शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

सात महिने उलटूनही मनरेगाकडून मजूरी नाही

By admin | Updated: July 25, 2015 22:22 IST

मोखाड्यात मनरेगाच्या कामाचा सावळागोंधळ सुरूच असून सात महिने उलटले तरी सातुर्ली येथील कामगारांना आपल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही.

मोखाडा : मोखाड्यात मनरेगाच्या कामाचा सावळागोंधळ सुरूच असून सात महिने उलटले तरी सातुर्ली येथील कामगारांना आपल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. या कारभारामुळे एका मजुराचा पैसे नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून उपचाराअभावी एका कामगाराला पक्षघातामुळे अपंगत्व आले आहे. असे असतानादेखील मनरेगाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात श्रमजीवी संघटना ३१ जुलै रोजी तहसील पंचायत समिती कार्यालयावर जाब विचारण्यासाठी धडकणार आहे.सातुर्ली येथील ८० कामगारांनी जानेवारी महिन्यात मनरेगाच्या योजनेत काम केले आहे. मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम, अशी या योजनेत तरतूद असतानादेखील ७ महिन्यांचा कालावधी उलटूनही या कामगारांना मजुरी मिळाली नसून तहसील कार्यालय व पंचायत समितीचे उंबरठे झिजवूनसुद्धा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. उपासमारीची वेळ आलेल्या या कामगारांपैकी त्यातच भगवान भाऊ बरफ या कामगाराचा किरकोळ आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर आते, खोच, गोदे बुदु्रक, धोत्याचापाडा येथील गावांतील कामगारांना मजुरी मिळालेली नाही. शिरसगावामधील २६ कामगारांनी पाच महिन्यांपूर्वी ६ दिवस काम केले होते. मात्र, त्यांनाही मजुरी मिळू शकलेली नाही. त्यातील वामन दिवे हा कामगार सध्या पक्षवाताच्या आजाराचा सामना करीत असून अशा या दळभद्री यंत्रणेच्या विरोधात तालुक्यातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांकडून तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. (वार्ताहर)मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ सुरूच असून या कुचकामी यंत्रनेमुळे कामे करूनही तालुक्यातील आदिवासींना मजुरी मिळालेली नाही. अनेकदा ही बाब निदर्शनास आणून दिली असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ३१ जुलै रोजी आंदोलन केले जाणार आहे. - गणेश माळी, तालुकाध्यक्ष मोखाडा