शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

सामाजिक शांततेसाठी प्रत्येकाचे योगदान हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:45 IST

शहरवासीयांना आवाहन : पोलिसांच्या वतीने वाशीत समन्वय सभेचे आयोजन

नवी मुंबई : सामाजिक शांतता राखणे, ही सर्व नागरिकांची जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी व मान्यवरांनी केले आहे. नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी वाशीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबईमध्ये सामाजिक सलोखा कायम राखावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याचाच भाग म्हणून अभिनेते नाना पाटेकर यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले की, समाज व्यवस्था काही तरी अपेक्षा करणे, ते पेलवण्याची आणि करण्याची आज खरी गरज आहे. माणसे जोडता आली तरच महासत्ता निर्माण होईल. सोशल मीडियावरून आलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे अफवांचे पेव वाढते. भाजपा युवानेते वैभव नाईक यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोपरखैरणे येथील गंगाई मित्रमंडळ आणि ऐरोलीमधील तरु ण मित्रमंडळ यांनी आपले उत्सव रद्द केले आहेत. या दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनीही नवी मुंबईमध्ये सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी व शांतता भंग होणार नाही, यासाठी पोलिसांनी चांगला उपक्रम राबविला आहे. प्रत्येक नागरिकाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. मराठा आंदोलनादरम्यान नवी मुंबईमध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाली होती. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी ही सभा आयोजित केली होती. मराठा समन्वय समितीचे अंकुश कदम आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली व ९ आॅगस्टच्या बंदमध्ये सहभागी न होऊन पोलिसांना सहकार्य केल्याचे सांगितले. रामचंद्र घरत यांनी नवी मुंबईमधील नागरिक सर्व सण, उत्सव एकत्र साजरे करत असल्याची भूमिका मांडली. पोलिसांनी मोहल्ला कमिटीसारखे उपक्रम राबवावे, असे मत माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त केले. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई