखर नियमनातून वगळण्यात आली. यामुळे बाजार समितीच्या महसुलावर गंभीर परिणाम झाला. यानंतर मार्च २०१४ मध्ये सुकामेवा, डाळी, आटा, खाद्यतेल, मिरची, धने या वस्तू वगळण्यात आल्या. भाजपा सरकार आल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये कांदा, बटाटा, फळे व भाजीपाला नियमनातून वगळला. राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे बाजार समितीचे उत्पन्न ५० टक्के घटले आहे. मार्केटमध्ये सोयी-सुविधा पुरवायच्या; परंतु त्यासाठी कोणतेही शुल्क आकारता येत नाही. बाजार समिती आर्थिक संकटात जात असताना २५ आॅक्टोबर २०१८ ला नवीन अद्यादेश काढला आहे. या अद्यादेशाप्रमाणे बाजार समितीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरते मर्यादित केले आहे, यामुळे मार्केटमध्ये काम करत असलेले २५ हजार माथाडी कामगार व आस्थापनेवरील ५५० अधिकारी, कर्मचाºयांसह ३०० कर्मचाºयांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला दोन कोटी ७५ लाख रुपये खर्च होत आहेत.शासनाच्या निर्णयामुळे धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी बाजार फी व माथाडी कामगारांची मजुरी टाळण्यासाठी मार्केटमध्ये माल आणणार नाहीत. अन्नधान्याचा एमआयडीसीमध्ये साठा करणार. मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांकडून बिले स्वीकारणार व बाहेरून त्यांना माल पोहोचविण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईमध्ये किती माल येतो व किती विक्री होतो, याचा कोणताही तपशील बाजार समितीकडे राहणार नाही. बाजार समितीचे व शासनाचे नियंत्रण राहणार नाही. बाजार समितीचे अस्तित्व संपुष्टात येऊन येथील माथाडी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. यापूर्वी कांदा-बटाटा मार्केटमधील व्यवहार कमी झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाविषयी कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.कामगार ५ नोव्हेंबरला करणार आंदोलनमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी, कर्मचारी संघटनेने शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांनी सांगितले की, बाजार समितीचे कार्यक्षेत्र सीमित केल्यामुळे उत्पन्न घटणार आहे. कर्मचाºयांचे पगार करणेही शक्य होणार नाही. मार्केटमधील व्यापाºयांना सुविधा देतानाही अडचणी येणार आहेत, यामुळे बाजार समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी ५ नोव्हेंबरला आम्ही मुख्यालयासमोर निदर्शने करणार आहोत.माथाडी संघटनेच्या भूमिकेकडे लक्षराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसणार आहे. कांदा मार्केटमधील आवक घटल्याने येथील कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. नियमन बाजार समितीपुरते मर्यादित ठेवल्यामुळे धान्य व मसाला मार्केटमधील कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे. यामुळे माथाडी संघटना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मॅफ्कोप्रमाणे स्थिती होणारशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे यापूर्वी मॅफ्को महामंडळ तोट्यात गेले व ते बंद करावे लागले. मुंबईमधील मील बंद झाल्यामुळे गिरणी कामगार बेरोजगार झाले. शासनाने बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आणले असून, येथे काम करणारा मराठी माथाडी कामगारही बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सोमवारी पहिले आंदोलन होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई